शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
4
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
5
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
6
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
7
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
8
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
9
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
10
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
11
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
12
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
13
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
14
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
15
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
16
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
17
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
18
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
19
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
20
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू

Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 15:50 IST

Aishanya Dwivedi : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्या शुभम द्विवेदीची पत्नी ऐशान्या द्विवेदीनेही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या सामन्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

आशिया कपमध्ये १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावरून भाजपा आणि बीसीसीआय विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आहेत. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक क्रिकेटपटूही या सामन्याला विरोध करत आहेत. आता पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्या शुभम द्विवेदीची पत्नी ऐशान्या द्विवेदीनेही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या सामन्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. ऐशान्या म्हणाली की, "पाकिस्तान या सामन्यातून मिळालेले पैसे दहशतवाद्यांवर खर्च करेल, जे पुन्हा आपल्यावर हल्ला करतील. आपण पाकिस्तानला ही संधी का देत आहोत?"

"बीसीसीआयने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना स्वीकारायला नको होता. मला वाटतं की, बीसीसीआय त्या २६ कुटुंबांबद्दल भावनिक नाही. पहलगाममधील नुकसान आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर ते विसरले आहेत. मी आपल्या क्रिकेटपटूंना विचारू इच्छिते की ते असं का करत आहेत? ते पाकिस्तान संघासोबत खेळण्यास का तयार आहेत? असे म्हटले जाते की क्रिकेटपटू देशभक्त असतात."

"पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकावा"

"देशभक्तीच्या या भावनेमुळेच राष्ट्रीय खेळ हॉकीपेक्षा जास्त लोक क्रिकेट पाहण्यास आणि खेळण्यास आवडतात. परंतु १-२ क्रिकेटपटू वगळता कोणीही पुढे येऊन म्हणालं नाही की, आपण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकावा. बीसीसीआय त्यांना बंदुकीच्या धाकावर खेळण्यास भाग पाडू शकत नाही. त्यांनी  देशासाठी उभं राहिलं पाहिजे. परंतु ते तसं करत नाहीत. मी सामन्याच्या प्रायोजकांना आणि प्रसारकांना विचारू इच्छिते की, त्यांचं त्या २६ कुटुंबांबद्दल काही कर्तव्य नाही का?" असं ऐशान्याने म्हटलं आहे.

"पैसे द्याल आणि पुन्हा आमच्यावर हल्ला" 

"पाकिस्तानमध्ये सामन्यातून मिळवलेल्या पैशाचा काय उपयोग होईल? पाकिस्तान त्याचा वापर फक्त दहशतवादासाठी करेल यात शंका नाही. तो एक दहशतवादी देश आहे. तुम्ही त्यांना पैसे द्याल आणि ते पुन्हा आमच्यावर हल्ला करण्यासाठी त्याचा वापर करतील. मला हे समजतं, पण लोकांना हे समजत नाही. म्हणूनच मी लोकांना या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करते. तो पाहण्यासाठी जाऊ नका आणि त्यासाठी तुमचा टीव्ही चालू करू नका."

 "माझा मुद्दा बीसीसीआयपर्यंत पोहोचला नाही"

"पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने म्हटलं होतं की आम्ही पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवणार नाही. आम्ही त्यांच्यासोबत कोणताही क्रिकेट सामना खेळणार नाही. आम्ही त्यांच्या भूमीवर सामना खेळायला जाणार नाही आणि त्यांच्या खेळाडूंना आमच्या भूमीवर पाऊल ठेवू देणार नाही. पण बीसीसीआयने यावरही मार्ग काढला. आशिया कप २०२५ चा हा सामना दुबईमध्ये नियोजित आहे. असंही म्हटलं जात आहे की भारत थेट पाकिस्तानशी खेळत नाही. भारत आशिया कपमध्ये खेळत आहे. मी बीसीसीआयला पाकिस्तानशी हा सामना न खेळण्याचं आवाहनही केलं होतं. पण मला वाटतं की माझा मुद्दा बीसीसीआयपर्यंत पोहोचला नाही" असं म्हणत ऐशान्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानBCCIबीसीसीआयPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्ला