शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना खासदार संजय राऊत उवाच; व्यंकय्या नायडू नियमानुसारच वागले, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 17:13 IST

उदयराजेंनी दिलेल्या घोषणांना उपराष्ट्रपतींनी आक्षेप घेतल्यानं नवा वाद; महाविकासआघाडीकडून भाजपा लक्ष्य

मुंबई: 'जय भवानी, जय शिवाजी' घोषणेला राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी सभागृहात घेतलेल्या आक्षेपावरून जोरदार राजकारण सुरू झालं आहे. या मुद्द्यावरून विरोधकांकडून भाजपाला लक्ष्य केलं जात असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यंकय्या नायडू यांना क्लीन चिट दिली आहे. 'व्यंकय्या नायडू हे सभागृहाच्या नियमानुसार वागले, पण छत्रपती शिवरायांबद्दल आमच्या काही भावना आहेत. त्या आम्ही मांडत आहोत, असं राऊत म्हणाले. 'जय भवानी, जय शिवाजी' ही घोषणा जय हिंद आणि वंदे मातरम् इतकीच महत्त्वाची असल्याचं त्यांनी म्हटलं.राज्यसभेत काल नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी संपन्न झाला. त्यावेळी उदयनराजे भोसले यांनी 'जय भवानी, जय शिवाजी' अशी घोषणा दिली होती. त्याला सभापती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला. ही घोषणा रेकॉर्डवरून काढून टाकण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यावरून आता राजकारण सुरू झालं आहे. महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांनी भाजपावर तोफ डागली आहे. मतांसाठी शिवराय चालतात. मग त्यांच्या नावाच्या घोषणा का चालत नाहीत, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.आज सकाळी खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपावर हल्ला चढवला. 'भाजपचं तोंड बंद का? संभाजी भिडे यांनी आता सांगली, सातारा बंदची हाक का दिली नाही?,' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यानंतर खुद्द उदयनराजे यांनी सगळ्या वादावर खुलासा केला. राज्यसभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालाच नाही. सभागृहात असं काही घडलंच नाही. शरद पवारही तिथं होते. त्यामुळं कुणीही राजकारण करू नये,' असं आवाहन त्यांनी केलं.उदयनराजे भोसले यांच्या खुलाशानंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यंकय्या नायडू नियमानं वागल्याचं म्हटलं. नायडू उपराष्ट्रपती आहेत. राज्यसभेचे सभापती आहेत. नियमांचं काटेकोर पालन करणारे आहेत. त्यांच्या दृष्टीनं म्हणाल, तर ते बरोबर आहेत. संसदीय लोकशाही व कामकाजाचे कायदे यांची त्यांना जाण आहे. आम्ही सगळे त्यांचं ऐकतो. त्यांचा आदर करतो. पण शिवरायांबद्दल आमच्या काही भावना आहेत. नियम आणि भावना या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. 'जय भवानी आणि जय शिवाजी' ही घोषणा नियमबाह्य घटनाबाह्य नाही. ती असू नये, असं आमचं म्हणणं आहे. 'जय हिंद आणि वंदे मातरम्' इतकीच ती महत्त्वाची आहे,' असं राऊत यांनी म्हटलं.संजय राऊतांच्या प्रश्नावर उदयनराजेंचं उत्तर, शिवसेनेलाही केलं टार्गेट"मला छत्रपती शिवरायांबद्दल आदर अन् मी आई भवानीचा उपासक" - व्यंकय्या नायडू"छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता"

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतVenkaiah Naiduव्यंकय्या नायडूUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSharad Pawarशरद पवारSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी