शहरं
Join us  
Trending Stories
1
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
2
ओला ईलेक्ट्रीक गटांगळ्या खाऊ लागली? पुण्यातील सर्व्हिस सेंटर तोडले, अख्ख्या मुंबईत तेही ठाण्यात एकच सर्व्हिस सेंटर...
3
Sheikh Hasina Net Worth: शेख हसीना यांच्या नोकराकडेच होते २८४ कोटी; 'मॅडम'कडील प्रॉपर्टीचा आकडा वाचून तर बघा...
4
'या' एका चुकीमुळे लीक होऊ शकते तुमचे व्हॉट्सअ‍ॅपचे प्रायव्हेट चॅट; तुम्हाला माहीत आहे का?
5
'ऑपरेशन सिंदूर' हा फक्त ट्रेलर होता', लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला उघड इशारा, दिल्ली स्फोटानंतर लष्कर सज्ज
6
मोबाईलवर मिनिटांत तपासा तुमचा NPS बॅलन्स; पाहा NSDL, उमंग ॲप आणि मिस्ड कॉलची सोपी पद्धत
7
फलटणमध्ये महायुतीतच 'खेळ'! शिंदेंच्या शिवसेनेकडून रामराजेंचा मुलगा, भाजपाकडून माजी खासदारांचा भाऊ मैदानात
8
कमाल! नोकरीसोबतच घरची जबाबदारी, ६ वेळा नापास; २ मुलींची आई ४० व्या वर्षी झाली IAS
9
बांगलादेश कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या? 
10
Delhi Blast: दिल्लीत स्फोट घडवण्यासाठी किती पैसे दिले गेले होते, डॉ. शाहीनची काय होती भूमिका?
11
बँकिंग शेअर्समध्ये ऐतिहासिक तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये जोरदार वाढ; 'ही' आहेत प्रमुख ४ कारणं
12
किरकोळ गुंतवणूकदारांनी 'या' १० शेअर्समध्ये टाकले ₹१८,००० कोटी! सुजलॉन त्यापैकी एक, आणखी नावं कोणती?
13
DIY Tips: ड्राय क्लीनिंगचा खर्च वाचवा! कपड्यांवरील चिवट डाग काढण्यासाठी 'हा' घरगुती फॉर्म्युला वापरा 
14
"राहुल गांधी पंतप्रधान होवोत अथवा न होवोत, आमचा हेतू...!" बिहार निवडणुकीसंदर्भात बोलताना काय म्हणाले रॉबर्ट वाड्रा? 
15
क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! बिटकॉइन १५ लाख तर इथर १.३५ लाखानं कोसळला; ही आहेत कारणं
16
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
17
MLA Disqualification Case: 'आमदारांचं प्रकरण दोन आठवड्यात निकाली काढा, नाहीतर...'; सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांवर संतापले
18
Gold & Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; Gold २ हजारांपेक्षा अधिकनं झालं स्वस्त, Silver मध्ये ६५०० ची घसरण
19
दिल्ली स्फोट तपास: कोडवर्ड, 'वुल्फ आवर' आणि महिला दहशतवाद्यांचे 'ऑरोरा-लूना' पथक!
Daily Top 2Weekly Top 5

Lakhimpur Kheri Violence: संजय राऊत घेणार राहुल गांधींची भेट; लखीमपूर हिंसाचाराविरोधात भाजपला घेरण्याची तयारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 15:43 IST

उत्तर प्रदेश सरकारकडून होत असलेल्या दडपशाहीला संयुक्तपणे विरोध करण्याची गरज आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देलखीमपूर खिरी हिंसाचाराप्रकरणी संपूर्ण देश हादरलाय उत्तर प्रदेश सरकारच्या दडपशाहीला संयुक्तपणे विरोध करण्याची गरजसंजय राऊत घेणार राहुल गांधींची भेट

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसाचाराचे पडसाद देशभरात उमटताना दिसत आहेत. केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशमधील योगी सरकारविरोधात संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतकाँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेणार असून, लखीमपूर हिंसाचारासह आणखी नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा होते, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे. (shiv sena sanjay raut will meet congress rahul gandhi over lakhimpur kheri violence) 

संजय राऊत यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसाचाराप्रकरणी संपूर्ण देश हादरला आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आली आहे. लखीमपूर येथे शेतकऱ्यांना भेटण्यासाठी मज्जाव केला जात आहे. उत्तर प्रदेशात सरकारकडून होत असलेल्या दडपशाहीला संयुक्तपणे विरोध करण्याची गरज आहे. यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दुपारी ४.१५ वाजता भेट घेत आहे, असे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

हे काही रामराज्य आहे का?

याआधी, प्रियांका गांधी यांच्याशी तुमचे राजकीय वैर असू शकते, काँग्रेसशी असू शकते, पण त्यांचा गुन्हा काय आहे की कोणत्याही वॉरंटशिवाय तिथे ताब्यात घेतले? त्या इंदिरा गांधी यांची नात आहे, त्या महिला आहेत. ज्या पद्धतीने पोलीस प्रियांका गांधी यांच्याशी वागले ते आदेशच होते, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसेच मोदी सरकारने शेतकऱ्यांची माफी मागावी. हे काही रामराज्य आहे का? तुम्ही माफी मागत आहात का? शेतकऱ्यांना चिरडण्याचा विषय आहे. यावर माफी मागितलीच पाहिजे. देशात अघोषित आणिबाणी सुरू आहे. पण शेतकरी, जनता लढत राहतील, या शब्दांत संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. 

दरम्यान, सीतापूरमध्ये गेल्या ३६ तासांपासून नजरकैदेत असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रियंका गांधींनी कलम -१४४ चे उल्लंघन आणि शांतता भंग केल्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे. तत्पूर्वी, प्रियांका गांधींनी ट्विटरवर लखीमपूर हिंसाचाराशी संबंधित व्हिडिओ शेअर करुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारले. पोलीस हवी, तेव्हा मला अटक करु शकतात. पण शेतकरी कुटुंबांना भेटल्याशिवाय परतणार नाही, असा दृढ निश्चय बोलून दाखवत प्रियंका गांधी यांनी पोलिसांना थेट आव्हान दिले होते.

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारShiv SenaशिवसेनाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसSanjay Rautसंजय राऊतPoliticsराजकारण