शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
4
बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
5
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
6
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
7
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
8
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
9
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
10
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
11
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
12
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
13
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
14
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
15
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
16
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
17
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
18
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
19
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
20
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन

पुन्हा संघर्षाची चिन्हे! लोकसंख्या नियंत्रणात ठेवणाऱ्या राज्यांवर अन्याय नको, दक्षिणेतून 'आवाज'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 14:44 IST

काय आहेत प्रमुख आक्षेप? नेत्यांचे म्हणणे काय? जाणून घ्या...

चेन्नई: देशातील लाेकसभा मतदारसंघ पुनर्रचना नि:पक्ष आणि पारदर्शकतेने व्हावी यासाठी चेन्नईत विविध पक्षांचा समावेश असलेल्या संयुक्त कार्यसमितीच्या बैठक पार पडली. यात  लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणाऱ्या राज्यांना या प्रक्रियेमुळे दंड बसू नये यासाठी केंद्राने आवश्यक घटना दुरुस्ती करावी, असा ठराव पास करण्यात आला.

राज्यघटनेच्या ४२, ८४ व ८७व्या घटनादुरुस्तीचा उद्देश हा लोकसंख्या नियंत्रणासाठीच्या उपाययोजना यशस्वीपणे राबवलेल्या राज्यांना प्रोत्साहन देणे हा होता. तरीही लोकसंख्या वाढीचा दर स्थिर झालेला नसल्याने १९७१च्या लोकसंख्येच्या आधारे मतदारसंघ २५ वर्षांसाठी कायम ठेवा, अशी मागणी करण्यात आली.

म्हणून अनेक पक्षांना शंका

नव्या संसदभवनात सध्या संसद भरते. जुन्या भवनात आसनसंख्या ५५० होती. नव्या इमारतीत किमान ८८८ खासदार बसू शकतील अशी व्यवस्था आहे. पुनर्रचनेत लोकसंख्येनुसार उत्तर भारतात मतदारसंघ वाढल्यास त्याचा लाभ भाजपप्रणित आघाडीलाच होईल, असाही विचार दाक्षिणात्य पक्षांत आहे. (वृत्तसंस्था)

काय आहेत प्रमुख आक्षेप?

  • या पुनर्रचनेत लोकसंख्येच्या निकषाआधारे निर्णय झाले तर राज्यांचे प्रतिनिधित्व कमी होऊ नये ही या बैठकीत सहभागी राज्यांची भूमिका आहे. या सर्व राज्यांत सत्ताधारी भाजपचा प्रभाव तुलनेने कमी आहे.
  • नव्या जनगणनेनंतर पुनर्रचना झाली तर उत्तरेतील जागा वाढतील, दक्षिणेतील कमी होतील. याचा लाभ उघडपणे भाजपला होईल, असा दक्षिणेतील नेत्यांचा आक्षेप आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यानुसार, लोकसंख्येच्या आधारे पुनर्रचना झाल्यास दक्षिण भारताचे राजकीय अस्तित्वच कमी होईल, या नागरिकांना दुय्यम वागणूक मिळेल.

नेत्यांचे म्हणणे काय?

  • या प्रक्रियेत लोकसभा किंवा राज्यसभेत एखाद्या राज्याचे प्रतिनिधित्व कमी व्हायला नको, असे आंध्रचे माजी मुख्यमंत्री एस. जगनमोहन रेड्डी म्हणाले. 
  • कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आरोप केला की, दक्षिणेतील राज्यांचे प्रतिनिधित्व कमी करण्याचा हा डाव आहे.
  • पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, ज्या राज्यांत भाजपचे वर्चस्व आहे तेथे जागा वाढवण्याचा हा प्रयत्न आहे. 
  • द्रमुकचे अध्यक्ष व तामिळनाडूचे एम. के. स्टॅलिन यांनी आक्रमक भूमिका घेत यासाठी एक तज्ञांची समिती नेमण्याचे आवाहन केले.

चिंता की हा राजकीय अजेंडा : रा. स्व. संघ

  • तामिळनाडूसह पाच राज्यांनी मतदारसंघ पुनर्रचनेला केलेला विरोध हा त्यांचा राजकीय अजेंडा आहे की खरेच त्यांना याची चिंता आहे, असा प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह अरुण कुमार यांनी उपस्थित केला. ‘अजून ना जनगणना सुरू झाली, ना पुनर्रचना. एवढेच नव्हे, याबाबतच्या कायद्याचा मसुदाही अजून तयार नाही’, असे अरुण कुमार बंगळुरू येथे पत्रकारांसमोर म्हणाले. 
  • रा. स्व. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेनिमित्त ते बोलत होते. ‘जे लोक या पुनर्रचनेच्या चर्चत सहभागी आहेत त्यांना राज्याची चिंता नाही, ते राजकीय विचार करीत आहेत. त्यांना काय विचार करायचा ते करू द्या, पण तुम्ही एकदा त्यांना विचारा तरी, की पुनर्रचनेची ही प्रक्रिया तरी सुरू झाली आहे का?’
टॅग्स :Indiaभारत