शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सिद्धरामय्या पुन्हा चर्चेमध्ये, कर्नाटकातील सरकार डळमळीत होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2018 15:35 IST

निवृत्त आयएएस अधिकाऱ्याला मुख्यंत्र्यांचे आर्थिक सल्लागार म्हणून नेमणे तसेच नागतिहळ्ळी चंद्रशेखर यांची फिल्म अकादमीवर अध्यक्ष म्हणून निवड होणे सुद्धा काँग्रेसला पसंत पडलेले नाही.

बंगळुरु- कर्नाटकात जनता दल धर्मनिरपेक्ष आणि काँग्रेस यांचे एकत्र सरकार सत्तेत येऊन एक महिना उलटला तरी या आघाडीमध्ये अजूनही फारसं काही आलबेल नसल्याचे दिसते. त्यातच माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यारोधात उघड भूमिका घेतल्यामुळे आता ते पुन्हा चर्चेमध्ये आले आहे. सिद्धरामय्या यांच्या भूमिकेवर काही काँग्रेस सदस्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे कर्नाटकातील आघाडीतील सत्ताधारी एकमेकांवरील आरोपांमध्ये गुंतलेले दिसून येतात. सिद्धरामय्या हे काँग्रेस विधिमंडळ गटाचे नेते आहेत आणि दोन्ही पक्षांमधील संवाद समितीचे अध्यक्षही आहेत.कर्नाटकातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मुद्द्यावर आणि स्वतंत्र नवा अर्थसंकल्प मांडण्याच्या कुमारस्वामी यांच्या निर्णयावर सिद्धरामय्या यांनी उघड टीका केली आहे. फेब्रुवारी महिन्यात मांडलेल्या अंतरिम संकल्पाला कायम ठेवावे फारतर एखादा पुरवणी संकल्प मांडावा असे त्यांनी सुचवले होते. मात्र कुमारस्वामी यांनी आपण स्वतंत्र नवा अर्थसंकल्प मांडूच अशी भूमिका घेतली.सिद्धरामय्या यांचे समर्थक आणि काँग्रेस आमदार बी नारायण राव यांनी आपल्या नेत्याचा अपमान केला तर काही मिनिटांमध्ये सरकार पाडू असे विधान केले आहे.काँग्रेसने जनता दल सेक्युलरला विनाशर्त पाठिंबा देण्याचे निस्चित केल्यावर काही काँग्रेस नेत्यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. तसेच कुमारस्वामी पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री असतील आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांची निवडणूकपूर्व आघाडी होईल असे पक्षाच्या केंद्रीय नेतृत्त्वाने परस्पर जाहीर केल्यावर कर्नाटक राज्यातील काँग्रेस नेत्यांमा आश्चर्याचा धक्का बसला होता. सिद्धरामय्यांच्या निकटवर्तियांना मंत्रीमंडळात फारसे स्थान न मिळणे तसेच चांगली खाती न मिळणे हासुद्धा एक नाराजीचा मुद्दा बनला आहे.कुमारस्वामींनी 52 अभियंत्यांची पदोन्नती तसेच बदल्या केल्यानंतरही काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. निवृत्त आयएएस अधिकाऱ्याला मुख्यंत्र्यांचे आर्थिक सल्लागार म्हणून नेमणे तसेच नागतिहळ्ळी चंद्रशेखर यांची फिल्म अकादमीवर अध्यक्ष म्हणून निवड होणे सुद्धा काँग्रेसला पसंत पडलेले नाही. हे निर्णय दोन्ही पक्षांच्या एकत्र समितीने घ्यायला हवेत असे काँग्रेसला वाटते.

टॅग्स :siddaramaiahसिद्धरामय्याcongressकाँग्रेसKarnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारण