शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

“शिवसेनेचा मनापासून शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला पाठिंबा”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 14:36 IST

काँग्रेसनंतर आता शिवसेनेने शेतकऱ्यांच्या भारत बंद आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

ठळक मुद्देगेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूआम्ही मनापासून त्यांच्यासोबत आहोतसंजय राऊत यांनी शेतकऱ्यांच्या बंदला पाठिंबा दर्शवला

नवी दिल्ली: वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गेल्या १० महिन्यांपासून शेतकऱ्यांचे दिल्लीत आंदोलन सुरू असून, या कालावधीत सुमारे ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. शेतकरी नेते आणि केंद्र सरकार आपापल्या भूमिकांवर ठाम असल्यामुळे अद्यापही यावर तोडगा निघालेला नाही. यातच शेतकरी संघटना आणि नेत्यांनी देशभरात ‘भारत बंद’ची हाक दिल्यानंतर दिल्लीसह अनेक भागात वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. काँग्रेसनंतर आता शिवसेनेने शेतकऱ्यांच्या या भारत बंदला पाठिंबा दर्शवला आहे. (shiv sena sanjay raut said we support farmers from bottom of heart in bharat bandh protest)

“अमित शाह म्हणजे गजनी, उद्धव ठाकरे मात्र रामशास्त्री बाण्याचे नेतृत्व”; शिवसेनेची बोचरी टीका

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांचे अहिंसक आंदोलन आजही अखंड आहे. परंतु, शोषण करणाऱ्या सरकारला ते पसंत नाही, अशी टीका राहुल गांधींनी केंद्रातील मोदी सरकारवर केली आहे. 

“राजसाहेब, भाजपशी युती करा, फायदा होईल”; पुण्यातील मनसे नेत्यांचा दबाव वाढला!

आम्ही मनापासून त्यांच्यासोबत आहोत

गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. हा शेतकऱ्यांचा बंद आहे. देशातील प्रत्येक नागरिकाची भावना शेतकऱ्यांसोबत आहे. उद्योगधंदे तर अगोदरपासूनच बंद आहेत. बेरोजगारीमुळे लोक असेही घरातच बसलेले आहेत. त्यामुळे बंद तर सुरू आहेत त्यात शेतकऱ्यांनीही बंद पुकारलाय. आम्ही मनापासून त्यांच्यासोबत आहोत, या शब्दांत संजय राऊत यांनी शेतकऱ्यांच्या बंदला पाठिंबा दर्शवला.

शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना ईडीचे समन्स; सिटी बँक घोटाळा प्रकरणी हजर राहण्याचे आदेश

दरम्यान, शेतकऱ्यांचा ‘भारत बंद’ सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. शेतकऱ्यांकडून ॲम्ब्युलन्स आणि डॉक्टरांना वाट मोकळी करून दिली जाईल. परंतु, नागरिकांनी दुपारी जेवणाच्या वेळेनंतरच घरातून बाहेर पडावे, अन्यथा ट्राफिक जाममध्ये ते अडकून राहू शकतात, असे आवाहन भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केले आहे. दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा शेतकरी गोळा झाले आहेत. या बंदचा परिणाम रस्त्यांवरही दिसून आला. संयुक्त किसान मोर्चाने केलेल्या भारत बंदमुळे नोएडामध्ये वाहनांची मोठी रांगच रांग दिसून आल्या. दिल्ली गुरुग्राम हायवेवर अनेक किलोमीटर केवळ वाहनांची रांग लागलेली दिसून येत आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतcongressकाँग्रेसrakesh tikaitराकेश टिकैतRahul Gandhiराहुल गांधी