शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

SC Hearing on Maharashtra Political Crisis: “उद्धव ठाकरेंकडे बहुमत नव्हते, अशा व्यक्तीला मुख्यमंत्रीपदी राहण्याचा नैतिक अधिकार उरतो का?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 16:53 IST

SC Hearing on Maharashtra Political Crisis: शिवसेनेने सरकार स्थापन करु नये, असे म्हटले नाही. शिवसेनेने मविआमध्ये जाऊ नये, अशी भूमिका होती, असा युक्तिवाद शिंदे गटाकडून करण्यात आला.

SC Hearing on Maharashtra Political Crisis: एकीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे राज्याच्या विधिमंडळात घमासान झाले असताना दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवेळी शिंदे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद करत, उद्धव ठाकरेंकडे बहुमत नव्हते, अशा व्यक्तीला मुख्यमंत्रीपदी राहण्याचा नैतिक अधिकार उरतो का, अशी विचारणा केली. 

सर्वोच्च न्यायालात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरून सुरू असलेल्या बुधवारची सुनावणी संपली. ठाकरे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद पूर्ण केल्यानंतर आता शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद करण्यात येत असून, ज्येष्ठ विधिज्ञ नीरज कौल यांनी युक्तिवाद केला. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडीचेच १३ सदस्य गैरहजर होते. त्यांच्या स्वत:च्या लोकांचाच त्यांच्यावर विश्वास नव्हता राहिला. अपात्रतेची याचिका प्रलंबित असलेल्या ४२ आमदारांना वगळले, तरी उद्धव ठाकर सरकारकडे बहुमत नव्हते. बहुमत नसलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपदी राहण्याचा नैतिक अधिकार उरतो का, अशी विचारणा केली. तसेच नीरज कौल यांनी सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाच्या बैठकीत मंजूर केलेल्या ठरावाची प्रत वाचून दाखवली.

मतदान अपात्र कसे ठरवणार?

मतदानाची कारवाई प्रलंबित असताना आमदारांना मतदानापासून रोखता येणार नाही. जर आमदार अपात्र ठरले, तर त्यांनी घेतलेले निर्णय किंवा निर्णयांवर दिलेले मतदान अपात्र कसे ठरवणार, असा प्रश्नही नीरज कौल यांनी यावेळी उपस्थित केला. जर विधिमंडळाचे बहुतांश सदस्य राजकीय अधिकारांनुसार प्रतोदाची नियुक्ती करतात, तर मग आम्ही त्याच प्रतोदाने जारी केलेला व्हीप फॉलो करणार, असेही कौल यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच आम्ही कधीच शिवसेनेने सरकार स्थापन करू नये, असे म्हटले नाही. आमची सुरुवातीपासून भूमिका ही शिवसेनेने मविआमध्ये जाऊ नये अशी होती, असे कौल यांनी स्पष्टपणे सांगितले. 

बहुसंख्य सदस्यांनी नेमलेल्या प्रतोदचा व्हीप पाळायला हवा?

तुमच्या दाव्यानुसार विधिमंडळ पक्षाने नेमलेल्या प्रतोदचा व्हीप पाळायला हवा. पण इथे दोन व्हीप एकाच वेळी अस्तित्वात आहेत. याचा अर्थ तुमच्यामते बहुसंख्य सदस्यांनी नेमलेल्या प्रतोदचा व्हीप पाळायला हवा, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या वकिलांना केला. बहुमत आणि व्हीप पाहून अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे उत्तर कौल यांनी दिले. या सुनावणीवेळी जर विधानसभा अध्यक्षांनी ३९ आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई केली असती, तर कदाचित मविआ आघाडीचे सरकार सत्तेत राहिले नसते, पण तसे झाले असते, तर महाराष्ट्रातल्या सत्तेचे चित्र वेगळे काहीतरी दिसले असते. विधानसभा अध्यक्ष एकनाथ शिंदेंना तेव्हा अपात्र ठरवू शकले नाहीत, म्हणून एकनाथ शिंदेंना सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली आणि त्यांचा शपथविधी झाला हा त्यांचा दावा एका अर्थाने बरोबर आहे, असे मत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केले. 

दरम्यान, गुरुवारी सकाळी पहिला एक तास नीरज कौल युक्तिवाद करणार आहेत. त्यानंतर महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंग युक्तिवाद करतील. दुपारी लंचपूर्वी सॉलिसिटर जनरल हरिश साळवे यांचा युक्तिवाद होईल. लंचनंतर ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल रिजॉइंडर सादर करतील, असे सांगितले जात आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय