शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

‘इंडिया’ सत्तेत आल्यास निवडणूक रोखे प्रकरणाची ‘एसआयटी’ चौकशी, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 09:42 IST

लोकसभा निवडणुका होऊन गेल्यानंतर ही आकडेवारी जाहीर व्हावी, यासाठी बहुधा मोदी सरकारच्या इशाऱ्यानुसारच ‘एसबीआय’ने पावले उचलली असावीत, असा दावा जयराम रमेश यांनी केला.

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांनंतर केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार आल्यास निवडणूक रोखे प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी केली जाईल, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले. ते म्हणाले की, निवडणूक रोखे हा ‘प्रीपेड लाच’ आणि ‘पोस्टपेड लाच’ असा मामला आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी झाली पाहिजे.

निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करण्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ मिळावी म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे (एसबीआय) सर्वोच्च न्यायालयात प्रयत्न करण्यात आले. लोकसभा निवडणुका होऊन गेल्यानंतर ही आकडेवारी जाहीर व्हावी, यासाठी बहुधा मोदी सरकारच्या इशाऱ्यानुसारच ‘एसबीआय’ने पावले उचलली असावीत, असा दावा जयराम रमेश यांनी केला.

सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे ‘एसबीआय’ला निवडणूक रोख्यांचा तपशील गेल्या २१ मार्च रोजी जााहीर करावाच लागला. निवडणूक रोखे हा मोठा घोटाळा आहे, असा आराेप रमेश यांनी केला.

काँग्रेस प्रस्थापित कंपनी, तर भाजप स्टार्ट-अप’काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, काँग्रेस ही एका प्रस्थापित कंपनीसारखी असून भाजप हा स्टार्ट-अप आहे. प्रस्थापित कंपनीचे बाजार भांडवल कमी-जास्त होत राहते. तशीच काँग्रेसची स्थिती आहे; पण हा पक्ष पुन्हा नक्की सत्तेवर येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळेच भाजपला निवडणुकांत यश मिळत असल्याची गोष्ट जयराम रमेश यांनी अमान्य केली. संघटन सामर्थ्य हे अधिक महत्त्वाचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसSBIएसबीआय