शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! सामुहिक विवाह सोहळ्यापूर्वी प्रेग्नंसी टेस्ट, अनेक वधू निघाल्या गर्भवती, काँग्रेसची सरकारवर टीका   

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 13:59 IST

Madhya Pradesh News: मध्य प्रदेश सरकारकडून आयोजित सामुहिक विवाह सोहळ्यादरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या विवाह सोहळ्यादरम्यान वधूंची प्रेग्नंसटी टेस्ट करण्यात आल्याने त्यावरून वादाला तोंड फुटले आहे.

मध्य प्रदेश सरकारकडून आयोजित सामुहिक विवाह सोहळ्यादरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या विवाह सोहळ्यादरम्यान वधूंची प्रेग्नंसटी टेस्ट करण्यात आल्याने त्यावरून वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेसने हा गरीबांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. तसेच कुठल्या गाइडलाइननुसार या चाचण्या करण्यात आल्या,  असा सवाल काँग्रेसने विचारला आहे. 

दरम्यान, डिंडोरीचे कलेक्टर विकास मिश्रा यांनी सांगितले की, प्रेग्नंसी टेस्टसाठी प्रशासनाकडून कुठल्याही सूचना देण्यात आल्या नव्हत्या. मात्र कार्यक्रमादरम्यान, काही वधूंनी स्त्रीरोगासंदर्भात तक्कार केल्याने, त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. 

अक्षय तृतियेच्या मुहुर्तावर शनिवारी मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेंतर्गत डिंडोरी जिल्ह्यातील गदासराय येथे २१९ जोडप्यांचा विवाह होणार होता. या सामुहिक विवाह सोहळ्यादरम्यान अॅनिमियाच्या तपासणीची सूचना देण्यात आली होती, असे विकास मिश्रा यांनी सांगितले. विकास मिश्रा यांनी सांगितलं की, मेडिकल तपासणीदरम्यान, काही वधूंनी मासिक पाळी संदर्भातील समस्यांची तक्रार केली. त्यावेळी या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी अशा तक्रारी करणाऱ्या महिलांची प्रेग्नंसी टेस्ट केली.

त्यांनी सांगितले की, प्रशासनाकडून प्रेग्नंसी टेस्ट करण्याचे कुठलेही आदेश देण्यात आले नव्हते. मेडिकल टेस्टमध्ये चार महिला गर्भवती असल्याचे आढळून आले. त्यांना विवाहाची परवानगी देण्यात आली नाही. मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेंतर्गत राज्य सरकारकडून पात्र जोडप्यांना ५६,०० रुपयांपर्यंत मदत देण्यात येते.

दरम्यान, या प्रकारावरून काँग्रेसने सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे.  २०० हून अधिक मुलींची प्रेग्नंसी टेस्ट करण्याच आल्याचे ऐकले आहे. हे खरं आहे का हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं. जर हे खरं असेल तर मध्य प्रदेशमधील मुलींचा हा घोर अपमान कुणाच्या आदेशावरून करण्यात आला, असा सवाल त्यांनी विचारला आहे. 

टॅग्स :marriageलग्नMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेस