शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
2
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
3
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
4
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
5
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
6
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
7
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
8
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा
9
७ सीटर Kia Carens CNG मध्ये झाली लॉन्च; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत, Ertiga ला देणार टक्कर
10
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
11
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
12
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
13
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
14
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
15
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
16
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
17
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
18
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
19
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
20
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले

...तर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊ, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 15:28 IST

जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे. त्यामुळे भारताकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली असून, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा दिला आहे. 

 नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे. त्यामुळे भारताकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली असून, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा दिला आहे. रमजान महिन्याच्या काळात पाकिस्तानकडून होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाबाबत सीतारामन म्हणाल्या, "भारत शस्त्रसंधीच्या कराराचा आदर करतो. पण आगळीक करून आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केल्यास चोख प्रत्युत्तर दिले जाईल. गृहमंत्रालयाने लष्कराशी चर्चा करून रमजानच्या काळात जम्मू काश्मीरमध्ये शस्त्रसंधी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. पण प्रत्युत्तरदाखल कारवाई करण्याचा अधिकार लष्कराला आहे. त्यामुळे लष्कराला डिवचल्यास ते नक्कीच प्रत्युत्तर देतील." 

यावेळी पाकिस्तानसोबत द्विपक्षीय चर्चेबाबत विचारणा केली असता सीतारामन यांनी सध्याच्या परिस्थितीत चर्चा होण्याची शक्यता फेटाळून लावली. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने आधीच स्पष्ट केले आहे आणि आमच्या सरकारची हीच भूमिका आहे." असे त्या म्हणाल्या. 

 रमजान काळात शस्त्रसंधी लागू करण्याचा निर्णय यशस्वी झाला का, अशी विचारणा केली असता सीतारामन म्हणाल्या, शस्त्रसंधी लागू करण्याचा निर्णय यशस्वी झाला किंवा नाही हे निश्चित करणे संरक्षण मंत्रालयाचे काम नाही. आच्या सीमांचे रक्षण करणे हे आमचे काम आहे आणि आम्हाला कुणी डिवचले तर आम्ही शांत राहणारा नाही. डिवचण्यासाठी केल्या गेलेल्या कुठल्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाईठ आम्हाला सज्ज राहिले पाहिजे. 

तसेच लष्कराकडे शस्त्रास्त्रे आणि दारुगोळ्याची कमतरता नाही. तसेच राफेल करारामध्ये  भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही बिनबुडाचा आहे, असेही सीतारामन म्हणाल्या.   

 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनDefenceसंरक्षण विभागGovernmentसरकारIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान