शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने पोखरले भारतातील मुलांचे बालपण, देशातील ३७ कोटी मुलांबाबत सीएसईचा चिंता वाढवणारा अहवाल

By बाळकृष्ण परब | Updated: February 26, 2021 15:48 IST

Indian Children in Covid-19 : देशातील कोरोनाचा संसर्ग कमीजास्त होत आहे. तसेच कोरोनावरील लसही उपलब्द झाली आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या साथीचे दुष्परिणाम पुढील अनेक वर्षे कायम राहणार आहेत.

ठळक मुद्देदेशातील ३७.५ कोटी मुले दीर्घकाळापर्यंत कायम राहणाऱ्या कोरोनाच्या दुष्परिणामांच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता त्यांची रोगप्रतिकार क्षमता प्रभावित झाल्यामुळे हे दुष्परिणाम कमी वजन, कमी उंची आणि मृत्यूदरात वाढ या रूपात दिसतीलकोरोनामुळे जगभरात ५० कोटींहून अधिक मुलांची शाळा सुटली आहे. त्यातील अर्ध्याहून अधिक मुले ही भारतात आहेत

नवी दिल्ली - देशातील कोरोनाचा संसर्ग कमीजास्त होत आहे. तसेच कोरोनावरील लसही उपलब्द झाली आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या साथीचे दुष्परिणाम पुढील अनेक वर्षे कायम राहणार आहे. (corona virus) विशेष करून लहान मुलांच्या शारीरिक विकासावर कोरोनाचा मोठा परिणाम होणार आहे. (Indian Children in Covid-19 ) कोरोनामुळे मुलांच्या मृत्युदरात वाढ होणार असून, त्यांचे शिक्षणही विस्कळीत होण्याची शक्यता आहे, ही भीती सेंटर फॉर सायन्स अँड  एन्व्हायरमेंट (सीएसई) च्या वार्षिक अहवालामध्ये स्टेट ऑफ इंडियाज एन्व्हायर्मेंट (सीएसई) च्या वार्षिक अहवालात स्टेट ऑफ इंडियाज एन्वायर्मेंट २०२१ मधून व्यक्त करण्यात आली आहे. सीएसईच्या महासंचालक सुनीता नारायण यांच्यासह देशभरातील ६० हून अधिक पर्यावरणवाद्यांनी एकत्रितपणे हा अहवाल गुरुवारी संध्याकाळी प्रसिद्ध केला आहे.  (side effects of Covid-19 , CSE report raises concerns about 37 crore children in India)

या अहवालानुसार, भारत आता महामारी जनरेशनमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज झाला आहे. देशातील ३७.५ कोटी मुले (नवजात अर्भकांपासून ते १४ वर्षांच्या मुलांपर्यंत) दीर्घकाळापर्यंत कायम राहणाऱ्या कोरोनाच्या दुष्परिणामांच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. त्यांची रोगप्रतिकार क्षमता प्रभावित झाल्यामुळे हे दुष्परिणाम कमी वजन, कमी उंची आणि मृत्यूदरात वाढ या रूपात दिसतील. तसेच शैक्षणिक नुकसानापर्यंत दुष्परिणाम दिसून येणार आहेत. जगभरात ५० कोटींहून अधिक मुलांची शाळा सुटली आहे. त्यातील अर्ध्याहून अधिक मुले ही भारतात आहेत. 

सीएसईच्या महासंचालक सुनीता नारायण यांनी सांगितले की, आता कोरोना विषाणू आमच्यासाठी दीर्घकाळासाठी काय सोडून जाणार आहे याचा तपास करण्याची वेळ आली आहे. एक पिढी अस्वस्थता, कुपोष, गरिबी आणि शैक्षणिक लाभांबाबत दुर्बलतेने घेरली गेली आहे. त्याबरोबरच पर्यावरणाचा निरंतर विकासासाठी उपयोग कऱण्याचेही आव्हान आहे. जेणेकरून पर्यावरणीय आव्हानांच्या काळात आम्ही उदरनिर्वाह आणि पोषण सुरक्षेबाबत सुधारणा करू शकू.  

सीएसईच्या अहवालात म्हटले आहे की, संपूर्ण लॉकडाऊन लागू केल्यानंतरही भारतात कोरोनाचा संसर्ग थांबू शकला नाही. देशातील लोकसंख्येचा मोठा भाग हा झोपडपट्ट्या तसेच दाट लोकवस्तीमध्ये राहतो. तिथे ना पिण्याच्या स्वच्छ पाण्याची उपलब्धता आहे. ना तिथे योग्य स्वच्छता होते. अशा परिस्थितीत संसर्गाची शक्यता सातत्याने कायम असते.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकIndiaभारतHealthआरोग्य