शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

सचिवपदावर पोहोचलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनाही आरक्षण असावे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 05:04 IST

एखाद्या जातीला ५० वर्षांहून अधिक काळपर्यंत मागासवर्गीय म्हणून सवलती मिळत असतील, त्याआधारे एखादी व्यक्ती वरिष्ठ पदापर्यंत पोहोचली असेल, तर तिला व तिच्या कुटुंबीयांना वा अशा वर्गाला क्रिमिलेअर समजू नये का

नवी दिल्ली : एखादी मागासवर्गीय व्यक्ती आरक्षणामुळे आयएएस झाली व पदोन्नतीद्वारे ती सचिवपदापर्यंत पोहोचली, तर त्याच्या नातवाला वा पणतुला आरक्षणाद्वारे नोकरी देणे कितपत योग्य आहे, त्याला केवळ मागासवर्गीय म्हणून नोकरीसाठी गृहित धरावे काय, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केला आहे. अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांना नोकऱ्यांमध्ये पदोन्नती देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिकेची सुनावणी सुरू असताना न्यायालयाने हा सवाल केला.

सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला केला सवाल

एखाद्या जातीला ५० वर्षांहून अधिक काळपर्यंत मागासवर्गीय म्हणून सवलती मिळत असतील, त्याआधारे एखादी व्यक्ती वरिष्ठ पदापर्यंत पोहोचली असेल, तर तिला व तिच्या कुटुंबीयांना वा अशा वर्गाला क्रिमिलेअर समजू नये का, अशा व्यक्तींच्या पुढील पिढ्यांच्या रोजगाराबाबत आरक्षण असावे काय, असा सवालही सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने केला. आरक्षण देण्यामागील कल्पनाच मुळी सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या समाजघटकांना मुख्य प्रवाहात आणणे, त्यासाठी मदत करणे हा हेतू होता. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम समाजघटकांसाठी आरक्षण देण्याचा हेतू कधीच नव्हता, असेही न्यायालयाने नमूद केले. या खंडपीठात न्या. कुरियन जोसेफ, न्या. इंदू मल्होत्रा व न्या. एस. के. कौल यांचा समावेश आहे. अनुसूचित जाती व जमातींना सरकारी नोकºयांमध्ये आरक्षण देताना क्रिमीलेअरचे तत्त्व लागू करता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने २००६ साली एम. नागराज प्रकरणात दिला होता.या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि पदोन्नतीमध्ये आरक्षण कायम असावे, अशी विनंती केंद्र सरकारतर्फे अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी केली.आजही उपेक्षानागराज प्रकरणामुळे अनुसूचित जाती व जमातींना आजही उपेक्षा सहन करावी लागत आहे. नागराज प्रकरणातील निकालामुळे या जाती-जमातींना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळेनासे झाले आहे. त्यामुळे या वर्गाला क्रिमीलेअरचे तत्व लागता कामा नये.ते केवळ ओबीसींसाठीच असून, तेवढेच मर्यादित राहावे, असाही युक्तिवाद केंद्र सरकारतर्फे करण्यात आला. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयreservationआरक्षणCourtन्यायालय