शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

Maharashtra Karnataka Border Dispute: “अमित शाहांनी सर्वप्रथम कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना चांगली समज द्यावी”; ठाकरे गटाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 15:09 IST

Maharashtra Karnataka Border Dispute: महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ अमित शाहांना भेटल्यामुळे दोन्ही मुख्यमंत्र्यांना दिल्लीत पाचारण करण्यात आले, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

Maharashtra Karnataka Border Dispute: गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नी राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. दोन्ही राज्यातील नेत्यांमध्ये दावे-प्रतिदावे केले जात असून, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेते सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकावर टीका करताना दिसत आहे. यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी एक बैठक बोलावली असून, यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी सर्वप्रथम कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना चांगली समज द्यावी, अशी मागणी ठाकरे गटाच्या खासदाराने केली आहे. 

ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, महाविकास आघाडीच्या खासदारांचे एक शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले होते. त्यावेळी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची शाह यांना विनंती करण्यात आली होती. त्यानुसार अमित शाह यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना भेटीसाठी बोलावले आहे. त्यामुळे शाह यांचे आभार. आमच्या मागणीनंतर दोन्ही मुख्यमंत्र्यांना दिल्लीत पाचारण करण्यात आले आहे, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फक्त निवडणुकीला बेळगावात जातात

केंद्र सरकारची भूमिका न्यायिक राहिली पाहिजे. तराजू झुकता कामा नये. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फक्त निवडणुकीला बेळगावात जातात. कर्नाटकाच्या भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या असं सांगायला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गेले होते. ते मराठी उमेदवार निवडून आणा असं सांगायला गेले नव्हते, अशी टीका करताना दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत शाह यांनी सर्वांत आधी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना चांगली समज द्यावी, मुख्यमंत्र्यांचे कान उपटावे. बसवराज बोम्मई यांना वाह्यात स्टेटमेंट द्यायला मनाई करा. तिथला हिंसाचार बंद करा. जतमध्ये कन्नड रक्षण वेदिका येथे आणि झेंडा फडकवते हे सर्व कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचे पुरस्कृत आंदोलन आहे. हे सर्व कर्नाटकाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चालले आहे. हे लपून राहिलेले नाही, असे सावंत यांनी स्पष्टपणे सांगितले. 

दरम्यान, गेल्या ७० वर्षापासून मराठी माणसांचा छळ सीमाभागात सुरू आहे. गृहमंत्री महाराष्ट्राचे जावई आहेत. शहांची सासरवाडी कोल्हापूरला त्याचे चटके बसतायेत. त्यामुळे त्यांना याची कल्पना असेल. न्यायालय राम मंदिराचा प्रश्न सोडवू शकतं पण २०-२५ लाख मराठी माणसे आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. फक्त सीमाभागाचा विषय नाही तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई महाराष्ट्रातील गावांवर हक्क सांगतायेत, असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :border disputeसीमा वादArvind Sawantअरविंद सावंतAmit Shahअमित शाह