शहरं
Join us  
Trending Stories
1
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
2
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
4
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
5
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
6
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”; मंत्री चंद्रकांत पाटील
7
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
8
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
9
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
10
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
11
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
12
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
13
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
14
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
15
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
16
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
17
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
18
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
19
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
20
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 17:41 IST

गेल्या तीन वर्षांत २०हून अधिक तरुणांशी बनावट विवाह करून त्यांच्या घरातील मौल्यवान वस्तू आणि पैसे लंपास केल्याची धक्कादायक कबुली टोळीतील महिलांनी दिली आहे.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. खुलदाबाद पोलिसांनी शनिवारी एका फसवणूक करणाऱ्या 'वधू टोळी'ला अटक केली असून, या टोळीत चार महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षांत २०हून अधिक तरुणांशी बनावट विवाह करून त्यांच्या घरातील मौल्यवान वस्तू आणि पैसे लंपास केल्याची धक्कादायक कबुली टोळीतील महिलांनी दिली आहे.

लग्नाचे आमिष दाखवून फसवणूकपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीचा प्रमुख उद्देश असा होता की, ते लग्नाची इच्छा असलेल्या आणि विवाह न झालेल्या तरुणांना हेरत. बनावट नातेवाईक, खोटे कागदपत्र आणि नकली घर दाखवून, हे लोक वराच्या कुटुंबीयांचा विश्वास संपादन करत. त्यानंतर नकली विवाह केला जाई आणि विवाहाच्या काही दिवसांतच वधू घरातील सगळ्या मौल्यवान वस्तूंसह गायब होत असे.

राजस्थानपासून प्रयागराजपर्यंतचा फसवणुकीचा प्रवासया टोळीविरोधात कारवाईची सुरुवात राजस्थानमधील अलवर येथील गोपाल गुर्जर यांच्या तक्रारीनंतर झाली. त्यांनी खुलदाबाद पोलीस ठाण्यात तक्रार केली की, त्यांच्या मुलाची लग्नाच्या नावाखाली १.७५ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.

खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनंतर, पोलिसांनी शहाना (करेली), निशा कुमारी आणि प्रीती देवी (पिपलगाव), ममता भारतीय (झुंसी), आसिफ आणि मोहम्मद जैनुल (शाहगंज), आणि श्रीराम गुर्जर (अलवर, राजस्थान) या सात जणांना अटक केली.

टोळीच्या कारभाराची पद्धत काय?या 'वधू टोळी'ची कार्यपद्धती विशेष होती. एक सदस्य लग्न इच्छुक तरुणांची माहिती गोळा करायचा, ती माहिती टोळीपर्यंत पोहोचवली जायची. नंतर, टोळीतील महिला वधू म्हणून सादर केल्या जायच्या. त्यांचे नातेवाईक म्हणून टोळीचेच पुरुष सदस्य सहभागी व्हायचे. लग्नानंतर वधू संधी मिळताच पैसे, दागिने घेऊन घरातून पळून जायची.

काही प्रसंगी, वधू ट्रेनने सासरी जात असताना मध्येच उतरून पळून जात असे, तर काही वेळा सासरी पोहोचल्यावर मध्यरात्रीची वेळ साधून गायब होत असे. एवढेच नव्हे तर, वधू परत आली नाही तर तक्रार करणाऱ्यांनाच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जायची. 

काय जप्त केलं गेलं?पोलिसांनी टोळीकडून सहा बनावट आधार कार्ड आणि ३५,००० रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. चौकशीत आणखी प्रकरणे समोर येण्याची शक्यता असून तपास अधिक खोलवर चालू आहे. पोलिसांच्या तपासानुसार, ही टोळी केवळ प्रयागराज नव्हे तर इतर जिल्ह्यांमध्येही सक्रिय होती. त्यांचा नेटवर्क मजबूत असून, पांढरपेशा वर्तुळातील काहीजणही यामध्ये सामील असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश