शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना-राष्ट्रवादीच्या खासदारांनी घेतली PM मोदींची भेट, महाराष्ट्रातील प्रश्नांवर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 15:47 IST

Shiv Sena And NCP MP Meets PM Narendra Modi: या खासदारांनी महाराष्ट्रातील प्रश्नांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील विकासकामांचा आढावा घेतल्याचे सांगितले जात आहे.

Shiv Sena And NCP MP Meets PM Narendra Modi: लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. परिणामतः घटक पक्षांच्या पाठिंब्यावर एनडीएचे सरकार केंद्रात स्थापन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसरा कार्यकाळ सुरू केला. यानंतर संसदेचे अधिवेशन सुरू आहे. निवडणुकीत मुसंडी मारलेल्या विरोधकांचा आत्मविश्वास दुपटीने वाढला आहे. विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली.

राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर नीट, नेट परीक्षेतील गोंधळ, पेपरफुटी यांवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका करताना ते पाहायला मिळत आहे. संसदेचे सत्र सुरू झाल्यानंतर लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात विरोधकांनी परीक्षेतील घोळ आणि शिक्षण व्यवस्थेबाबतचा मुद्दा लावून धरला. संसदेचे सत्र सुरू होताना शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नवनिर्वाचित खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

महाराष्ट्रातील प्रश्नांवर चर्चा

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल या खासदारांनी नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील विकास कामांचा आढावा घेतला. या खासदारांनी महाराष्ट्रातील प्रश्नांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. खासदारांनी पंतप्रधानांना विठ्ठल रखुमाईची मुर्ती भेट दिली. पंतप्रधानांनी भेटी दरम्यान अर्धा तास खासदारांसोबत चर्चा केली. खासदारांनी सकारात्मक आणि सक्रिय भूमिका ठेवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, देशभरात नवे फौजदारी कायदे लागू होत आहेत. तीन नवीन कायदे भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम याप्रमाणे संबोधले जाणार आहेत. नवीन कायद्यांमुळे न्यायालयीन व्यवस्थेत बदलांसह तांत्रिक प्रगती होत आहे. न्यायालयीन प्रक्रियेतील विलंब कमी होऊन ऑनलाइन फाइलिंग, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्षीदारांचे म्हणणे ऐकण्यावर भर देण्यात येईल. काश्मीर ते कन्याकुमारी व द्वारका ते आसामपर्यंत संपूर्ण देशात एकच न्यायव्यवस्था लागू होईल. 

टॅग्स :ParliamentसंसदNarendra Modiनरेंद्र मोदीShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी