शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

Lakhimpur Kheri Violence: संजय राऊत घेणार राहुल गांधींची भेट; लखीमपूर हिंसाचाराविरोधात भाजपला घेरण्याची तयारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 15:43 IST

उत्तर प्रदेश सरकारकडून होत असलेल्या दडपशाहीला संयुक्तपणे विरोध करण्याची गरज आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देलखीमपूर खिरी हिंसाचाराप्रकरणी संपूर्ण देश हादरलाय उत्तर प्रदेश सरकारच्या दडपशाहीला संयुक्तपणे विरोध करण्याची गरजसंजय राऊत घेणार राहुल गांधींची भेट

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसाचाराचे पडसाद देशभरात उमटताना दिसत आहेत. केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशमधील योगी सरकारविरोधात संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतकाँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेणार असून, लखीमपूर हिंसाचारासह आणखी नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा होते, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे. (shiv sena sanjay raut will meet congress rahul gandhi over lakhimpur kheri violence) 

संजय राऊत यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसाचाराप्रकरणी संपूर्ण देश हादरला आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आली आहे. लखीमपूर येथे शेतकऱ्यांना भेटण्यासाठी मज्जाव केला जात आहे. उत्तर प्रदेशात सरकारकडून होत असलेल्या दडपशाहीला संयुक्तपणे विरोध करण्याची गरज आहे. यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दुपारी ४.१५ वाजता भेट घेत आहे, असे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

हे काही रामराज्य आहे का?

याआधी, प्रियांका गांधी यांच्याशी तुमचे राजकीय वैर असू शकते, काँग्रेसशी असू शकते, पण त्यांचा गुन्हा काय आहे की कोणत्याही वॉरंटशिवाय तिथे ताब्यात घेतले? त्या इंदिरा गांधी यांची नात आहे, त्या महिला आहेत. ज्या पद्धतीने पोलीस प्रियांका गांधी यांच्याशी वागले ते आदेशच होते, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसेच मोदी सरकारने शेतकऱ्यांची माफी मागावी. हे काही रामराज्य आहे का? तुम्ही माफी मागत आहात का? शेतकऱ्यांना चिरडण्याचा विषय आहे. यावर माफी मागितलीच पाहिजे. देशात अघोषित आणिबाणी सुरू आहे. पण शेतकरी, जनता लढत राहतील, या शब्दांत संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. 

दरम्यान, सीतापूरमध्ये गेल्या ३६ तासांपासून नजरकैदेत असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रियंका गांधींनी कलम -१४४ चे उल्लंघन आणि शांतता भंग केल्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे. तत्पूर्वी, प्रियांका गांधींनी ट्विटरवर लखीमपूर हिंसाचाराशी संबंधित व्हिडिओ शेअर करुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारले. पोलीस हवी, तेव्हा मला अटक करु शकतात. पण शेतकरी कुटुंबांना भेटल्याशिवाय परतणार नाही, असा दृढ निश्चय बोलून दाखवत प्रियंका गांधी यांनी पोलिसांना थेट आव्हान दिले होते.

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारShiv SenaशिवसेनाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसSanjay Rautसंजय राऊतPoliticsराजकारण