शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

“शिवसेनेचा मनापासून शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला पाठिंबा”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 14:36 IST

काँग्रेसनंतर आता शिवसेनेने शेतकऱ्यांच्या भारत बंद आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

ठळक मुद्देगेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूआम्ही मनापासून त्यांच्यासोबत आहोतसंजय राऊत यांनी शेतकऱ्यांच्या बंदला पाठिंबा दर्शवला

नवी दिल्ली: वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गेल्या १० महिन्यांपासून शेतकऱ्यांचे दिल्लीत आंदोलन सुरू असून, या कालावधीत सुमारे ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. शेतकरी नेते आणि केंद्र सरकार आपापल्या भूमिकांवर ठाम असल्यामुळे अद्यापही यावर तोडगा निघालेला नाही. यातच शेतकरी संघटना आणि नेत्यांनी देशभरात ‘भारत बंद’ची हाक दिल्यानंतर दिल्लीसह अनेक भागात वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. काँग्रेसनंतर आता शिवसेनेने शेतकऱ्यांच्या या भारत बंदला पाठिंबा दर्शवला आहे. (shiv sena sanjay raut said we support farmers from bottom of heart in bharat bandh protest)

“अमित शाह म्हणजे गजनी, उद्धव ठाकरे मात्र रामशास्त्री बाण्याचे नेतृत्व”; शिवसेनेची बोचरी टीका

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांचे अहिंसक आंदोलन आजही अखंड आहे. परंतु, शोषण करणाऱ्या सरकारला ते पसंत नाही, अशी टीका राहुल गांधींनी केंद्रातील मोदी सरकारवर केली आहे. 

“राजसाहेब, भाजपशी युती करा, फायदा होईल”; पुण्यातील मनसे नेत्यांचा दबाव वाढला!

आम्ही मनापासून त्यांच्यासोबत आहोत

गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. हा शेतकऱ्यांचा बंद आहे. देशातील प्रत्येक नागरिकाची भावना शेतकऱ्यांसोबत आहे. उद्योगधंदे तर अगोदरपासूनच बंद आहेत. बेरोजगारीमुळे लोक असेही घरातच बसलेले आहेत. त्यामुळे बंद तर सुरू आहेत त्यात शेतकऱ्यांनीही बंद पुकारलाय. आम्ही मनापासून त्यांच्यासोबत आहोत, या शब्दांत संजय राऊत यांनी शेतकऱ्यांच्या बंदला पाठिंबा दर्शवला.

शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना ईडीचे समन्स; सिटी बँक घोटाळा प्रकरणी हजर राहण्याचे आदेश

दरम्यान, शेतकऱ्यांचा ‘भारत बंद’ सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. शेतकऱ्यांकडून ॲम्ब्युलन्स आणि डॉक्टरांना वाट मोकळी करून दिली जाईल. परंतु, नागरिकांनी दुपारी जेवणाच्या वेळेनंतरच घरातून बाहेर पडावे, अन्यथा ट्राफिक जाममध्ये ते अडकून राहू शकतात, असे आवाहन भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केले आहे. दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा शेतकरी गोळा झाले आहेत. या बंदचा परिणाम रस्त्यांवरही दिसून आला. संयुक्त किसान मोर्चाने केलेल्या भारत बंदमुळे नोएडामध्ये वाहनांची मोठी रांगच रांग दिसून आल्या. दिल्ली गुरुग्राम हायवेवर अनेक किलोमीटर केवळ वाहनांची रांग लागलेली दिसून येत आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतcongressकाँग्रेसrakesh tikaitराकेश टिकैतRahul Gandhiराहुल गांधी