शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
2
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
3
बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली
4
“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला
5
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
6
किम जोंग उनला लादेनप्रमाणेच मारण्याची तयारी, सैनिकही पाठवले, पण एक चूक झाली आणि फसला अमेरिकेचा प्लॅन 
7
Mumbai: विद्यार्थी एक दिवस शिक्षकांच्या भूमिकेत; वर्गांवर घेतला तास!
8
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
9
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
10
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
11
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
12
Viral Video : ट्रेनचा 'हँडसम' टीटीई बनला सोशल मीडिया सेन्सेशन! प्रवास करणाऱ्या तरुणीची नजर हटेना
13
Ganesh Visarjan: विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद
14
VIDEO: उब्जेकिस्तानची Robiya Havasguruhi भारतात तुफान VIRAL, जगभरातून होतंय कौतुक; कारण...
15
अमेरिकन मंत्री संतापला, भारताला म्हणाला, माफी मागा...; PM नरेंद्र मोदींसमोर ठेवल्या ४ अटी
16
"स्वस्ताईचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला नाही तर खैर नाही..."
17
BEST: आणखी एका बसचा ‘कोस्टल’वर गारेगार प्रवास!
18
Metro: ‘मेट्रो-६’ डेपोच्या जागेचा तिढा सुटेना!
19
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
20
राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’

देशभरात एकाच वेळी लागू होणार SIR, वादविवादादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 12:13 IST

Election Commission Of India: बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने राज्यात मतदार याद्यांच्या पुनरीक्षणास सुरुवात केल्याने मोठा वाद उद्भवला होता. तसेच त्यावरून कोर्टकचेऱ्याही झाल्या होत्या. आता या वादाच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेतला असून, मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचा कार्यक्रम संपूर्ण देशभरात लागू करण्याचे निश्चित केले आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने राज्यात मतदार याद्यांच्या पुनरीक्षणास सुरुवात केल्याने मोठा वाद उद्भवला होता. तसेच त्यावरून कोर्टकचेऱ्याही झाल्या होत्या. आता या वादाच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेतला असून, मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचा कार्यक्रम संपूर्ण देशभरात लागू करण्याचे निश्चित केले आहे. या संदर्भात १० सप्टेंबर रोजी दिल्लीत निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. एसआयआरमध्ये भारतीय नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी अतिरिक्त कागदपत्रांची मागणीही निवडणूक आयोगाने केली आहे.

पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मतदारासंची सध्याची संख्या, मागच्या एसआयआरची तारीख आणि डेटा, डिजिटायझेशनची स्थिती यासह एकूण १० मुद्यांवर माहिती मागवण्यात आली आहे. मतदान केंद्रांचं युक्तिकरण आणि एकूण केंद्रांच्या संख्येबाबतही अहवाल द्यावा लागणार आहे. अधिकारी आणि बीएलओंची नियुक्ती आणि प्रशिक्षणाच्या स्थितीवरही लक्ष ठेवण्यात येणार आहे. सध्या बिहारमध्ये मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाची मोहीम सुरू असून, ती ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे.

दरम्यान, मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचा कार्यक्रम संपूर्ण देशभरात लागू करण्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. मात्र सूत्रांकडून मिळत असलेल्या संकेतांनुसार मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचा हा कार्यक्रम संपूर्ण देशभरात एकाच वेळी लागू होणार आहे. एसआयआरच्या तारखेबाबत अंतिम निर्णय हा नंतर घेतला जाणार आहे.  

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूक 2024Indiaभारत