शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरन नेगी यांचं निधन, २ नोव्हेंबरला केलं होतं अखेरचं मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 09:56 IST

स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरन नेगी यांचं आज सकाळी निधन झालं. त्यांनी आतापर्यंत ३३ वेळा मतदान केलं आहे.

स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरन नेगी यांचे आज सकाळी निधन झाले. हिमाचल प्रदेशातील किन्नौरचे रहिवासी असलेले नेगी 106 वर्षांचे होते. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी 2 नोव्हेंबर रोजी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान केले होते.

देशातील सर्वात वयस्कर मतदार श्याम सरन नेगी नुकतेच रिटर्निंग ऑफिसरला 12-डी फॉर्म परत करून प्रसिद्धीझोतात आले. प्रत्यक्षात मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणार असल्याचे सांगत त्यांनी निवडणूक आयोगाचे फॉर्म परत केले होते. मात्र, त्याच दरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या कल्पा येथील निवासस्थानी जाऊन पोस्टल मतदान घेतले. निवडणूक अधिकाऱ्यांनी 106 वर्षीय नेगी यांच्या घरातच पोस्टल बूथ तयार केला होता आणि त्यांच्यासाठी रेड कार्पेटही टाकले होते. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी आबिद हुसेन यांनी नेगी यांचा टोपी व मफलर देऊन सन्मान केला.

33 वेळा केले मतदानस्वतंत्र भारताचे पहिले मतदार म्हणून ओळखले जाणारे, नेगी यांना भारतीय लोकशाहीचे लिव्हिंग लेजेंडदेखील म्हटले जाते. आपल्या प्रदीर्घ आयुष्यात त्यांनी 33 वेळा मतदान केले. बॅलेट पेपरवरून ईव्हीएममध्ये बदल झाल्याचेही पाहिले. या विधानसभेसाठीही ते मतदानाच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते.

1951 मध्ये पहिल्यांदा मतदान1 जुलै 1917 रोजी किन्नौर जिल्ह्यातील तत्कालीन चिन्नी आणि आता कल्पा या गावात जन्मलेले नेगी हे अनेकदा आठवण करून देत होते की, देशाने 1952 मध्ये स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीत मतदान केले होते, परंतु किन्नौरसह तत्कालीन राज्य व्यवस्थेत 25 ऑक्टोबर 1951 रोजी हिमालयाच्या पर्वतीय भागात जास्त मतदान झाले. कारण भारताच्या इतर भागात फेब्रुवारी-मार्च 1952 मध्ये मतदान होणार होते. किन्नौर सारख्या जास्त हिमवर्षाव असलेल्या ठिकाणी हिवाळा आणि बर्फवृष्टी लक्षात घेऊन आधीच मतदान घेण्यात आले होते.

ऑक्टोबर 1951 मध्ये नेगी यांनी पहिल्यांदाच संसदीय निवडणुकीत मतदान केले. यानंतर त्यांनी एकाही निवडणुकीत आपला सहभाग सोडला नाही. मला माझ्या मताचे महत्त्व माहित आहे, असे नेगी म्हणायचे. शरीर साथ देत नसेल तर आत्मविश्वासाच्या जोरावर मी मतदानाला जात होतो. यावेळीही मतदानाचा अधिकार पूर्ण करणार आहे. या निवडणुकीत माझे हे शेवटचे मतदान असू शकते, अशी भीतीही त्यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती.

असे ठरले पहिले मतदार"माझ्या गावाच्या शेजारच्या गावातल्या शाळेत निवडणुका घेण्यासाठी मी ड्युटीवर होतो. पण माझं मतदान माझ्या गावी, कल्पात होतं. मी आदल्या रात्री माझ्या घरी आलो होतो. पहाटेचे 4 वाजले होते. गोठवणारी थंडी असताना उठून तयार झालो. सकाळी 6 वाजता माझ्या मतदान केंद्रावर पोहोचलो. तेव्हा तिथे एकही मतदार नव्हता. मी अधिकाऱ्यांची वाट बघत होतो. ते आल्यावर मी त्यांना विनंती केली की मला लवकर मतदान करू द्या, कारण त्यानंतर मला शेजारच्या 9 किमी अंतरावर असलेल्या मुरंग गावात निवडणुका घेण्यासाठी जायचे होते. त्यांना माझी अडचण आणि उत्साह समजला. म्हणून त्यांनी मला नियोजित वेळेच्या अर्धा तास आधी 6.30 वाजता मतदान करण्याची परवानगी दिली. अशा प्रकारे मी मतदानाचा हक्क बजावला आणि देशाचा पहिला मतदार ठरलो,” असे त्यांनी एकदा सांगितले होते.

टॅग्स :VotingमतदानElectionनिवडणूकIndiaभारत