शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

“शिवसेनेचा मनापासून शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला पाठिंबा”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 14:36 IST

काँग्रेसनंतर आता शिवसेनेने शेतकऱ्यांच्या भारत बंद आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

ठळक मुद्देगेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूआम्ही मनापासून त्यांच्यासोबत आहोतसंजय राऊत यांनी शेतकऱ्यांच्या बंदला पाठिंबा दर्शवला

नवी दिल्ली: वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गेल्या १० महिन्यांपासून शेतकऱ्यांचे दिल्लीत आंदोलन सुरू असून, या कालावधीत सुमारे ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. शेतकरी नेते आणि केंद्र सरकार आपापल्या भूमिकांवर ठाम असल्यामुळे अद्यापही यावर तोडगा निघालेला नाही. यातच शेतकरी संघटना आणि नेत्यांनी देशभरात ‘भारत बंद’ची हाक दिल्यानंतर दिल्लीसह अनेक भागात वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. काँग्रेसनंतर आता शिवसेनेने शेतकऱ्यांच्या या भारत बंदला पाठिंबा दर्शवला आहे. (shiv sena sanjay raut said we support farmers from bottom of heart in bharat bandh protest)

“अमित शाह म्हणजे गजनी, उद्धव ठाकरे मात्र रामशास्त्री बाण्याचे नेतृत्व”; शिवसेनेची बोचरी टीका

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांचे अहिंसक आंदोलन आजही अखंड आहे. परंतु, शोषण करणाऱ्या सरकारला ते पसंत नाही, अशी टीका राहुल गांधींनी केंद्रातील मोदी सरकारवर केली आहे. 

“राजसाहेब, भाजपशी युती करा, फायदा होईल”; पुण्यातील मनसे नेत्यांचा दबाव वाढला!

आम्ही मनापासून त्यांच्यासोबत आहोत

गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. हा शेतकऱ्यांचा बंद आहे. देशातील प्रत्येक नागरिकाची भावना शेतकऱ्यांसोबत आहे. उद्योगधंदे तर अगोदरपासूनच बंद आहेत. बेरोजगारीमुळे लोक असेही घरातच बसलेले आहेत. त्यामुळे बंद तर सुरू आहेत त्यात शेतकऱ्यांनीही बंद पुकारलाय. आम्ही मनापासून त्यांच्यासोबत आहोत, या शब्दांत संजय राऊत यांनी शेतकऱ्यांच्या बंदला पाठिंबा दर्शवला.

शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना ईडीचे समन्स; सिटी बँक घोटाळा प्रकरणी हजर राहण्याचे आदेश

दरम्यान, शेतकऱ्यांचा ‘भारत बंद’ सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. शेतकऱ्यांकडून ॲम्ब्युलन्स आणि डॉक्टरांना वाट मोकळी करून दिली जाईल. परंतु, नागरिकांनी दुपारी जेवणाच्या वेळेनंतरच घरातून बाहेर पडावे, अन्यथा ट्राफिक जाममध्ये ते अडकून राहू शकतात, असे आवाहन भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केले आहे. दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा शेतकरी गोळा झाले आहेत. या बंदचा परिणाम रस्त्यांवरही दिसून आला. संयुक्त किसान मोर्चाने केलेल्या भारत बंदमुळे नोएडामध्ये वाहनांची मोठी रांगच रांग दिसून आल्या. दिल्ली गुरुग्राम हायवेवर अनेक किलोमीटर केवळ वाहनांची रांग लागलेली दिसून येत आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतcongressकाँग्रेसrakesh tikaitराकेश टिकैतRahul Gandhiराहुल गांधी