शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

'26/11च्या हल्ल्यानंतर अशी भूमिका घ्यायला हवी होती'

By admin | Published: September 29, 2016 5:18 PM

भारताने पाकिस्तानने केलेल्या उरी हल्ल्यानंतर आता घेतलेली भूमिका ही २६/११ च्या हल्ल्यानंतरच घ्यायला हवी होती.

-सुधीर जटार

भारताने पाकिस्तानने केलेल्या उरी हल्ल्यानंतर आता घेतलेली भूमिका ही २६/११ च्या हल्ल्यानंतरच घ्यायला हवी होती. त्यामुळे आता यासाठी उशीर झाला असे म्हणत असतानाच हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. भारतीय सैन्य अशा प्रकारच्या कारवाईसाठी कायम तयार असते. परंतु आतापर्यंत राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसत आला आहे. आतापर्यंत शत्रू सैन्याने आपल्या एका गालात मारली तर आपण दुसरा गाल पुढे करत होतो, मात्र ही भूमिका अतिशय चुकीची आणि देशासाठी घातक ठरली आहे. आता भारताने घेतलेल्या भूमिकेमुळे भारताचा मान देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावरही निश्चितच वाढणार आहे. येत्या काळातही भारताने आता स्वीकारलेले धोरण कायम ठेवल्यास ते निश्चितच फायदेशीर ठरू शकेल. आताही भारताने घेतलेल्या भूमिकेत आंतरराष्ट्रीय सीमा पार केलेल्या नसून केवळ नियंत्रण रेषा पार केली आहे. यातही आपण आता पाकिस्तानवर हल्ला केला नसून दहशतवाद्यांवर हल्ला केला आहे हे समजून घ्यायला हवे. हे दहशतवादी तालिबान आणि अल कायद्याचे असल्याचे याआधीही अनेकदा स्पष्ट झाले आहे. मात्र आताच्या कारवाईत दोन पाकिस्तानी अतिरेकी कसे सापाडले हा प्रश्न आहे. त्यामुळे हे पाकिस्तानी अतिरेकी या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत नव्हते ना हेही पहायला हवे. त्यामुळे दहशतवादी भारताला वारंवार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. तरीही भारताने आपली भूमिका मागे न घेता त्यावर ठाम रहायला हवे. येत्या काळात कारगिलप्रमाणे युद्ध होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मात्र भारतीय सैन्याने आता अतिशय दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. काश्मिरमध्ये ज्या भागात आता कारवाया चालू आहेत तो भाग अतिशय जोखमीचा असून अतिशय काळजीपूर्वक पाऊले टाकावी लागणार आहेत. लेखक संरक्षण विषयातील तज्ज्ञ असून त्यांनी १९७७ ते ८१ या काळात काश्मिर खोऱ्यातील सैन्यात त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आाहे. तसेच १९७१ मध्ये जम्मू- काश्मीर येथील पूंच येथे झालेल्या युद्धातही त्यांचा सहभाग होता. संरक्षण विषयातील अनेक शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे कामही ते मागील अनेक वर्षांपासून करत आहेत.- लेखक संरक्षण विषयातील तज्ज्ञ आणि मेजर जनरल(निवृत्त) आहेत