शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
6
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
7
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
8
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
9
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
10
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
11
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
12
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
13
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
14
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
15
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
16
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
17
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
18
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
19
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
20
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई

SIT चं राशन केलंय, मुख्यमंत्र्यांवरील आरोप गंभीर; संजय राऊतांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 13:04 IST

जे १६ भूखंड गरिबांच्या घरांसाठी राखीव होते. तरीही तेव्हाच्या नगरविकास मंत्र्यांनी जे आता मुख्यमंत्री आहेत त्यांनी हे भूखंड वाटप घाईघाईने केले. हायकोर्टाने त्यावर ताशेरे मारले असतील. हा भ्रष्टाचार आहे. अण्णा हजारे या विषयावर गप्प का? असा सवाल राऊतांनी केला.

नवी दिल्ली - एखाद्या राज्यात SIT इतक्या प्रमाणात कधीच स्थापन झाल्या नाहीत. केंद्राने नवीन रेशन पॉलिसी जाहीर केलीय तसं SIT चं केलंय. जे ४० आमदार ज्याप्रकारे ५०-५० खोके देऊन फोडण्यात आले तो काय व्यवहार होता त्यावर SIT स्थापन करणं गरजेचे आहे. पण जे विषय संपलेले आहे त्यावर SIT स्थापन करून सत्तेचा, पोलिसांचा गैरवापर सुरू आहे असा आरोप शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केला आहे. 

दिल्लीतील पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले की, आम्ही कुठल्याही तपासाला तोंड द्यायला तयार आहोत. तुम्ही तोंडावर पडणार आहात. सत्ताधाऱ्यांची अनेक प्रकरणे समोर आलीत ते समोर आणू त्यावर SIT ची मागणी करू. या सरकारला SIT स्थापन करण्याची खाज आहे आता खाजवत बसा. या सरकारनं SIT आणि पोलिसांचे महत्त्व कमी केले. विधानसभेत कुणी उठतो आणि एसआयटीची मागणी करतो. दुसऱ्याची बदनामी करण्याचं काम सुरू आहे. हे अग्निदिव्य आहे त्यातून शिवसेना पुन्हा बाहेर पडेल आणि महाराष्ट्राला प्रकाशमान करेल. एसआयटी स्थापन करून शिवसैनिकांचे मनोबल खच्चीकरण होईल असं कुणाला वाटत असेल तर ते भ्रमात आहेत असं त्यांनी सांगितले. 

अण्णा हजारे आता गप्प का?अण्णा हजारेंनी ज्या भ्रष्टाचाराविरोधात रणशिंग फुंकले त्यानंतर ते अचानक अदृश्य झाले. महाराष्ट्रात भ्रष्टमार्गाने सरकार आलंय त्यावर अण्णांनी जाब विचारला नाही. त्यामुळे लोकांच्या मनात शंका आहे. केंद्र आणि राज्य सरकार खुलेआम आमदार विकत घेतायेत. सत्ता उलटवायेत. अण्णा हजारे यांच्याकडून लोकांच्या अपेक्षा होत्या. लोकायुक्तांच्या मार्गाने खुली चर्चा करायला हवी. गुप्तमार्गाने चौकशी का? असा सवाल राऊतांनी विचारला. 

तसेच मुख्यमंत्र्यावरील आरोप गंभीर आहेत. भूखंड वाटप घोटाळ्याचे कागदपत्रे केंद्रातील अनेक प्रमुखांना पाठवली आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांना पुरावे दिलेत. बहुतेक देवेंद्र फडणवीस दिल्लीत घाईने आले असतील तर नक्कीच त्यावर चर्चा झाली असेल. ११० कोटींचे भूखंड २ कोटींना आपल्या मर्जीतील बिल्डरांना दिलेत. जे १६ भूखंड गरिबांच्या घरांसाठी राखीव होते. तरीही तेव्हाच्या नगरविकास मंत्र्यांनी जे आता मुख्यमंत्री आहेत त्यांनी हे भूखंड वाटप घाईघाईने केले. हायकोर्टाने त्यावर ताशेरे मारले असतील. हा भ्रष्टाचार आहे. अण्णा हजारे या विषयावर गप्प का? असंही राऊत म्हणाले. 

भाजपा नेते दुतोंडी सापशेतकऱ्यांच्या हितासाठी मॉलमध्ये किंवा मोठ्या स्टोअरमध्ये वाईन विकण्याची परवानगी देण्यात आली. हा निर्णय पूर्णपणे द्राक्ष उत्पादक आणि शेतकऱ्यांचा हिताचा होता. त्याला विरोध केला. मद्य धोरणाला सरकार पाठिंबा देताय असा आरोप केला. आज तेच हा निर्णय घेऊन पुढे येतायेत. नाईट लाईफला विरोध करणारे आशिष शेलार कुठे आहेत? त्यांनी स्वत:ची वक्तव्य पाहावी. हे दुतोंडी साप आहेत दोन्ही बाजूने वळवळतात अशा शब्दात संजय राऊतांनीभाजपा नेत्यांवर बोचरी टीका केली. 

रामसेतूच्या मुद्द्यावरून भाजपाला फटकारलंरामसेतू भाजपासाठी कधीकाळी प्रचाराचा मुद्दा होता. रामाच्या अस्तित्वासाठी भाजपा, संघाने अनेक आंदोलन केलीत. आम्ही जी आंदोलन केली ती राजकीय फायद्यासाठी होती असं भाजपानं सांगावं. राम सेतूचं अस्तित्व नव्हतं मग रामायणातील कथा दंतकथा होत्या का? यावर भाजपाने भाष्य करावे असं संजय राऊत यांनी भाजपाला सुनावलं. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा