शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
4
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
5
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
6
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
7
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
8
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
9
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
10
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
11
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
13
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
14
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
15
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
16
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
17
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
18
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
19
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
20
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य

भाजपाच्या इराद्याला शिवसेनेचा धक्का

By admin | Updated: April 25, 2015 02:10 IST

भाजपाच्या इराद्याला सेनेचा धक्का

भाजपाच्या इराद्याला सेनेचा धक्का
मुंबई- मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर लढून किमान ११० ते कमाल १४२ जागांवर विजय मिळवण्याच्या भाजपाच्या इराद्यांना नवी मुंबई व औरंगाबाद महापालिका निकालाने धक्का बसल्याची पक्षात चर्चा आहे. शिवसेनेचा सत्तेमुळे वाढता दबदबा मुंबईसह अन्य महापालिकांत डोकेदुखी ठरण्याची भीती भाजपा वर्तुळात व्यक्त होत आहे.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाला जेमतेम ६ जागा मिळाल्या तर औरंगाबाद महापालिकेत पक्षाच्या जागांची संख्या वाढली असली तरी एमआयएमने भाजपाला पिछाडीवर टाकल्याने पक्ष तिसर्‍या क्रमांकावर फेकला गेला. राज्यातील सत्तेत मोठा भागीदार असलेल्या पक्षाची ही परिस्थिती मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली व अन्य महापालिकांमध्ये भाजपा कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम करणारी असल्याचे पक्षातील काहींचे मत आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा स्वबळावर लढेल व किमान ११० ते १४२ जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास मुंबईतील भाजपाच्या एका मातब्बर नेत्याने व्यक्त केला होता. विकास आराखडा, मेट्रो, कोस्टल रोड अशा सर्वच प्रश्नांवर भाजपाने सर्वप्रथम भूमिका घेण्यामागे महापालिकेत मुसंडी मारणे हाच हेतू असल्याचे हा नेता म्हणाला. मुंबई महापालिकेतील शिवसेनेबरोबरच्या युतीत आतापर्यंत भाजपा हा दुय्यम पक्ष राहिला आहे. मागील निवडणुकीत भाजपा ६३ जागा लढला व त्यांचे ३१ नगरसेवक विजयी झाले. त्यामुळे ही निवडणूक स्वबळावर लढवायची तर २२७ सदस्यसंख्या असलेल्या या महापालिकेत भाजपाला किमान १०० उमेदवार बाहेरून गोळा करावे लागतील. नवी मुंबईत भाजपाने ४३ जागा लढवल्या. त्यामध्ये केवळ एक उमेदवार हा मूळ भाजपाचा होता. बाकी ४२ उमेदवार हे आयाराम होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील आयारामांच्या भरवशावर महापालिका काबीज करु पाहणार्‍या भाजपाला नवी मुंबईतील मतदारांनी झटका दिला. मुंबईत तशाच पद्धतीने बाहेरून लोक आणून स्वबळावर सत्ता मिळवण्याचा विचार भाजपाचे नेते करीत असतील तर त्याचा फटका बसू शकतो, असे भाजपातील काहींचे मत आहे.
शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घ्यावे की नाही यावर भाजपात दोन मतप्रवाह होते. शिवसेनेने सत्तेत सहभागी झाल्यावर सत्तेपासून ताकद मिळवली आणि भाजपावर वेगवेगळ्या समस्यांकरिता हल्ले करीत विरोधी पक्षाची स्पेस काबीज केल्याचा लाभ त्या पक्षाला झाला आहे. वांद्रे (पूर्व) विधानसभा पोटनिवडणूक नसती तर कदाचित शिवसेनेने भाजपासोबत युती केली नसती, असे बोलले जाते.(विशेष प्रतिनिधी)