शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरन नेगी यांचं निधन, २ नोव्हेंबरला केलं होतं अखेरचं मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 09:56 IST

स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरन नेगी यांचं आज सकाळी निधन झालं. त्यांनी आतापर्यंत ३३ वेळा मतदान केलं आहे.

स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरन नेगी यांचे आज सकाळी निधन झाले. हिमाचल प्रदेशातील किन्नौरचे रहिवासी असलेले नेगी 106 वर्षांचे होते. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी 2 नोव्हेंबर रोजी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान केले होते.

देशातील सर्वात वयस्कर मतदार श्याम सरन नेगी नुकतेच रिटर्निंग ऑफिसरला 12-डी फॉर्म परत करून प्रसिद्धीझोतात आले. प्रत्यक्षात मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणार असल्याचे सांगत त्यांनी निवडणूक आयोगाचे फॉर्म परत केले होते. मात्र, त्याच दरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या कल्पा येथील निवासस्थानी जाऊन पोस्टल मतदान घेतले. निवडणूक अधिकाऱ्यांनी 106 वर्षीय नेगी यांच्या घरातच पोस्टल बूथ तयार केला होता आणि त्यांच्यासाठी रेड कार्पेटही टाकले होते. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी आबिद हुसेन यांनी नेगी यांचा टोपी व मफलर देऊन सन्मान केला.

33 वेळा केले मतदानस्वतंत्र भारताचे पहिले मतदार म्हणून ओळखले जाणारे, नेगी यांना भारतीय लोकशाहीचे लिव्हिंग लेजेंडदेखील म्हटले जाते. आपल्या प्रदीर्घ आयुष्यात त्यांनी 33 वेळा मतदान केले. बॅलेट पेपरवरून ईव्हीएममध्ये बदल झाल्याचेही पाहिले. या विधानसभेसाठीही ते मतदानाच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते.

1951 मध्ये पहिल्यांदा मतदान1 जुलै 1917 रोजी किन्नौर जिल्ह्यातील तत्कालीन चिन्नी आणि आता कल्पा या गावात जन्मलेले नेगी हे अनेकदा आठवण करून देत होते की, देशाने 1952 मध्ये स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीत मतदान केले होते, परंतु किन्नौरसह तत्कालीन राज्य व्यवस्थेत 25 ऑक्टोबर 1951 रोजी हिमालयाच्या पर्वतीय भागात जास्त मतदान झाले. कारण भारताच्या इतर भागात फेब्रुवारी-मार्च 1952 मध्ये मतदान होणार होते. किन्नौर सारख्या जास्त हिमवर्षाव असलेल्या ठिकाणी हिवाळा आणि बर्फवृष्टी लक्षात घेऊन आधीच मतदान घेण्यात आले होते.

ऑक्टोबर 1951 मध्ये नेगी यांनी पहिल्यांदाच संसदीय निवडणुकीत मतदान केले. यानंतर त्यांनी एकाही निवडणुकीत आपला सहभाग सोडला नाही. मला माझ्या मताचे महत्त्व माहित आहे, असे नेगी म्हणायचे. शरीर साथ देत नसेल तर आत्मविश्वासाच्या जोरावर मी मतदानाला जात होतो. यावेळीही मतदानाचा अधिकार पूर्ण करणार आहे. या निवडणुकीत माझे हे शेवटचे मतदान असू शकते, अशी भीतीही त्यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती.

असे ठरले पहिले मतदार"माझ्या गावाच्या शेजारच्या गावातल्या शाळेत निवडणुका घेण्यासाठी मी ड्युटीवर होतो. पण माझं मतदान माझ्या गावी, कल्पात होतं. मी आदल्या रात्री माझ्या घरी आलो होतो. पहाटेचे 4 वाजले होते. गोठवणारी थंडी असताना उठून तयार झालो. सकाळी 6 वाजता माझ्या मतदान केंद्रावर पोहोचलो. तेव्हा तिथे एकही मतदार नव्हता. मी अधिकाऱ्यांची वाट बघत होतो. ते आल्यावर मी त्यांना विनंती केली की मला लवकर मतदान करू द्या, कारण त्यानंतर मला शेजारच्या 9 किमी अंतरावर असलेल्या मुरंग गावात निवडणुका घेण्यासाठी जायचे होते. त्यांना माझी अडचण आणि उत्साह समजला. म्हणून त्यांनी मला नियोजित वेळेच्या अर्धा तास आधी 6.30 वाजता मतदान करण्याची परवानगी दिली. अशा प्रकारे मी मतदानाचा हक्क बजावला आणि देशाचा पहिला मतदार ठरलो,” असे त्यांनी एकदा सांगितले होते.

टॅग्स :VotingमतदानElectionनिवडणूकIndiaभारत