शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

Maharashtra Karnataka Border Dispute: “अमित शाहांनी सर्वप्रथम कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना चांगली समज द्यावी”; ठाकरे गटाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 15:09 IST

Maharashtra Karnataka Border Dispute: महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ अमित शाहांना भेटल्यामुळे दोन्ही मुख्यमंत्र्यांना दिल्लीत पाचारण करण्यात आले, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

Maharashtra Karnataka Border Dispute: गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नी राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. दोन्ही राज्यातील नेत्यांमध्ये दावे-प्रतिदावे केले जात असून, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेते सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकावर टीका करताना दिसत आहे. यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी एक बैठक बोलावली असून, यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी सर्वप्रथम कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना चांगली समज द्यावी, अशी मागणी ठाकरे गटाच्या खासदाराने केली आहे. 

ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, महाविकास आघाडीच्या खासदारांचे एक शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले होते. त्यावेळी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची शाह यांना विनंती करण्यात आली होती. त्यानुसार अमित शाह यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना भेटीसाठी बोलावले आहे. त्यामुळे शाह यांचे आभार. आमच्या मागणीनंतर दोन्ही मुख्यमंत्र्यांना दिल्लीत पाचारण करण्यात आले आहे, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फक्त निवडणुकीला बेळगावात जातात

केंद्र सरकारची भूमिका न्यायिक राहिली पाहिजे. तराजू झुकता कामा नये. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फक्त निवडणुकीला बेळगावात जातात. कर्नाटकाच्या भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या असं सांगायला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गेले होते. ते मराठी उमेदवार निवडून आणा असं सांगायला गेले नव्हते, अशी टीका करताना दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत शाह यांनी सर्वांत आधी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना चांगली समज द्यावी, मुख्यमंत्र्यांचे कान उपटावे. बसवराज बोम्मई यांना वाह्यात स्टेटमेंट द्यायला मनाई करा. तिथला हिंसाचार बंद करा. जतमध्ये कन्नड रक्षण वेदिका येथे आणि झेंडा फडकवते हे सर्व कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचे पुरस्कृत आंदोलन आहे. हे सर्व कर्नाटकाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चालले आहे. हे लपून राहिलेले नाही, असे सावंत यांनी स्पष्टपणे सांगितले. 

दरम्यान, गेल्या ७० वर्षापासून मराठी माणसांचा छळ सीमाभागात सुरू आहे. गृहमंत्री महाराष्ट्राचे जावई आहेत. शहांची सासरवाडी कोल्हापूरला त्याचे चटके बसतायेत. त्यामुळे त्यांना याची कल्पना असेल. न्यायालय राम मंदिराचा प्रश्न सोडवू शकतं पण २०-२५ लाख मराठी माणसे आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. फक्त सीमाभागाचा विषय नाही तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई महाराष्ट्रातील गावांवर हक्क सांगतायेत, असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :border disputeसीमा वादArvind Sawantअरविंद सावंतAmit Shahअमित शाह