शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

'त्या ठिकाणी मशिदच बनणार, कोणासाठीच जागा नाही सोडणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2017 21:18 IST

मशिदीच्या जागेवर फक्त मशिदच बांधली जाईल, जे लोक राम मंदिरासाठी मुस्लिमांनी त्या जागेवरील आपला दावा सोडून द्यावा असं सांगत आहेत त्यांनी यासाठी स्वतःची संपत्ती दान करावी...

ठळक मुद्देमशिदीच्या जागेवर फक्त मशिदच बांधली जाईल जे लोक राम मंदिरासाठी मुस्लिमांनी त्या जागेवरील आपला दावा सोडून द्यावा असं सांगत आहेत त्यांनी यासाठी स्वतःची संपत्ती दान करावी

लखनऊ, दि. 18 - मशिदीच्या जागेवर फक्त मशिदच बांधली जाईल असं विधान रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या वादावर  शिया मुस्लिमांचे धर्मगुरु मौलाना कल्बे जव्वाद यांनी केलं आहे. जे लोक राम मंदिरासाठी मुस्लिमांनी त्या जागेवरील आपला दावा सोडून द्यावा असं सांगत आहेत त्यांनी यासाठी स्वतःची संपत्ती दान करावी असं मजलिस-ए-उलेमा-ए-हिंदचे महासचिव कल्बे जव्वाद म्हणाले आहेत. काही दिवसांपूर्वी अयोध्या येथील राम जन्मभूमी-बाबरी मशिदीच्या वादात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मुस्लीम समाजाच्या बाजूने लागला, तरी मुस्लिमांनी त्या जागेवरील आपला दावा सोडून देऊन लाखो देशवासीयांची मने जिंकावीत, असे आवाहन शिया मुस्लिमांचे ज्येष्ठ धर्मगुरू मौलाना कल्बे सादिक यांनी केले होते. 

सादिक यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना कल्बे जव्वाद म्हणाले, जे लोकं राम मंदिरासाठी मुस्लिमांनी त्या जागेवरील आपला दावा सोडून द्यावा असं सांगत आहेत त्यांना स्वतःची जमीन देण्याचा अधिकार आहे. मशिदिसाठीच्या जमिनीबाबत ते अशी घोषणा करू शकत नाहीत. जी गोष्ट तुमची नाहीये त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये.  त्या जागेवरील आपला दावा सोडून द्या असं सांगणा-यांनी यासाठी स्वतःचं घर आणि संपत्ती दान करावी असं ते म्हणाले. एनबीटीने याबाबत वृत्त दिलं आहे.  

काय म्हणाले होते मुस्लिमांचे ज्येष्ठ धर्मगुरू मौलाना कल्बे सादिक -अयोध्या येथील राम जन्मभूमी-बाबरी मशिदीच्या वादात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मुस्लीम समाजाच्या बाजूने लागला, तरी मुस्लिमांनी त्या जागेवरील आपला दावा सोडून देऊन लाखो देशवासीयांची मने जिंकावीत, असे आवाहन शिया मुस्लिमांचे ज्येष्ठ धर्मगुरू मौलाना कल्बे सादिक यांनी रविवारी येथे केले.वरळी येथील ‘नॅशनल स्पोर्ट्स क्लब आॅफ इंडिया’ येथे ‘अहिंसा विश्व भारती’ या संस्थेतर्फे आयोजित ‘जागतिक शांतता परिषदेत’ ते बोलत होते. अयोध्येतील हा वाद हिंदू व मुस्लीम परस्पर सन्मानाने सोडविण्यावर भर देत, कल्बे सादिक यांनी त्या दृष्टीने शिया समुदायातर्फे हे सलोख्याचे पाऊल टाकले.मौलाना कल्बे सादिक म्हणाले की, रामजन्मभूमी-बाबरी मशिदीचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात असून, न्यायालयावर आमचा विश्वास आहे. न्यायालयाचा निकाल मुस्लीम समाजाच्या विरोधात गेला, तरी त्यांनी तो शांततेने मान्य करावा. आपल्या या मताला इस्लामी धर्मशास्त्राचा दाखला देत, कल्बे सादिक म्हणाले की, जो मनापासून दान करतो, त्याला अल्ला काही कमी पडू देत नाही. त्यामुळे सर्वात प्राणप्रिय अशी वस्तू दिल्याने देणा-याला त्याच्या हजारपटीने परत मिळते. मौलाना कल्बे सादिक शिया पंथियांच्या ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे उपाध्यक्षही आहेत.