शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

"अफझल गुरुला पुष्पहार घातला असता का?", ओमर अब्दुल्ला यांच्या वक्तव्यावर राजनाथ सिंह संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 16:38 IST

Rajnath Singh : रामबनमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचे सरकार स्थापन करण्याचे आवाहन केले.

Rajnath Singh On Omar Abdullah Remark: जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तशी राजकीय नेत्यांची एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू झाल्या आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी नॅशनल कॉन्फरन्सवर निशाणा साधत दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती असल्याचे सांगितले. तसेच, जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आणि संसद हल्ल्याचा मास्टरमाईंड अफजल गुरू याच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल ओमर अब्दुल्ला यांना सवाल विचारला.

रामबनमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचे सरकार स्थापन करण्याचे आवाहन केले. यावेळी अफजल गुरूला पुष्पहार घालायला हवा होता का? असा सवाल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला. ते म्हणाले, "नॅशनल कॉन्फरन्सने दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती दाखवली आहे. मी अलीकडेच ओमर अब्दुल्ला यांना असे म्हणताना ऐकले आहे की, अफजल गुरूला फाशी द्यायला नको होती."

पुढे राजनाथ सिंह म्हणाले, "नॅशनल कॉन्फरन्स कलम ३७० पुन्हा लागू करण्याविषयी बोलत आहे, परंतु गेल्या पाच वर्षांत ४० हजार नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये आमचे सरकार आल्यानंतर आम्ही विकास कामं करू, जेणेकरून पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील लोकांना भारताचा भाग व्हायला आवडेल. पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) जनतेला पाकिस्तान परदेशी समजतो, तर पीओके भारताचा भाग आहे. पाकिस्तानचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणाले आहेत की, पीओके ही परदेशी भूमी आहे. पीओकेच्या लोकांना मी सांगू इच्छितो की, भारत त्यांना आपला मानतो."

काय म्हणाले ओमर अब्दुल्ला?दरम्यान, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शुक्रवारी (८ सप्टेंबर) अफजल गुरूवर वक्तव्य करून राजकीय वाद निर्माण केला होता. संसद हल्ल्यातील दोषी अफझल गुरूला फाशी देऊन कोणताही हेतू साध्य झाला नाही, असे त्यांनी म्हटले होते. ओमर अब्दुल्ला म्हणाले, "जम्मू आणि काश्मीर सरकारचा अफझल गुरूच्या फाशीशी काहीही संबंध नाही. जर असता तर राज्य सरकारच्या परवानगीने असे केले असते आणि जम्मू-काश्मीर सरकारने त्याला मान्यता दिली नसती."

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहJammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपाOmar Abdullahउमर अब्दुल्ला