शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Karnataka Border Dispute: “अमित शाहांनी सर्वप्रथम कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना चांगली समज द्यावी”; ठाकरे गटाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 15:09 IST

Maharashtra Karnataka Border Dispute: महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ अमित शाहांना भेटल्यामुळे दोन्ही मुख्यमंत्र्यांना दिल्लीत पाचारण करण्यात आले, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

Maharashtra Karnataka Border Dispute: गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नी राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. दोन्ही राज्यातील नेत्यांमध्ये दावे-प्रतिदावे केले जात असून, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेते सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकावर टीका करताना दिसत आहे. यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी एक बैठक बोलावली असून, यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी सर्वप्रथम कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना चांगली समज द्यावी, अशी मागणी ठाकरे गटाच्या खासदाराने केली आहे. 

ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, महाविकास आघाडीच्या खासदारांचे एक शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले होते. त्यावेळी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची शाह यांना विनंती करण्यात आली होती. त्यानुसार अमित शाह यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना भेटीसाठी बोलावले आहे. त्यामुळे शाह यांचे आभार. आमच्या मागणीनंतर दोन्ही मुख्यमंत्र्यांना दिल्लीत पाचारण करण्यात आले आहे, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फक्त निवडणुकीला बेळगावात जातात

केंद्र सरकारची भूमिका न्यायिक राहिली पाहिजे. तराजू झुकता कामा नये. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फक्त निवडणुकीला बेळगावात जातात. कर्नाटकाच्या भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या असं सांगायला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गेले होते. ते मराठी उमेदवार निवडून आणा असं सांगायला गेले नव्हते, अशी टीका करताना दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत शाह यांनी सर्वांत आधी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना चांगली समज द्यावी, मुख्यमंत्र्यांचे कान उपटावे. बसवराज बोम्मई यांना वाह्यात स्टेटमेंट द्यायला मनाई करा. तिथला हिंसाचार बंद करा. जतमध्ये कन्नड रक्षण वेदिका येथे आणि झेंडा फडकवते हे सर्व कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचे पुरस्कृत आंदोलन आहे. हे सर्व कर्नाटकाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चालले आहे. हे लपून राहिलेले नाही, असे सावंत यांनी स्पष्टपणे सांगितले. 

दरम्यान, गेल्या ७० वर्षापासून मराठी माणसांचा छळ सीमाभागात सुरू आहे. गृहमंत्री महाराष्ट्राचे जावई आहेत. शहांची सासरवाडी कोल्हापूरला त्याचे चटके बसतायेत. त्यामुळे त्यांना याची कल्पना असेल. न्यायालय राम मंदिराचा प्रश्न सोडवू शकतं पण २०-२५ लाख मराठी माणसे आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. फक्त सीमाभागाचा विषय नाही तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई महाराष्ट्रातील गावांवर हक्क सांगतायेत, असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :border disputeसीमा वादArvind Sawantअरविंद सावंतAmit Shahअमित शाह