शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

मुलाचा मृतदेह दाखवा आणि पेन्शन मिळवा; संरक्षण विभागाच्या बिनडोक कारभारामुळे जवानाच्या मातापित्याची परवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 09:22 IST

जर नदीत बुडून, पुरामध्ये किंवा हिमस्खलनाच्या घटनेत एखादा जवान बेपत्ता झाला तर 'बॅटल कॅज्युलिटी' अंतर्गत संबंधित जवानाला मृत म्हणून घोषित केले जाते.

चंदीगड: काही महिन्यांपूर्वी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) दोन जवानांनी सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिकांना मिळणाऱ्या निकृष्ट सुविधांच्या समस्येला वाचा फोडली होती. त्यावेळी देशभरात मोठी खळबळही माजली होती. अनेकजणांनी लष्करी प्रशासनाच्या असंवेदनशील कारभारावर तीव्र नाराजीही व्यक्ती केली होती. परंतु, संबंधितांनी सोयीस्कर मौन बाळगल्यामुळे या प्रकरणाचे पुढे काय झाले, ही बाब अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र, आता एका नव्या प्रकरणाने प्रशासकीय यंत्रणांचा जवानांबाबतचा उदासीन आणि पराकोटीचा असंवेदनशीलपणा समोर आला आहे.संरक्षण मंत्रालयाच्या अकाऊंटस विभागाकडून हा गलथानपणा घडला आहे. यामुळे एका सैनिकाच्या आईवर मुलाचा मृतदेह न मिळाल्यामुळे निवृत्तीवेतनासाठी सरकारी कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत. भारतीय लष्कराच्या जम्मू-काश्मीर रायफल्स या तुकडीतील रिंकू राम हा जवान नोव्हेंबर 2009 मध्ये भारत-चीन सीमेवरील प्रदेशात गस्त घालत असताना नदीत पडला होता. डोंगराळ प्रदेशातील नद्यांचा वेग हा प्रचंड असतो. त्यामुळे एखादी व्यक्ती नदीत पडल्यास तिचा मृतदेह मिळणे, ही अशक्यप्राय बाब असते. रिंकू राम हेदेखील आजपर्यंत बेपत्ता आहेत. जर नदीत बुडून, पुरामध्ये किंवा हिमस्खलनाच्या घटनेत एखादा जवान बेपत्ता झाला तर 'बॅटल कॅज्युलिटी' अंतर्गत संबंधित जवानाला मृत म्हणून घोषित केले जाते. त्याप्रमाणे लष्करानेही रिंकू राम यांना मृत घोषित केले होते. त्यानंतर रिंकू यांची आई कमला देवी यांनी जेव्हा पेन्शनसाठी अर्ज केला तेव्हा त्यांना अत्यंत वाईट अनुभव आला. तुमच्या मुलाचा मृतदेह मिळणार नाही, तोपर्यंत पेन्शन देता येणार नाही, असे उत्तर संरक्षण मंत्रालयातील पेन्शनसंबंधी व्यवहार सांभाळणाऱ्या विभागाकडून त्यांना देण्यात आले. रिंकू राम हे बेपत्ता आहेत, त्यांचा मृत्यू झाल्याचे अजूनपर्यंत सिद्ध झालेले नाही, असा अजब प्रतिवाद सरकारी यंत्रणांकडून केला जात आहे. परिणामी रिंकू राम यांच्या पालकांना 2009 पासून पेन्शन आणि जवानाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीसाठी खेटे घालावे लागत आहेत. दरम्यान, आता याप्रकरणी रिंकू राम यांच्या आईने लष्करी न्यायालयात याचिका दाखल केली असून न्यायालयाने यासंदर्भात स्थगन सूचना जारी केली आहे. या प्रकाराबद्दल अनेक कायदे तज्ज्ञांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या जवानाच्या पालकांनी चीनमध्ये वाहत जाणाऱ्या या नदीत उडी मारून मुलाचा मृतदेह शोधून आणावा, अशी पेन्शन विभागाच्या अधिकाऱ्यांची अपेक्षा आहे का, असा सवाल अनेकांकडून विचारला जात आहे. यापूर्वीही संरक्षण मंत्रालयाच्या अकाऊंटस विभागाचा अनावश्यक तांत्रिकपणा आणि नकारात्मक कार्यपद्धतीमुळे असे प्रसंग उद्भवले आहेत. माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या कार्यकाळात स्थापन झालेल्या तज्ज्ञांच्या समितीने या कारभारावर ताशेरेही ओढले होते. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानDefenceसंरक्षण विभाग