शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

Lakhimpur Kheri Violence: संजय राऊत घेणार राहुल गांधींची भेट; लखीमपूर हिंसाचाराविरोधात भाजपला घेरण्याची तयारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 15:43 IST

उत्तर प्रदेश सरकारकडून होत असलेल्या दडपशाहीला संयुक्तपणे विरोध करण्याची गरज आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देलखीमपूर खिरी हिंसाचाराप्रकरणी संपूर्ण देश हादरलाय उत्तर प्रदेश सरकारच्या दडपशाहीला संयुक्तपणे विरोध करण्याची गरजसंजय राऊत घेणार राहुल गांधींची भेट

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसाचाराचे पडसाद देशभरात उमटताना दिसत आहेत. केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशमधील योगी सरकारविरोधात संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतकाँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेणार असून, लखीमपूर हिंसाचारासह आणखी नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा होते, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे. (shiv sena sanjay raut will meet congress rahul gandhi over lakhimpur kheri violence) 

संजय राऊत यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसाचाराप्रकरणी संपूर्ण देश हादरला आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आली आहे. लखीमपूर येथे शेतकऱ्यांना भेटण्यासाठी मज्जाव केला जात आहे. उत्तर प्रदेशात सरकारकडून होत असलेल्या दडपशाहीला संयुक्तपणे विरोध करण्याची गरज आहे. यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दुपारी ४.१५ वाजता भेट घेत आहे, असे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

हे काही रामराज्य आहे का?

याआधी, प्रियांका गांधी यांच्याशी तुमचे राजकीय वैर असू शकते, काँग्रेसशी असू शकते, पण त्यांचा गुन्हा काय आहे की कोणत्याही वॉरंटशिवाय तिथे ताब्यात घेतले? त्या इंदिरा गांधी यांची नात आहे, त्या महिला आहेत. ज्या पद्धतीने पोलीस प्रियांका गांधी यांच्याशी वागले ते आदेशच होते, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसेच मोदी सरकारने शेतकऱ्यांची माफी मागावी. हे काही रामराज्य आहे का? तुम्ही माफी मागत आहात का? शेतकऱ्यांना चिरडण्याचा विषय आहे. यावर माफी मागितलीच पाहिजे. देशात अघोषित आणिबाणी सुरू आहे. पण शेतकरी, जनता लढत राहतील, या शब्दांत संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. 

दरम्यान, सीतापूरमध्ये गेल्या ३६ तासांपासून नजरकैदेत असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रियंका गांधींनी कलम -१४४ चे उल्लंघन आणि शांतता भंग केल्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे. तत्पूर्वी, प्रियांका गांधींनी ट्विटरवर लखीमपूर हिंसाचाराशी संबंधित व्हिडिओ शेअर करुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारले. पोलीस हवी, तेव्हा मला अटक करु शकतात. पण शेतकरी कुटुंबांना भेटल्याशिवाय परतणार नाही, असा दृढ निश्चय बोलून दाखवत प्रियंका गांधी यांनी पोलिसांना थेट आव्हान दिले होते.

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारShiv SenaशिवसेनाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसSanjay Rautसंजय राऊतPoliticsराजकारण