शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

भटक्या कुत्र्यांची दहशत, लहान मुलांच्या रस्त्यावर एकटं फिरण्यावर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 10:50 AM

खैराबाद भागात कुत्र्यांच्या हल्ल्यात मुलीच्या मृत्यूनंतर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात हायअलर्ट जारी केला आहे.

सीतापूर- उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यात कुत्र्यांची दहशत कमी होत नाहीये. रविवारी 10 वर्षाच्या मुलीचा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. खैराबाद भागात कुत्र्यांच्या हल्ल्यात मुलीच्या मृत्यूनंतर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात हायअलर्ट जारी केला आहे. तेथे कुठल्याही लहान मुलाला घराबाहेर निघण्यावर बंदी घालण्यात आली आहे. लहान मुलं घरातील मोठ्या सदस्याबरोबरच घराबाहेर पडतील, असा नियम घालून देण्यात आला आहे. 

नोव्हेंबर 20107पासून ते आत्तापर्यंत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एकुण 13 मुलांचा मृत्यू झाला आहे. तर 1 मे पर्यंत सात मुलं गंभीर जखमी झाली आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सीतापूरमध्ये जाऊन मृत मुलांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर 48 तासाच्या आतच एका मुलाचा कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यामुळे घरातील एकातरी मोठ्या सदस्याने लहान मुलगा बाहेर जाताना त्याच्याबरोबर असावं, अशी सूचना करण्यात आली आहे. 

खैराबाद ठाण्याअंतर्गत  येणाऱ्या महेशपूर-चिल्लावर गावात रविवारी सकाळी 10 वर्षीय मुलगी रीना तिच्या तीन मैत्रिणींबरोबर आंबे वेचायला गेली होती. त्यावेळी कुत्र्यांच्या एका झुंबडीने मुलींवर हल्ला केला. कुत्र्यांना येताना पाहून इतर तिघी तेथून पळाल्या पण रीना कुत्र्यांच्या तावडीत सापडली. रीनाचा आवाज ऐकुन गावातील लोक घटनास्थळी आली व त्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. या घटनेचा गावातील स्थानिक लोकांनी जोरदार निषेध करत सरकारवर जोरदार टीका केली. एकामागे एक मुलांचे कुत्र्यांच्या हल्ल्ल्यात मृत्यू होत असताना जिल्हा प्रशासन काहीही करू शकत नाही, अशी टीका तेथिल लोकांनी केली.