शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

हवेत उडणारे बुडबुडे फार काळ टिकणार नाहीत; संजय राऊतांचा शिंदे-भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 10:38 IST

शिवसेना-महाविकास आघाडीची ताकद, त्यांचे महाराष्ट्र आणि देशातील स्थान हे येणारा काळ ठरवेल असं संजय राऊत म्हणाले.

नवी दिल्ली - भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी समाजाचं मोठं योगदान आहे. त्यांचा संघर्ष फार मोठा आहे. इंग्रजांच्या काळात आदिवासी समाजानं लढे दिलेत. त्यांचे प्रतिनिधित्व द्रौपदी मुर्मू करत आहेत. पहिल्यांदाच या समाजाला इतक्या मोठ्या पदावर जाण्याची संधी मिळतेय या भावनेतून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे असं विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे. 

संजय राऊत म्हणाले की, आम्ही एनडीएत असताना युपीएच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेने पहिल्यांदाच असा निर्णय घेतला नाही. त्यामुळे आश्चर्यचकीत आणि संभ्रमित होण्याचं कारण नाही. हेमंत सोरेन यूपीएत आहेत त्यांनीही द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिल्यानं महाराष्ट्रात त्यांच्या मतांचा टक्का वाढेल असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत शिवसेना-महाविकास आघाडीची ताकद, त्यांचे महाराष्ट्र आणि देशातील स्थान हे येणारा काळ ठरवेल. आज जे काही बुडबुडे हवेत उडतायेत ते फार काळ राहणार नाही. हे सगळ्यांना माहिती आहे. भाजपा नेत्यांनाही माहिती आहे. तसं नसतं तर १५ दिवसानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार टाळला जातोय तो टाळण्यात आला नसता. प्रत्येक जण आपला पक्ष वाढवत असतो. या देशातील राजकारणाला काही अर्थ राहिला नाही. जगभरात कुठलाही गट निर्माण झाला तो आमचाच या मानसिकतेतून बाहेर पडलं पाहिजे असा टोला संजय राऊतांनी भाजपाला लगावला. 

दरम्यान, महाराष्ट्र स्थिर सावर होईल, शिवसेना-महाविकास आघाडी राज्यात पुन्हा काम करताना दिसेल. आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. कायदा, नियम आणि घटनेवर आमचा विश्वास आहे. सुप्रीम कोर्टात न्याय मेलेला नाही, रामशास्त्री आहेत याचा प्रत्यय भविष्यात येईल. दोन जणांचे मंत्रिमंडळ १५ दिवस चालले जगात लोकशाहीची अशी चेष्टा झाली नाही. इतका मोठा गट, इतका मोठा भाजपा, इतकं मोठं बहुमत मग १५ दिवसानंतरही मंत्रिमंडळ का स्थापन झाले नाही? कारण अपात्रतेची टांगती तलवार सरकारवर असल्याने विस्तार टाळला जातोय असंही संजय राऊत म्हणाले.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाShiv Senaशिवसेना