शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

शॉकिंग ! ... हा तर मृतदेहांचा अन् माणूसकीचा अपमान, प्रियंका गांधींनी शेअर केला तो व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 16:13 IST

उन्नाव, कनौज, कानपूर, रायबरेली यांच्या पाठोपाठ आता संगमनगरी अशी ओळख असलेल्या प्रयागराजमध्ये असलेल्या गंगा नदीच्या तिरावर अनेक मृतदेह पुरण्यात आले आहेत.

ठळक मुद्देउन्नाव, कनौज, कानपूर, रायबरेली यांच्या पाठोपाठ आता संगमनगरी अशी ओळख असलेल्या प्रयागराजमध्ये असलेल्या गंगा नदीच्या तिरावर अनेक मृतदेह पुरण्यात आले आहेत.

प्रयागराज - देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र, अनेक राज्यांमधील परिस्थिती अद्यापही नियंत्रणाबाहेर आहे. आरोग्य यंत्रणा कोलमडल्यानं रुग्णांचे हाल होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. उपचार मिळत नसल्यानं रुग्णांचे हाल सुरूच आहेत. कोरोनामुळे मृत पावल्यानंतरही हालअपेष्टा काही संपताना दिसत नाही. उत्तर प्रदेशात मृतदेहांची विटंबना झाल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी याबाबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

उन्नाव, कनौज, कानपूर, रायबरेली यांच्या पाठोपाठ आता संगमनगरी अशी ओळख असलेल्या प्रयागराजमध्ये असलेल्या गंगा नदीच्या तिरावर अनेक मृतदेह पुरण्यात आले आहेत. गेल्या दीड महिन्यांत नदीच्या किनाऱ्यावर शेकडो मृतदेह पुरले गेले आहेत. अजूनही दररोज नदी किनारी असलेल्या वाळूत मृतदेह पुरले जात आहेत. मृतदेह पुरले गेल्यानंतर त्याच्या चारही बाजूंनी बांबू उभारण्यात येत आहेत. मृतदेह पुरण्यात आल्याचं इतरांना समजावं यासाठी त्याच्या बाजूला बांबू लावण्यात आले आहेत. आता, याच मृतदेहांच्या अंगावरील वस्त्रही काढून नेण्यात येत असल्याचा व्हिडिओ प्रियंका गांधी यांनी ट्विट केला आहे. 

जिवंत असताना नीटनेटका उपचार मिळत नाही, सन्मानाने अंत्यंसस्कार होत नाही. सरकारी आकड्यांमध्येही जागा मिळेना. आत स्मशानातून रामनामीही काढून घेण्यात येत आहे, असे म्हणत प्रियंका गांधींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

अग्नीदेण्याऐवजी पुरले मृतदेह

हिंदू धर्मात मृतदेहांना अग्नी दिला जातो. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर प्रदेशातील मृतांचा आकडा झपाट्यानं वाढला आहे. त्यामुळे काही भागांत अंत्यविधीसाठी लाकडंदेखील मिळत नाहीत. प्रयागरासोबतच प्रतापगड, सुलतानपूर आणि फैजाबादमध्ये मृतांचा आकडा वाढला आहे. या ठिकाणी दिवसाला ५० ते ६० जणांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. एप्रिल महिन्यात श्रृंगवेरपुर घाटात दररोज शेकडो जणांवर अंत्यसंस्कार केले जात होते. लाकडांची टंचाई जाणवू लागल्यानं कंत्राटदारांनी लोकांकडून जास्त पैसे घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे लोकांनी मृतदेहांना अग्नी देण्याऐवजी ते पुरण्यास सुरुवात केली. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीVaranasiवाराणसीUttar Pradeshउत्तर प्रदेशcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू