शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
4
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
5
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
6
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
7
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
8
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
9
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
10
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
11
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
12
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
13
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
14
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
15
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
16
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
17
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
18
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
19
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
20
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 

धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 17:41 IST

गेल्या तीन वर्षांत २०हून अधिक तरुणांशी बनावट विवाह करून त्यांच्या घरातील मौल्यवान वस्तू आणि पैसे लंपास केल्याची धक्कादायक कबुली टोळीतील महिलांनी दिली आहे.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. खुलदाबाद पोलिसांनी शनिवारी एका फसवणूक करणाऱ्या 'वधू टोळी'ला अटक केली असून, या टोळीत चार महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षांत २०हून अधिक तरुणांशी बनावट विवाह करून त्यांच्या घरातील मौल्यवान वस्तू आणि पैसे लंपास केल्याची धक्कादायक कबुली टोळीतील महिलांनी दिली आहे.

लग्नाचे आमिष दाखवून फसवणूकपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीचा प्रमुख उद्देश असा होता की, ते लग्नाची इच्छा असलेल्या आणि विवाह न झालेल्या तरुणांना हेरत. बनावट नातेवाईक, खोटे कागदपत्र आणि नकली घर दाखवून, हे लोक वराच्या कुटुंबीयांचा विश्वास संपादन करत. त्यानंतर नकली विवाह केला जाई आणि विवाहाच्या काही दिवसांतच वधू घरातील सगळ्या मौल्यवान वस्तूंसह गायब होत असे.

राजस्थानपासून प्रयागराजपर्यंतचा फसवणुकीचा प्रवासया टोळीविरोधात कारवाईची सुरुवात राजस्थानमधील अलवर येथील गोपाल गुर्जर यांच्या तक्रारीनंतर झाली. त्यांनी खुलदाबाद पोलीस ठाण्यात तक्रार केली की, त्यांच्या मुलाची लग्नाच्या नावाखाली १.७५ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.

खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनंतर, पोलिसांनी शहाना (करेली), निशा कुमारी आणि प्रीती देवी (पिपलगाव), ममता भारतीय (झुंसी), आसिफ आणि मोहम्मद जैनुल (शाहगंज), आणि श्रीराम गुर्जर (अलवर, राजस्थान) या सात जणांना अटक केली.

टोळीच्या कारभाराची पद्धत काय?या 'वधू टोळी'ची कार्यपद्धती विशेष होती. एक सदस्य लग्न इच्छुक तरुणांची माहिती गोळा करायचा, ती माहिती टोळीपर्यंत पोहोचवली जायची. नंतर, टोळीतील महिला वधू म्हणून सादर केल्या जायच्या. त्यांचे नातेवाईक म्हणून टोळीचेच पुरुष सदस्य सहभागी व्हायचे. लग्नानंतर वधू संधी मिळताच पैसे, दागिने घेऊन घरातून पळून जायची.

काही प्रसंगी, वधू ट्रेनने सासरी जात असताना मध्येच उतरून पळून जात असे, तर काही वेळा सासरी पोहोचल्यावर मध्यरात्रीची वेळ साधून गायब होत असे. एवढेच नव्हे तर, वधू परत आली नाही तर तक्रार करणाऱ्यांनाच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जायची. 

काय जप्त केलं गेलं?पोलिसांनी टोळीकडून सहा बनावट आधार कार्ड आणि ३५,००० रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. चौकशीत आणखी प्रकरणे समोर येण्याची शक्यता असून तपास अधिक खोलवर चालू आहे. पोलिसांच्या तपासानुसार, ही टोळी केवळ प्रयागराज नव्हे तर इतर जिल्ह्यांमध्येही सक्रिय होती. त्यांचा नेटवर्क मजबूत असून, पांढरपेशा वर्तुळातील काहीजणही यामध्ये सामील असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश