शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

“आव अन् साव हाच चेहरा आणि मुखवटा, दुसरे काय घडणार”; हेरगिरीवरुन ठाकरे गटाची केंद्रावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 09:14 IST

Thackeray Group Vs Central Govt: एकीकडे फोन टॅपिंग वगैरे काहीही नाही असा आव आणायचा आणि दुसरीकडे चौकशीचा फार्स करून देखावा करायचा, अशी टीका ठाकरे गटाने केली.

Thackeray Group Vs Central Govt: राजकीय विरोधकांवर पाळत ठेवणे, त्यांचे फोन चोरून ऐकणे हा सध्याच्या राज्यकर्त्यांचा आवडता छंद आहे. महाराष्ट्राचे फडणवीस सरकारही याला अपवाद नव्हते. त्यात देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांना ‘अ‍ॅपल’ कंपनीने दिलेल्या फोन हॅकिंगच्या इशाऱ्याची भर पडली आहे.  एकीकडे फोन टॅपिंग वगैरे काहीही नाही असा ‘आव’ आणायचा आणि दुसरीकडे चौकशीचा फार्स करून आपण ‘साव’ असल्याचा देखावा करायचा. ‘तुका म्हणे चोरटाचि झाला साव। सहज न्याय नाही येथे।।’ असेच गेल्या नऊ वर्षांत देशात सुरू आहे. त्यामुळेच आधी पेगासस घडले आणि आता ‘अ‍ॅपल’. आव आणि साव हाच सरकारचा चेहरा आणि मुखवटा असल्याने दुसरे काय घडणार, अशी टीका ठाकरे गटाने केंद्र सरकारवर केली आहे. 

काही विरोधी नेत्यांच्या आयफोनवर ‘सरकार पुरस्कृत सायबर हल्ल्या’चा इशारा मिळाल्याचे हे प्रकरण असून ते गंभीर आहे. ‘अ‍ॅपल’ कंपनीने दिलेल्या अशा इशाऱ्याचे स्क्रीन शॉटस् च या सर्व नेत्यांनी पुराव्यादाखल दिले आहेत. तरीही सरकार म्हणते की, हे आरोप खोटे आहेत. मग आणखी कोणता पुरावा दिला म्हणजे सरकारला ते खरे वाटेल? केंद्रीय आयटी मंत्र्यांनी हे आरोप फेटाळले आहेत. त्याच वेळी या प्रकरणाची चौकशी करू, असे स्पष्टीकरणही दिले आहे. आरोप जर खोटे असतील तर चौकशी कशासाठी करीत आहात, असा सवाल ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून केला आहे. 

काहीतरी शिजत असावे, या शंकेला बळ प्राप्त होते

‘अ‍ॅपल’ कंपनीने जो इशारा दिला आहे तोच स्वयंस्पष्ट आहे. तुमच्या अ‍ॅपल आयडीशी संपर्क साधून तुमच्या फोनमधील माहिती मिळवली जात आहे, अशा शब्दांत जेव्हा एखादा फोन ऑपरेटर फोनधारकाला जाणीव करून देतो तेव्हा कुठेतरी, काहीतरी शिजत असावे, या शंकेला बळ प्राप्त होते, अशी शक्यता ठाकरे गटाने वर्तवली आहे. सत्ता पक्षाने निर्माण केलेल्या सायबर टोळय़ा आणि ‘ट्रोलधाडीं’कडून राजकीय विरोधकांवर समाजमाध्यमांद्वारा केले जाणारे राजकीय हल्ले, फोन टॅपिंग, हॅकिंग तसेच ‘टेहळणी’बाबत मोदी सरकारवर झालेले आरोप हेच गेली नऊ वर्षे देशात सुरू आहे. तीन-चार वर्षांपूर्वी ‘पेगासस’ प्रकरणाने मोदी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. या प्रकरणाचा धुरळा तर सत्ताधाऱ्यांच्या डोळय़ांत एवढा गेला होता की, सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेले होते, असे सांगत ठाकरे गटाने केंद्रावर हल्लाबोल केला. 

दरम्यान, आता ताज्या फोन टॅपिंग प्रकरणी चौकशी करण्याची घोषणा हीदेखील गाजराची पुंगीच आहे.  मोदी सरकार सत्तेत आल्यापासून राजकीय विरोधकांवर ‘पाळत’ ठेवण्यापासून त्यांच्या मागे केवळ राजकीय सूडभावनेतून केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लावण्यापर्यंत अनेक गोष्टी घडल्या आहेत, घडत आहेत, असा निशाणा ठाकरे गटाने केंद्रावर साधला. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाCentral Governmentकेंद्र सरकार