शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
3
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
4
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
5
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
6
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
7
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
8
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
9
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
10
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
11
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
12
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
13
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
14
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
15
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
16
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
17
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
18
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
19
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
20
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान

मुलाचा मृतदेह दाखवा आणि पेन्शन मिळवा; संरक्षण विभागाच्या बिनडोक कारभारामुळे जवानाच्या मातापित्याची परवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 09:22 IST

जर नदीत बुडून, पुरामध्ये किंवा हिमस्खलनाच्या घटनेत एखादा जवान बेपत्ता झाला तर 'बॅटल कॅज्युलिटी' अंतर्गत संबंधित जवानाला मृत म्हणून घोषित केले जाते.

चंदीगड: काही महिन्यांपूर्वी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) दोन जवानांनी सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिकांना मिळणाऱ्या निकृष्ट सुविधांच्या समस्येला वाचा फोडली होती. त्यावेळी देशभरात मोठी खळबळही माजली होती. अनेकजणांनी लष्करी प्रशासनाच्या असंवेदनशील कारभारावर तीव्र नाराजीही व्यक्ती केली होती. परंतु, संबंधितांनी सोयीस्कर मौन बाळगल्यामुळे या प्रकरणाचे पुढे काय झाले, ही बाब अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र, आता एका नव्या प्रकरणाने प्रशासकीय यंत्रणांचा जवानांबाबतचा उदासीन आणि पराकोटीचा असंवेदनशीलपणा समोर आला आहे.संरक्षण मंत्रालयाच्या अकाऊंटस विभागाकडून हा गलथानपणा घडला आहे. यामुळे एका सैनिकाच्या आईवर मुलाचा मृतदेह न मिळाल्यामुळे निवृत्तीवेतनासाठी सरकारी कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत. भारतीय लष्कराच्या जम्मू-काश्मीर रायफल्स या तुकडीतील रिंकू राम हा जवान नोव्हेंबर 2009 मध्ये भारत-चीन सीमेवरील प्रदेशात गस्त घालत असताना नदीत पडला होता. डोंगराळ प्रदेशातील नद्यांचा वेग हा प्रचंड असतो. त्यामुळे एखादी व्यक्ती नदीत पडल्यास तिचा मृतदेह मिळणे, ही अशक्यप्राय बाब असते. रिंकू राम हेदेखील आजपर्यंत बेपत्ता आहेत. जर नदीत बुडून, पुरामध्ये किंवा हिमस्खलनाच्या घटनेत एखादा जवान बेपत्ता झाला तर 'बॅटल कॅज्युलिटी' अंतर्गत संबंधित जवानाला मृत म्हणून घोषित केले जाते. त्याप्रमाणे लष्करानेही रिंकू राम यांना मृत घोषित केले होते. त्यानंतर रिंकू यांची आई कमला देवी यांनी जेव्हा पेन्शनसाठी अर्ज केला तेव्हा त्यांना अत्यंत वाईट अनुभव आला. तुमच्या मुलाचा मृतदेह मिळणार नाही, तोपर्यंत पेन्शन देता येणार नाही, असे उत्तर संरक्षण मंत्रालयातील पेन्शनसंबंधी व्यवहार सांभाळणाऱ्या विभागाकडून त्यांना देण्यात आले. रिंकू राम हे बेपत्ता आहेत, त्यांचा मृत्यू झाल्याचे अजूनपर्यंत सिद्ध झालेले नाही, असा अजब प्रतिवाद सरकारी यंत्रणांकडून केला जात आहे. परिणामी रिंकू राम यांच्या पालकांना 2009 पासून पेन्शन आणि जवानाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीसाठी खेटे घालावे लागत आहेत. दरम्यान, आता याप्रकरणी रिंकू राम यांच्या आईने लष्करी न्यायालयात याचिका दाखल केली असून न्यायालयाने यासंदर्भात स्थगन सूचना जारी केली आहे. या प्रकाराबद्दल अनेक कायदे तज्ज्ञांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या जवानाच्या पालकांनी चीनमध्ये वाहत जाणाऱ्या या नदीत उडी मारून मुलाचा मृतदेह शोधून आणावा, अशी पेन्शन विभागाच्या अधिकाऱ्यांची अपेक्षा आहे का, असा सवाल अनेकांकडून विचारला जात आहे. यापूर्वीही संरक्षण मंत्रालयाच्या अकाऊंटस विभागाचा अनावश्यक तांत्रिकपणा आणि नकारात्मक कार्यपद्धतीमुळे असे प्रसंग उद्भवले आहेत. माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या कार्यकाळात स्थापन झालेल्या तज्ज्ञांच्या समितीने या कारभारावर ताशेरेही ओढले होते. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानDefenceसंरक्षण विभाग