शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 15:50 IST

Aishanya Dwivedi : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्या शुभम द्विवेदीची पत्नी ऐशान्या द्विवेदीनेही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या सामन्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

आशिया कपमध्ये १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावरून भाजपा आणि बीसीसीआय विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आहेत. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक क्रिकेटपटूही या सामन्याला विरोध करत आहेत. आता पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्या शुभम द्विवेदीची पत्नी ऐशान्या द्विवेदीनेही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या सामन्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. ऐशान्या म्हणाली की, "पाकिस्तान या सामन्यातून मिळालेले पैसे दहशतवाद्यांवर खर्च करेल, जे पुन्हा आपल्यावर हल्ला करतील. आपण पाकिस्तानला ही संधी का देत आहोत?"

"बीसीसीआयने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना स्वीकारायला नको होता. मला वाटतं की, बीसीसीआय त्या २६ कुटुंबांबद्दल भावनिक नाही. पहलगाममधील नुकसान आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर ते विसरले आहेत. मी आपल्या क्रिकेटपटूंना विचारू इच्छिते की ते असं का करत आहेत? ते पाकिस्तान संघासोबत खेळण्यास का तयार आहेत? असे म्हटले जाते की क्रिकेटपटू देशभक्त असतात."

"पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकावा"

"देशभक्तीच्या या भावनेमुळेच राष्ट्रीय खेळ हॉकीपेक्षा जास्त लोक क्रिकेट पाहण्यास आणि खेळण्यास आवडतात. परंतु १-२ क्रिकेटपटू वगळता कोणीही पुढे येऊन म्हणालं नाही की, आपण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकावा. बीसीसीआय त्यांना बंदुकीच्या धाकावर खेळण्यास भाग पाडू शकत नाही. त्यांनी  देशासाठी उभं राहिलं पाहिजे. परंतु ते तसं करत नाहीत. मी सामन्याच्या प्रायोजकांना आणि प्रसारकांना विचारू इच्छिते की, त्यांचं त्या २६ कुटुंबांबद्दल काही कर्तव्य नाही का?" असं ऐशान्याने म्हटलं आहे.

"पैसे द्याल आणि पुन्हा आमच्यावर हल्ला" 

"पाकिस्तानमध्ये सामन्यातून मिळवलेल्या पैशाचा काय उपयोग होईल? पाकिस्तान त्याचा वापर फक्त दहशतवादासाठी करेल यात शंका नाही. तो एक दहशतवादी देश आहे. तुम्ही त्यांना पैसे द्याल आणि ते पुन्हा आमच्यावर हल्ला करण्यासाठी त्याचा वापर करतील. मला हे समजतं, पण लोकांना हे समजत नाही. म्हणूनच मी लोकांना या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करते. तो पाहण्यासाठी जाऊ नका आणि त्यासाठी तुमचा टीव्ही चालू करू नका."

 "माझा मुद्दा बीसीसीआयपर्यंत पोहोचला नाही"

"पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने म्हटलं होतं की आम्ही पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवणार नाही. आम्ही त्यांच्यासोबत कोणताही क्रिकेट सामना खेळणार नाही. आम्ही त्यांच्या भूमीवर सामना खेळायला जाणार नाही आणि त्यांच्या खेळाडूंना आमच्या भूमीवर पाऊल ठेवू देणार नाही. पण बीसीसीआयने यावरही मार्ग काढला. आशिया कप २०२५ चा हा सामना दुबईमध्ये नियोजित आहे. असंही म्हटलं जात आहे की भारत थेट पाकिस्तानशी खेळत नाही. भारत आशिया कपमध्ये खेळत आहे. मी बीसीसीआयला पाकिस्तानशी हा सामना न खेळण्याचं आवाहनही केलं होतं. पण मला वाटतं की माझा मुद्दा बीसीसीआयपर्यंत पोहोचला नाही" असं म्हणत ऐशान्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानBCCIबीसीसीआयPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्ला