शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

धक्कादायक! भारतात उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या १८ कोटींवर; WHO ने जारी केली आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 20:24 IST

जीवनशैलीच्या आजारांमुळे अकाली मृत्यूंची संख्या अंदाजे 22 टक्के

Indians, Blood Pressure: जागतिक आरोग्य संघटनेने जगभरातील उच्च रक्तदाब रुग्णांची आतापर्यंतची सर्वात मोठी आकडेवारी जाहीर केली आहे. आकडेवारीनुसार, 1990 ते 2019 दरम्यान उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. उच्च रक्तदाबाचे रुग्ण 1990 मध्ये 65 कोटींवरून 2019 मध्ये 130 कोटींवर पोहोचले आहेत. त्यापैकी 1 कोटी 80 लाख लोकांचा केवळ उच्च रक्तदाबामुळेच अकाली मृत्यू झाल्याची माहिती आहे. म्हणजेच त्यांचे बीपी नियंत्रणात असते तर आज हे लोक दगावले नसते असे तज्ज्ञांचे मत आहे. भारताबद्दल बोलायचे झाल्यास तब्बल 18 कोटी 80 लाख उच्च रक्तदाबाचे रुग्ण आहेत.

 जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांपैकी अर्ध्या रुग्णांना उच्च रक्तदाब असल्याचे माहीत नसते. जगातील 30 ते 79 वर्षे वयोगटातील उच्च रक्तदाब रुग्णांपैकी केवळ अर्धे म्हणजे 54% असे आहेत ज्यांना उच्च रक्तदाब असल्याचे माहित आहे. उच्च रक्तदाबावर उपचार घेत असलेल्यांची संख्या 42% आहे. जगात असे फक्त २१% रुग्ण आहेत ज्यांचा रक्तदाब नियंत्रणात आहे.

अहवालात काय आहे माहिती?

  • 5 पैकी 4 लोकांना योग्य उपचार मिळत नाहीत
  • जगातील प्रत्येक 3 पैकी 1 व्यक्ती उच्च रक्तदाबाचा रुग्ण
  • 50 टक्के रूग्णांना उच्च रक्तदाब असल्याची माहितीच नसते
  • उच्च रक्तदाबामुळे स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका, किडनी खराब होण्याचा धोका

WHO च्या 2019 च्या आकडेवारीनुसार, भारतात 18 कोटी 80 लाख उच्च रक्तदाबाचे रुग्ण आहेत. यापैकी ३७ टक्के रुग्णांना त्यांच्या आजाराची माहिती आहे. 30 टक्के उच्च रक्तदाबावर उपचार घेत आहेत. भारतातील केवळ 15 टक्के रुग्णांचा रक्तदाब नियंत्रणात आहे. डब्ल्यूएचओच्या अंदाजानुसार, जीवनशैलीच्या आजारांमुळे अकाली मरण पावलेल्या लोकांची एकूण अंदाजे संख्या 22% आहे. यापैकी २५% पुरुष आणि १९% महिला असतील.

2019 च्या आकडेवारीनुसार, भारतात 25 लाख 66 हजार लोक हृदयविकाराचे बळी ठरले आहेत. त्यापैकी 14 लाख 51 हजार पुरुष आणि 11 लाख 16 हजार महिला आहेत. 2019 मध्ये भारतात हृदयविकारामुळे झालेल्या 52% मृत्यूंमागे उच्च रक्तदाब हे सर्वात मोठे कारण होते. मरण पावलेल्यांपैकी ५१% पुरुष आणि ५४% महिला होत्या.

टॅग्स :Healthआरोग्यWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाIndiaभारत