शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 18:54 IST

एक तरुण शेतकरी लाखो तरुणांसाठी प्रेरणास्थान बनला आहे.

उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यात राहणारा एक तरुण शेतकरी लाखो तरुणांसाठी प्रेरणास्थान बनला आहे. सीतापूरमधील राजीव त्रिपाठी याने LLB, B.ED आणि CA चे शिक्षण घेतल्यानंतर लखनौमध्ये एक इन्कम टॅक्स आणि जीएसटीचं ऑफिस सुरू केलं, परंतु त्याला शहरातील नोकरी आवडत नव्हती. त्यामुळे शेतीकडे वळण्याचा मोठा निर्णय घेतला. 

राजीव हा एका प्रगतीशील शेतकऱ्याचं उत्तम उदाहरण आहे, जो फक्त शेतीतून केवळ आपली कमाई वाढवत नाही तर इतरांनाही रोजगार देत आहे. इंडिया टुडेच्या किसान टकशी बोलताना राजीवने सांगितले की, "२०१८ मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर शेती करण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांचा सल्ला घेत त्यांनी हंगामानुसार पिके व भाजीपाल्याची लागवड सुरू केली."

"टोमॅटो, केळी, बांबू, हळद, लिंबू, पपई, टरबूज यांची लागवड सुरू केली. रात्रंदिवस मेहनत केल्यामुळे आज आमच्या शेतातील मालाचा पुरवठा उत्तर प्रदेशातील १६ जिल्हे ते सौदी अरेबियापर्यंत केला जात आहे. २३ एकरात विविध पिकं घेतली आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यापारी स्वतः आमच्या शेतात येतात आणि सर्व माल खरेदी करतात."

शेतकऱ्याने पुढे सांगितलं की, आम्ही यंत्रांचा कमी वापर करतो. मजुरांकडून काम करून घेण्यावर आमचा जास्त फोकस आहे. याच कारणामुळे २५ हून अधिक कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे, जेणेकरून ते स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतील. ते आमच्याकडेच रोज काम करतात, त्यामुळे त्यांना इतरत्र कामावर जावं लागत नाही.

६ वर्षांच्या मेहनतीमुळे आज राजीव याचा वर्षाला टर्नओव्हर ५५ लाखांच्या वर पोहोचला आहे. आज त्यांना पाहून अनेक शेतकरी पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेतीकडे वळत आहेत. प्रगतीशील शेतकरी राजीव त्रिपाठी याला आधुनिक शेती आणि उत्तम उत्पादनासाठी KVK द्वारे विविध व्यासपीठांवर अनेकदा सन्मानित करण्यात आलं आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीUttar Pradeshउत्तर प्रदेश