शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
4
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
5
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
6
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
7
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
8
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
9
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
10
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
11
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
12
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
13
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
14
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
15
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
16
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
17
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
18
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
19
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
20
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

शिवसेना-राष्ट्रवादीच्या खासदारांनी घेतली PM मोदींची भेट, महाराष्ट्रातील प्रश्नांवर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 15:47 IST

Shiv Sena And NCP MP Meets PM Narendra Modi: या खासदारांनी महाराष्ट्रातील प्रश्नांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील विकासकामांचा आढावा घेतल्याचे सांगितले जात आहे.

Shiv Sena And NCP MP Meets PM Narendra Modi: लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. परिणामतः घटक पक्षांच्या पाठिंब्यावर एनडीएचे सरकार केंद्रात स्थापन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसरा कार्यकाळ सुरू केला. यानंतर संसदेचे अधिवेशन सुरू आहे. निवडणुकीत मुसंडी मारलेल्या विरोधकांचा आत्मविश्वास दुपटीने वाढला आहे. विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली.

राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर नीट, नेट परीक्षेतील गोंधळ, पेपरफुटी यांवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका करताना ते पाहायला मिळत आहे. संसदेचे सत्र सुरू झाल्यानंतर लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात विरोधकांनी परीक्षेतील घोळ आणि शिक्षण व्यवस्थेबाबतचा मुद्दा लावून धरला. संसदेचे सत्र सुरू होताना शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नवनिर्वाचित खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

महाराष्ट्रातील प्रश्नांवर चर्चा

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल या खासदारांनी नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील विकास कामांचा आढावा घेतला. या खासदारांनी महाराष्ट्रातील प्रश्नांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. खासदारांनी पंतप्रधानांना विठ्ठल रखुमाईची मुर्ती भेट दिली. पंतप्रधानांनी भेटी दरम्यान अर्धा तास खासदारांसोबत चर्चा केली. खासदारांनी सकारात्मक आणि सक्रिय भूमिका ठेवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, देशभरात नवे फौजदारी कायदे लागू होत आहेत. तीन नवीन कायदे भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम याप्रमाणे संबोधले जाणार आहेत. नवीन कायद्यांमुळे न्यायालयीन व्यवस्थेत बदलांसह तांत्रिक प्रगती होत आहे. न्यायालयीन प्रक्रियेतील विलंब कमी होऊन ऑनलाइन फाइलिंग, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्षीदारांचे म्हणणे ऐकण्यावर भर देण्यात येईल. काश्मीर ते कन्याकुमारी व द्वारका ते आसामपर्यंत संपूर्ण देशात एकच न्यायव्यवस्था लागू होईल. 

टॅग्स :ParliamentसंसदNarendra Modiनरेंद्र मोदीShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी