शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

“मराठा-धनगर आरक्षणप्रश्नी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा”; ठाकरे गटाच्या खासदारांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 12:59 IST

Shiv Sena Thackeray Group: धनगर आणि मराठा आरक्षण प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे एक शिष्टमंडळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहे.

Shiv Sena Thackeray Group: राज्यभरात मराठा आरक्षण मिळण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा वणवा भडकलेलाच असून, बीड, धाराशिवमध्ये संचारबंदी तर जालन्यामध्ये इंटरनेटबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी रास्ता रोको, आमरण उपोषण करण्यात आले. यातच आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा अल्टिमेटम देत, पाणी पिणे बंद करण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे धनगर आरक्षणाची मागणीही जोर धरू लागली आहे. यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खासदारांनी धनगर आणि मराठा आरक्षणप्रश्नी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी करत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी वेळ मागितली आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांचे एक शिष्टमंडळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटणार आहे. यासाठी खासदार विनायक राऊत यांनी पत्र लिहिले असून, भेटीची वेळ मागितली आहे. महाराष्ट्रात मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे. तसेच या विषयांतर्गत खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचे खासदार व आमदारांचे शिष्टमंडळ ५ किंवा ६ नोव्हेंबर रोजी भेट घेऊ इच्छितात. कृपया आपल्या सोयीनुसार वेळ द्यावी, अशी विनंती विनायक राऊत यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात करण्यात आली आहे. 

ठाकरे गटाच्या खासदार अन् आमदारांच्या शिष्टमंडळात कोण?

खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचे खासदार व आमदारांचे शिष्टमंडळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत. यामध्ये खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अंबादास दानवे, अनिल देसाई, अरविंद सावंत, प्रियंका चतुर्वेदी, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, अजय चौधरी आणि सुनील प्रभू यांचा समावेश आहे. 

दरम्यान, मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिल्याशिवाय माघार नाही. विशेष अधिवेशन घेऊन आरक्षण देण्याची भूमिका जाहीर करावी. शासनाने घेतलेला एकही निर्णय आम्हाला मान्य नाही. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण द्यावे. शासनाने काय करायचे ते करावे. बुधवारी रात्रीपर्यंत मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा रात्रीपासून पाणी पिणे बंद करणार असून, होणाऱ्या परिणामांना शासन जबाबदार असेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणDhangar Reservationधनगर आरक्षणShiv SenaशिवसेनाDraupadi Murmuद्रौपदी मुर्मूUddhav Thackerayउद्धव ठाकरे