शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

"अफझल गुरुला पुष्पहार घातला असता का?", ओमर अब्दुल्ला यांच्या वक्तव्यावर राजनाथ सिंह संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 16:38 IST

Rajnath Singh : रामबनमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचे सरकार स्थापन करण्याचे आवाहन केले.

Rajnath Singh On Omar Abdullah Remark: जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तशी राजकीय नेत्यांची एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू झाल्या आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी नॅशनल कॉन्फरन्सवर निशाणा साधत दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती असल्याचे सांगितले. तसेच, जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आणि संसद हल्ल्याचा मास्टरमाईंड अफजल गुरू याच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल ओमर अब्दुल्ला यांना सवाल विचारला.

रामबनमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचे सरकार स्थापन करण्याचे आवाहन केले. यावेळी अफजल गुरूला पुष्पहार घालायला हवा होता का? असा सवाल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला. ते म्हणाले, "नॅशनल कॉन्फरन्सने दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती दाखवली आहे. मी अलीकडेच ओमर अब्दुल्ला यांना असे म्हणताना ऐकले आहे की, अफजल गुरूला फाशी द्यायला नको होती."

पुढे राजनाथ सिंह म्हणाले, "नॅशनल कॉन्फरन्स कलम ३७० पुन्हा लागू करण्याविषयी बोलत आहे, परंतु गेल्या पाच वर्षांत ४० हजार नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये आमचे सरकार आल्यानंतर आम्ही विकास कामं करू, जेणेकरून पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील लोकांना भारताचा भाग व्हायला आवडेल. पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) जनतेला पाकिस्तान परदेशी समजतो, तर पीओके भारताचा भाग आहे. पाकिस्तानचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणाले आहेत की, पीओके ही परदेशी भूमी आहे. पीओकेच्या लोकांना मी सांगू इच्छितो की, भारत त्यांना आपला मानतो."

काय म्हणाले ओमर अब्दुल्ला?दरम्यान, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शुक्रवारी (८ सप्टेंबर) अफजल गुरूवर वक्तव्य करून राजकीय वाद निर्माण केला होता. संसद हल्ल्यातील दोषी अफझल गुरूला फाशी देऊन कोणताही हेतू साध्य झाला नाही, असे त्यांनी म्हटले होते. ओमर अब्दुल्ला म्हणाले, "जम्मू आणि काश्मीर सरकारचा अफझल गुरूच्या फाशीशी काहीही संबंध नाही. जर असता तर राज्य सरकारच्या परवानगीने असे केले असते आणि जम्मू-काश्मीर सरकारने त्याला मान्यता दिली नसती."

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहJammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपाOmar Abdullahउमर अब्दुल्ला