शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

मौन की बात! मोदींनी पाच दिवसांत उच्चारला नाही एकही शब्द; 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 07:23 IST

निवडणूक जाहीर होताच कार्यक्रम बंद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ फेब्रुवारी ते १० मार्च दरम्यान १५७ प्रकल्पांचे उद्घाटन केले. काँग्रेसवर टीकास्त्रही सोडले. पण लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम व आचारसंहिता जाहीर झाल्यापासून पाच दिवसांत ते काहीही बोललेले नाहीत. त्यांनी मौन धारण केले आहे.व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उद््घाटने करणाऱ्या, संवाद साधणाऱ्या मोदी यांनी पाच दिवसांत काहीही केलेले नाही. सूत्रांनी सांगितल्यानुसार मोदींच्या मौनाचे कारण ‘होलाष्टक’ काळ सुरू झाला हे आहे. होलाष्टक हा अशुभ काळ मानला जातो व होळीच्या आधीचे आठ दिवस हे अनिष्ट मानले जातात. होळी २१ मार्च रोजी आहे. त्यामुळे तोपर्यंत मोदी मोठ्या, जाहीर कार्यक्रमांत बोलण्याची शक्यता नाही. भाजपाने ३६ पक्षांसोबत युती पूर्ण केलेली होती. आता काम सुरू आहे जाहीरनाम्यावर. प्रचाराच्या व्यूहरचनेची जबाबदारी अरुण जेटली यांच्याकडे आहे. मोदी वरिष्ठ नेत्यांशी सातत्याने भेटत असून प्रचार मोहिमेला अंतिम रूप देत आहेत. ‘मोदी है तो मुमकीन है’अथक परिश्रम करून ठरविलेले काम तडीस नेणारा नेता या भारतीयांच्या जनमानसात ठसलेल्या प्रतिमेचे मतांच्या रूपाने भांडवल करण्यासाठी भाजपाने निवडणुकीत ‘मोदी है तो मुमकीन है’ हे घोषवाक्य वापरायचे ठरविले आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस