शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

शिवसेना खासदार संजय राऊत उवाच; व्यंकय्या नायडू नियमानुसारच वागले, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 17:13 IST

उदयराजेंनी दिलेल्या घोषणांना उपराष्ट्रपतींनी आक्षेप घेतल्यानं नवा वाद; महाविकासआघाडीकडून भाजपा लक्ष्य

मुंबई: 'जय भवानी, जय शिवाजी' घोषणेला राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी सभागृहात घेतलेल्या आक्षेपावरून जोरदार राजकारण सुरू झालं आहे. या मुद्द्यावरून विरोधकांकडून भाजपाला लक्ष्य केलं जात असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यंकय्या नायडू यांना क्लीन चिट दिली आहे. 'व्यंकय्या नायडू हे सभागृहाच्या नियमानुसार वागले, पण छत्रपती शिवरायांबद्दल आमच्या काही भावना आहेत. त्या आम्ही मांडत आहोत, असं राऊत म्हणाले. 'जय भवानी, जय शिवाजी' ही घोषणा जय हिंद आणि वंदे मातरम् इतकीच महत्त्वाची असल्याचं त्यांनी म्हटलं.राज्यसभेत काल नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी संपन्न झाला. त्यावेळी उदयनराजे भोसले यांनी 'जय भवानी, जय शिवाजी' अशी घोषणा दिली होती. त्याला सभापती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला. ही घोषणा रेकॉर्डवरून काढून टाकण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यावरून आता राजकारण सुरू झालं आहे. महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांनी भाजपावर तोफ डागली आहे. मतांसाठी शिवराय चालतात. मग त्यांच्या नावाच्या घोषणा का चालत नाहीत, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.आज सकाळी खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपावर हल्ला चढवला. 'भाजपचं तोंड बंद का? संभाजी भिडे यांनी आता सांगली, सातारा बंदची हाक का दिली नाही?,' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यानंतर खुद्द उदयनराजे यांनी सगळ्या वादावर खुलासा केला. राज्यसभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालाच नाही. सभागृहात असं काही घडलंच नाही. शरद पवारही तिथं होते. त्यामुळं कुणीही राजकारण करू नये,' असं आवाहन त्यांनी केलं.उदयनराजे भोसले यांच्या खुलाशानंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यंकय्या नायडू नियमानं वागल्याचं म्हटलं. नायडू उपराष्ट्रपती आहेत. राज्यसभेचे सभापती आहेत. नियमांचं काटेकोर पालन करणारे आहेत. त्यांच्या दृष्टीनं म्हणाल, तर ते बरोबर आहेत. संसदीय लोकशाही व कामकाजाचे कायदे यांची त्यांना जाण आहे. आम्ही सगळे त्यांचं ऐकतो. त्यांचा आदर करतो. पण शिवरायांबद्दल आमच्या काही भावना आहेत. नियम आणि भावना या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. 'जय भवानी आणि जय शिवाजी' ही घोषणा नियमबाह्य घटनाबाह्य नाही. ती असू नये, असं आमचं म्हणणं आहे. 'जय हिंद आणि वंदे मातरम्' इतकीच ती महत्त्वाची आहे,' असं राऊत यांनी म्हटलं.संजय राऊतांच्या प्रश्नावर उदयनराजेंचं उत्तर, शिवसेनेलाही केलं टार्गेट"मला छत्रपती शिवरायांबद्दल आदर अन् मी आई भवानीचा उपासक" - व्यंकय्या नायडू"छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता"

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतVenkaiah Naiduव्यंकय्या नायडूUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSharad Pawarशरद पवारSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी