शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

हवेत उडणारे बुडबुडे फार काळ टिकणार नाहीत; संजय राऊतांचा शिंदे-भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 10:38 IST

शिवसेना-महाविकास आघाडीची ताकद, त्यांचे महाराष्ट्र आणि देशातील स्थान हे येणारा काळ ठरवेल असं संजय राऊत म्हणाले.

नवी दिल्ली - भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी समाजाचं मोठं योगदान आहे. त्यांचा संघर्ष फार मोठा आहे. इंग्रजांच्या काळात आदिवासी समाजानं लढे दिलेत. त्यांचे प्रतिनिधित्व द्रौपदी मुर्मू करत आहेत. पहिल्यांदाच या समाजाला इतक्या मोठ्या पदावर जाण्याची संधी मिळतेय या भावनेतून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे असं विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे. 

संजय राऊत म्हणाले की, आम्ही एनडीएत असताना युपीएच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेने पहिल्यांदाच असा निर्णय घेतला नाही. त्यामुळे आश्चर्यचकीत आणि संभ्रमित होण्याचं कारण नाही. हेमंत सोरेन यूपीएत आहेत त्यांनीही द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिल्यानं महाराष्ट्रात त्यांच्या मतांचा टक्का वाढेल असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत शिवसेना-महाविकास आघाडीची ताकद, त्यांचे महाराष्ट्र आणि देशातील स्थान हे येणारा काळ ठरवेल. आज जे काही बुडबुडे हवेत उडतायेत ते फार काळ राहणार नाही. हे सगळ्यांना माहिती आहे. भाजपा नेत्यांनाही माहिती आहे. तसं नसतं तर १५ दिवसानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार टाळला जातोय तो टाळण्यात आला नसता. प्रत्येक जण आपला पक्ष वाढवत असतो. या देशातील राजकारणाला काही अर्थ राहिला नाही. जगभरात कुठलाही गट निर्माण झाला तो आमचाच या मानसिकतेतून बाहेर पडलं पाहिजे असा टोला संजय राऊतांनी भाजपाला लगावला. 

दरम्यान, महाराष्ट्र स्थिर सावर होईल, शिवसेना-महाविकास आघाडी राज्यात पुन्हा काम करताना दिसेल. आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. कायदा, नियम आणि घटनेवर आमचा विश्वास आहे. सुप्रीम कोर्टात न्याय मेलेला नाही, रामशास्त्री आहेत याचा प्रत्यय भविष्यात येईल. दोन जणांचे मंत्रिमंडळ १५ दिवस चालले जगात लोकशाहीची अशी चेष्टा झाली नाही. इतका मोठा गट, इतका मोठा भाजपा, इतकं मोठं बहुमत मग १५ दिवसानंतरही मंत्रिमंडळ का स्थापन झाले नाही? कारण अपात्रतेची टांगती तलवार सरकारवर असल्याने विस्तार टाळला जातोय असंही संजय राऊत म्हणाले.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाShiv Senaशिवसेना