शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 17:41 IST

गेल्या तीन वर्षांत २०हून अधिक तरुणांशी बनावट विवाह करून त्यांच्या घरातील मौल्यवान वस्तू आणि पैसे लंपास केल्याची धक्कादायक कबुली टोळीतील महिलांनी दिली आहे.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. खुलदाबाद पोलिसांनी शनिवारी एका फसवणूक करणाऱ्या 'वधू टोळी'ला अटक केली असून, या टोळीत चार महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षांत २०हून अधिक तरुणांशी बनावट विवाह करून त्यांच्या घरातील मौल्यवान वस्तू आणि पैसे लंपास केल्याची धक्कादायक कबुली टोळीतील महिलांनी दिली आहे.

लग्नाचे आमिष दाखवून फसवणूकपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीचा प्रमुख उद्देश असा होता की, ते लग्नाची इच्छा असलेल्या आणि विवाह न झालेल्या तरुणांना हेरत. बनावट नातेवाईक, खोटे कागदपत्र आणि नकली घर दाखवून, हे लोक वराच्या कुटुंबीयांचा विश्वास संपादन करत. त्यानंतर नकली विवाह केला जाई आणि विवाहाच्या काही दिवसांतच वधू घरातील सगळ्या मौल्यवान वस्तूंसह गायब होत असे.

राजस्थानपासून प्रयागराजपर्यंतचा फसवणुकीचा प्रवासया टोळीविरोधात कारवाईची सुरुवात राजस्थानमधील अलवर येथील गोपाल गुर्जर यांच्या तक्रारीनंतर झाली. त्यांनी खुलदाबाद पोलीस ठाण्यात तक्रार केली की, त्यांच्या मुलाची लग्नाच्या नावाखाली १.७५ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.

खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनंतर, पोलिसांनी शहाना (करेली), निशा कुमारी आणि प्रीती देवी (पिपलगाव), ममता भारतीय (झुंसी), आसिफ आणि मोहम्मद जैनुल (शाहगंज), आणि श्रीराम गुर्जर (अलवर, राजस्थान) या सात जणांना अटक केली.

टोळीच्या कारभाराची पद्धत काय?या 'वधू टोळी'ची कार्यपद्धती विशेष होती. एक सदस्य लग्न इच्छुक तरुणांची माहिती गोळा करायचा, ती माहिती टोळीपर्यंत पोहोचवली जायची. नंतर, टोळीतील महिला वधू म्हणून सादर केल्या जायच्या. त्यांचे नातेवाईक म्हणून टोळीचेच पुरुष सदस्य सहभागी व्हायचे. लग्नानंतर वधू संधी मिळताच पैसे, दागिने घेऊन घरातून पळून जायची.

काही प्रसंगी, वधू ट्रेनने सासरी जात असताना मध्येच उतरून पळून जात असे, तर काही वेळा सासरी पोहोचल्यावर मध्यरात्रीची वेळ साधून गायब होत असे. एवढेच नव्हे तर, वधू परत आली नाही तर तक्रार करणाऱ्यांनाच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जायची. 

काय जप्त केलं गेलं?पोलिसांनी टोळीकडून सहा बनावट आधार कार्ड आणि ३५,००० रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. चौकशीत आणखी प्रकरणे समोर येण्याची शक्यता असून तपास अधिक खोलवर चालू आहे. पोलिसांच्या तपासानुसार, ही टोळी केवळ प्रयागराज नव्हे तर इतर जिल्ह्यांमध्येही सक्रिय होती. त्यांचा नेटवर्क मजबूत असून, पांढरपेशा वर्तुळातील काहीजणही यामध्ये सामील असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश