शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

‘इंडिया’ सत्तेत आल्यास निवडणूक रोखे प्रकरणाची ‘एसआयटी’ चौकशी, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 09:42 IST

लोकसभा निवडणुका होऊन गेल्यानंतर ही आकडेवारी जाहीर व्हावी, यासाठी बहुधा मोदी सरकारच्या इशाऱ्यानुसारच ‘एसबीआय’ने पावले उचलली असावीत, असा दावा जयराम रमेश यांनी केला.

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांनंतर केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार आल्यास निवडणूक रोखे प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी केली जाईल, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले. ते म्हणाले की, निवडणूक रोखे हा ‘प्रीपेड लाच’ आणि ‘पोस्टपेड लाच’ असा मामला आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी झाली पाहिजे.

निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करण्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ मिळावी म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे (एसबीआय) सर्वोच्च न्यायालयात प्रयत्न करण्यात आले. लोकसभा निवडणुका होऊन गेल्यानंतर ही आकडेवारी जाहीर व्हावी, यासाठी बहुधा मोदी सरकारच्या इशाऱ्यानुसारच ‘एसबीआय’ने पावले उचलली असावीत, असा दावा जयराम रमेश यांनी केला.

सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे ‘एसबीआय’ला निवडणूक रोख्यांचा तपशील गेल्या २१ मार्च रोजी जााहीर करावाच लागला. निवडणूक रोखे हा मोठा घोटाळा आहे, असा आराेप रमेश यांनी केला.

काँग्रेस प्रस्थापित कंपनी, तर भाजप स्टार्ट-अप’काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, काँग्रेस ही एका प्रस्थापित कंपनीसारखी असून भाजप हा स्टार्ट-अप आहे. प्रस्थापित कंपनीचे बाजार भांडवल कमी-जास्त होत राहते. तशीच काँग्रेसची स्थिती आहे; पण हा पक्ष पुन्हा नक्की सत्तेवर येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळेच भाजपला निवडणुकांत यश मिळत असल्याची गोष्ट जयराम रमेश यांनी अमान्य केली. संघटन सामर्थ्य हे अधिक महत्त्वाचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसSBIएसबीआय