शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

“शिवसेनेचा मनापासून शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला पाठिंबा”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 14:36 IST

काँग्रेसनंतर आता शिवसेनेने शेतकऱ्यांच्या भारत बंद आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

ठळक मुद्देगेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूआम्ही मनापासून त्यांच्यासोबत आहोतसंजय राऊत यांनी शेतकऱ्यांच्या बंदला पाठिंबा दर्शवला

नवी दिल्ली: वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गेल्या १० महिन्यांपासून शेतकऱ्यांचे दिल्लीत आंदोलन सुरू असून, या कालावधीत सुमारे ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. शेतकरी नेते आणि केंद्र सरकार आपापल्या भूमिकांवर ठाम असल्यामुळे अद्यापही यावर तोडगा निघालेला नाही. यातच शेतकरी संघटना आणि नेत्यांनी देशभरात ‘भारत बंद’ची हाक दिल्यानंतर दिल्लीसह अनेक भागात वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. काँग्रेसनंतर आता शिवसेनेने शेतकऱ्यांच्या या भारत बंदला पाठिंबा दर्शवला आहे. (shiv sena sanjay raut said we support farmers from bottom of heart in bharat bandh protest)

“अमित शाह म्हणजे गजनी, उद्धव ठाकरे मात्र रामशास्त्री बाण्याचे नेतृत्व”; शिवसेनेची बोचरी टीका

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांचे अहिंसक आंदोलन आजही अखंड आहे. परंतु, शोषण करणाऱ्या सरकारला ते पसंत नाही, अशी टीका राहुल गांधींनी केंद्रातील मोदी सरकारवर केली आहे. 

“राजसाहेब, भाजपशी युती करा, फायदा होईल”; पुण्यातील मनसे नेत्यांचा दबाव वाढला!

आम्ही मनापासून त्यांच्यासोबत आहोत

गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. हा शेतकऱ्यांचा बंद आहे. देशातील प्रत्येक नागरिकाची भावना शेतकऱ्यांसोबत आहे. उद्योगधंदे तर अगोदरपासूनच बंद आहेत. बेरोजगारीमुळे लोक असेही घरातच बसलेले आहेत. त्यामुळे बंद तर सुरू आहेत त्यात शेतकऱ्यांनीही बंद पुकारलाय. आम्ही मनापासून त्यांच्यासोबत आहोत, या शब्दांत संजय राऊत यांनी शेतकऱ्यांच्या बंदला पाठिंबा दर्शवला.

शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना ईडीचे समन्स; सिटी बँक घोटाळा प्रकरणी हजर राहण्याचे आदेश

दरम्यान, शेतकऱ्यांचा ‘भारत बंद’ सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. शेतकऱ्यांकडून ॲम्ब्युलन्स आणि डॉक्टरांना वाट मोकळी करून दिली जाईल. परंतु, नागरिकांनी दुपारी जेवणाच्या वेळेनंतरच घरातून बाहेर पडावे, अन्यथा ट्राफिक जाममध्ये ते अडकून राहू शकतात, असे आवाहन भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केले आहे. दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा शेतकरी गोळा झाले आहेत. या बंदचा परिणाम रस्त्यांवरही दिसून आला. संयुक्त किसान मोर्चाने केलेल्या भारत बंदमुळे नोएडामध्ये वाहनांची मोठी रांगच रांग दिसून आल्या. दिल्ली गुरुग्राम हायवेवर अनेक किलोमीटर केवळ वाहनांची रांग लागलेली दिसून येत आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतcongressकाँग्रेसrakesh tikaitराकेश टिकैतRahul Gandhiराहुल गांधी