शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम बुद्ध सारखेच - परेश रावल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 20:13 IST

'जी व्यक्ती गौतम बुद्धांप्रमाणे आपल्या सर्वस्वाचा त्याग करुन देशसेवा करण्यात व्यस्त आहे त्या आपण त्या व्यक्तीच्या राज्यात जर आपण जाती आणि धर्माच्या आधारे मतदान केलं तर ही दगाबाजी असेल. हे पाप आणि अनैतिक ठरेल' असं परेश रावल बोलले आहेत. 

ठळक मुद्दे परेश रावल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना गौतम बुद्धाशी केली आहे'गौतम बुद्धासारख्या नरेंद्र मोदींच्या मायभूमीत जात आणि धर्माच्या आधारे मतदान करणं पाप आणि अनैतिक ठरेल''तुम्हाला आपल्या मुलाला राहुल गांधी बनवायचं आहे की नरेंद्र मोदी. जे तुमचं उत्तर असेल त्यालाच मतदान करा'

राजकोट - भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि अभिनेते परेश रावल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना गौतम बुद्धाशी केली आहे. 'येत्या विधानसभा निवडणुकीत गौतम बुद्धासारख्या नरेंद्र मोदींच्या मायभूमीत जात आणि धर्माच्या आधारे मतदान करणं पाप आणि अनैतिक ठरेल', असं परेश रावल बोलले आहेत. राजकोटमध्ये ‘मन की बात, चाय के साथ’ कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी परेश रावल यांनी उपस्थितांना प्रश्नही विचारला की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा असावा की राहुल गांधींसारखा'. 

'पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखी व्यक्ती मिळणं कठीण आहे. खूप पूजा आणि प्रार्थना केल्यानंतरच अशी व्यक्ती मिळते. असं विराट व्यक्तिमत्व असणारी व्यक्ती अवतार घेते. राजकारणातून अशी व्यक्ती जन्म घेऊच शकत नाही. जी व्यक्ती गौतम बुद्धांप्रमाणे आपल्या सर्वस्वाचा त्याग करुन देशसेवा करण्यात व्यस्त आहे त्या आपण त्या व्यक्तीच्या राज्यात जर आपण जाती आणि धर्माच्या आधारे मतदान केलं तर ही दगाबाजी असेल. हे पाप आणि अनैतिक ठरेल. आपण असं करु शकत नाही. आपण सरदार पटेल आणि महात्मा गांधींच्या मायभूमीवरील लोक आहोत', असं परेश रावल बोलले आहेत. 

परेश रावल पुढे म्हणालेत की, 'देवाकडे प्रार्थना करा, आपल्या कुलदैवतेचं स्मरण करा, आपल्या आई-वडिलांचा चेहरा डोळ्यांसमोर आणा, आपल्या शिक्षकांनी काय शिकवलं होतं ते आठवा, आपला हात छातीवर ठेवा आणि इमानदारीने स्वत:ला प्रश्न विचारा की, तुम्हाला आपल्या मुलाला राहुल गांधी बनवायचं आहे की नरेंद्र मोदी. जे तुमचं उत्तर असेल त्यालाच मतदान करा'. 

राहुल गांधीचं राजकीय करिअर वाचवण्यासाठीच पाटीदार नेता हार्दिक पटेल, ओबीसी नेता अल्पेश ठाकोर आणि दलित कार्यकर्ता जिग्नेश मेवानीचा वापर केला जात असल्याचा अंदाज परेश रावल यांनी व्यक्त केला आहे. 

परेश रावल यांनी सांगितलं की, '2007 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यांनी मला विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणूक जिंकणार असल्याचं सांगितलं होतं. 2012 मध्ये जेव्हा मी त्यांना अजेंडा विचारला तेव्हाही त्यांनी विकास हेच उत्तर दिलं. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा 1980च्या निवडणुकीत इंदिरा गांधी पुनरागमनासाठी प्रयत्न करत होत्या तेव्हा एक घोषणा देण्यात आली होती ‘इंदिरा गांधी लाओ, देश बचाओ’. नंतर सोनिया गांधी आल्या आणि घोषणा बदलली की, ‘सोनियाजी लाओ, देश बचाओ’. शेवटी राहुल गांधी आले आणि घोषणा बदलली, ‘अल्‍पेश, हार्दिक, जिग्‍नेश लाओ और राहुलभाई बचाओ’. पण मोदींनी नजर विकासावरच खिळली आहे'.

टॅग्स :Paresh Rawalपरेश रावलNarendra Modiनरेंद्र मोदी