शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

Lakhimpur Kheri Violence: संजय राऊत घेणार राहुल गांधींची भेट; लखीमपूर हिंसाचाराविरोधात भाजपला घेरण्याची तयारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 15:43 IST

उत्तर प्रदेश सरकारकडून होत असलेल्या दडपशाहीला संयुक्तपणे विरोध करण्याची गरज आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देलखीमपूर खिरी हिंसाचाराप्रकरणी संपूर्ण देश हादरलाय उत्तर प्रदेश सरकारच्या दडपशाहीला संयुक्तपणे विरोध करण्याची गरजसंजय राऊत घेणार राहुल गांधींची भेट

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसाचाराचे पडसाद देशभरात उमटताना दिसत आहेत. केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशमधील योगी सरकारविरोधात संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतकाँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेणार असून, लखीमपूर हिंसाचारासह आणखी नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा होते, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे. (shiv sena sanjay raut will meet congress rahul gandhi over lakhimpur kheri violence) 

संजय राऊत यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसाचाराप्रकरणी संपूर्ण देश हादरला आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आली आहे. लखीमपूर येथे शेतकऱ्यांना भेटण्यासाठी मज्जाव केला जात आहे. उत्तर प्रदेशात सरकारकडून होत असलेल्या दडपशाहीला संयुक्तपणे विरोध करण्याची गरज आहे. यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दुपारी ४.१५ वाजता भेट घेत आहे, असे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

हे काही रामराज्य आहे का?

याआधी, प्रियांका गांधी यांच्याशी तुमचे राजकीय वैर असू शकते, काँग्रेसशी असू शकते, पण त्यांचा गुन्हा काय आहे की कोणत्याही वॉरंटशिवाय तिथे ताब्यात घेतले? त्या इंदिरा गांधी यांची नात आहे, त्या महिला आहेत. ज्या पद्धतीने पोलीस प्रियांका गांधी यांच्याशी वागले ते आदेशच होते, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसेच मोदी सरकारने शेतकऱ्यांची माफी मागावी. हे काही रामराज्य आहे का? तुम्ही माफी मागत आहात का? शेतकऱ्यांना चिरडण्याचा विषय आहे. यावर माफी मागितलीच पाहिजे. देशात अघोषित आणिबाणी सुरू आहे. पण शेतकरी, जनता लढत राहतील, या शब्दांत संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. 

दरम्यान, सीतापूरमध्ये गेल्या ३६ तासांपासून नजरकैदेत असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रियंका गांधींनी कलम -१४४ चे उल्लंघन आणि शांतता भंग केल्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे. तत्पूर्वी, प्रियांका गांधींनी ट्विटरवर लखीमपूर हिंसाचाराशी संबंधित व्हिडिओ शेअर करुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारले. पोलीस हवी, तेव्हा मला अटक करु शकतात. पण शेतकरी कुटुंबांना भेटल्याशिवाय परतणार नाही, असा दृढ निश्चय बोलून दाखवत प्रियंका गांधी यांनी पोलिसांना थेट आव्हान दिले होते.

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारShiv SenaशिवसेनाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसSanjay Rautसंजय राऊतPoliticsराजकारण