शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! करवा चौथचा उपवास न ठेवल्याने पत्नीला चाकूने भोसकले, नंतर इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 11:34 IST

करवा चौथचा उपवास ठेवला नाही या क्षुल्लक कारणावरुन पतीने पत्नीला चाकूने भोसकलं असल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे. पत्नीला चाकून भोसकल्यानंतर पतीने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली.

ठळक मुद्देकरवा चौथचा उपवास ठेवला नाही या क्षुल्लक कारणावरुन पतीने पत्नीला चाकूने भोसकलंपत्नीला चाकूने भोसकल्यानंतर पतीने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केलीपीडित पत्नीला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, उपचार सुरु आहेत

नवी दिल्ली - करवा चौथचा उपवास ठेवला नाही या क्षुल्लक कारणावरुन पतीने पत्नीला चाकूने भोसकलं असल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे. पत्नीला चाकूने भोसकल्यानंतर पतीने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. दिल्लीमधील रोहिनी परिसरात रविवारी ही घटना घडली. पत्नीने करवा चौथचा उपवास ठेवला नाही यावरुन दोघांमध्ये भांडण झालं. याच संतापात पतीने पत्नीवर चाकूने वार केले आणि त्यानंतर स्वत: इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. यावेळी त्यांची चार वर्षांची मुलगीही तिथेच उपस्थित होती. 

पीडित पत्नीला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, उपचार सुरु आहेत. दरम्यान पती जसविंदर सिंग याचा रुग्णालयात नेण्यापुर्वीच मृत्यू झाला होता. दांपत्याचा घटस्फोट झाला होता आणि त्यानंतर त्यांनी वेगळं राहण्यास सुरुवात केली होती. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जसविंदर सिंग गेल्या एक महिन्यापासून आपली पत्नी आणि मुलीपासून विभक्त झाला होता. आपल्या मुलीला भेटण्यासाठी तो घरी गेला होता. न्यायालयाने त्याला विकेण्डला मुलीला भेटण्याची परवानगी दिलेली होती. जसविंदर सिंग घरी पोहोचला तेव्हा त्याच्या पत्नीचे दोन भाऊ घरात उपस्थित होते. आपल्याला काहीचरी महत्वाचं बोलायचं आहे असं सांगत त्याने पत्नीला गच्चीवर नेले. यावेळी त्यांची चार वर्षांची मुलगीही मागोमाग गच्चीत गेली. दोघांमध्ये बोलणं चालू असताना भांडणाला सुरुवात झाली. याचवेळी जसविंदर सिंगने चाकूने पत्नीवर वार केले. जखमी अवस्थेत पत्नीने खाली धाव घेतली. 

आरडाओरड ऐकल्यानंतर शेजा-यांनी मदतीसाठी धाव घेतली. त्याचदरम्यान जसविंदर सिंगने चौथ्या माळ्यावरुन उडी मारली. खाली पडल्यानंतर जसविंदर सिंग डोक्यावर आदळला. पतीने गच्चीतून उडी मारल्याचं पाहताच पत्नीने खाली धाव घेतली तेव्हा जसविंदर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. ते दृश्य पाहून पत्नी जाग्यावरच बेशुद्ध पडली. 

शेजा-याने रात्री 12.30 वाजता पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. जसविंदर सिंगने उडी मारल्यानंतर आधी तो एका गाडीवर पडला, त्यानंतर खाली जमिनीवर आपटला. के एन काटजू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

जसविंदर सिंग एका खासगी कंपनीत खरेदी-विक्री एजंट म्हणून काम करत होता. गेल्या एक महिन्यापासून आपल्या आई-वडिलांसोबत तो राहत होता. त्याला आपल्या मुलीची खूप आठवण यायची असं त्याच्या आई-वडिलांनी सांगितलं आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. 

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हाPoliceपोलिसNew Delhiनवी दिल्ली