शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
Daily Top 2Weekly Top 5

...तर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊ, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 15:28 IST

जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे. त्यामुळे भारताकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली असून, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा दिला आहे. 

 नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे. त्यामुळे भारताकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली असून, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा दिला आहे. रमजान महिन्याच्या काळात पाकिस्तानकडून होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाबाबत सीतारामन म्हणाल्या, "भारत शस्त्रसंधीच्या कराराचा आदर करतो. पण आगळीक करून आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केल्यास चोख प्रत्युत्तर दिले जाईल. गृहमंत्रालयाने लष्कराशी चर्चा करून रमजानच्या काळात जम्मू काश्मीरमध्ये शस्त्रसंधी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. पण प्रत्युत्तरदाखल कारवाई करण्याचा अधिकार लष्कराला आहे. त्यामुळे लष्कराला डिवचल्यास ते नक्कीच प्रत्युत्तर देतील." 

यावेळी पाकिस्तानसोबत द्विपक्षीय चर्चेबाबत विचारणा केली असता सीतारामन यांनी सध्याच्या परिस्थितीत चर्चा होण्याची शक्यता फेटाळून लावली. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने आधीच स्पष्ट केले आहे आणि आमच्या सरकारची हीच भूमिका आहे." असे त्या म्हणाल्या. 

 रमजान काळात शस्त्रसंधी लागू करण्याचा निर्णय यशस्वी झाला का, अशी विचारणा केली असता सीतारामन म्हणाल्या, शस्त्रसंधी लागू करण्याचा निर्णय यशस्वी झाला किंवा नाही हे निश्चित करणे संरक्षण मंत्रालयाचे काम नाही. आच्या सीमांचे रक्षण करणे हे आमचे काम आहे आणि आम्हाला कुणी डिवचले तर आम्ही शांत राहणारा नाही. डिवचण्यासाठी केल्या गेलेल्या कुठल्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाईठ आम्हाला सज्ज राहिले पाहिजे. 

तसेच लष्कराकडे शस्त्रास्त्रे आणि दारुगोळ्याची कमतरता नाही. तसेच राफेल करारामध्ये  भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही बिनबुडाचा आहे, असेही सीतारामन म्हणाल्या.   

 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनDefenceसंरक्षण विभागGovernmentसरकारIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान