शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

‘ती’ला करायचेय ‘मोदीं’सोबत लग्न, एक महिन्यापासून करतेय धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2017 8:23 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची सेवा करत आहेत मला त्यांची सेवा करायची आहे. ते एकटे आहेत. माझंही लग्न मोडलंय त्यामुळे मी देखील एकटी आहे.

ठळक मुद्देमला नरेंद्र मोदीजींशी लग्न करायचे आहे. असे म्हणत गेल्या एक महिन्यापासून एक महिला दिल्लीत धरणे धरुन बसली विशेष म्हणजे पहिल्या लग्नापासून तिला 20 वर्षांची मुलगी आहे. जयपूर मधील रखोडा गावात राहणाऱ्या शांती शर्मा यांच्याकडे मोठा जमिन जुमला आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची सेवा करत आहेत मला त्यांची सेवा करायची आहे. ते एकटे आहेत. माझंही लग्न मोडलंय त्यामुळे मी देखील एकटी आहे. आम्हाला दोघांनाही साथीदाराची गरज आहे. त्यामुळे मला नरेंद्र मोदीजींशी लग्न करायचे आहे. असे म्हणत गेल्या एक महिन्यापासून एक महिला दिल्लीत धरणे धरुन बसली आहे. त्या महिलेचे नाव ओम शांती शर्मा असे असून ती 40 वर्षांची आहे. विशेष म्हणजे पहिल्या लग्नापासून तिला 20 वर्षांची मुलगी आहे. 

राजधानी दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी यापुढे कोणतीही राजकीय, सामाजिक आंदोलने, मोर्चे व घोषणाबाजी करता येणार नाही. राष्ट्रीय हरित लवादाने तिथे यापुढे आंदोलनाला परवानी देऊ नये, असे आदेश दिल्ली सरकारला दिले. त्यानंतर येथे धरणे आंदोलन करणारी ओम शांती शर्मा समोर आली. 

राजस्थान जयपूर येथे राहणाऱ्या ओम शांती शर्मा (40) या 8 सप्टेंबरपासून जंतरमंतरवर धरणे धरुन बसल्या आहेत. मोदींना आवाहन करणारे एक मोठे पोस्टर घेऊन ती तेथे बसली आहे. त्यात तिने आपली मोदींशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नरेंद्र मोदीजी एकटे आहेत. माझंही लग्न मोडलंय त्यामुळे मी देखील एकटी आहे. आम्हाला दोघांनाही साथीदाराची गरज आहे. त्यामुळे मला नरेंद्र मोदीजींशी लग्न करायचे आहे. मी जेव्हापासून इथे बसलेय लोक माझ्यावर हसतात, माझी मस्करी करतात पण मला त्यांच्याशी काहीही घेणं देणं नाही. मला मोदींशी लग्न करायचे आहे. ते देशाची सेवा करतात मला त्यांची सेवा करायची आहे. ते जोपर्यंत इथे येऊन माझी भेट घेत नाहीत तोपर्यंत मी इथे अशीच बसून राहणार. असे ओम शांती शर्मानं इंडिया टुडेला सांगितले. 

माझे आधी लग्न झाले होते. मात्र तो संसार फार काळ चालला नाही. माझ्या नवऱ्याने मला फसविले.  गेली अनेक वर्षे मी एकटीच आहे. फक्त मोदीच माझे दुःख समजू शकतात. मी लग्नाच्या अनेक प्रस्तावांना नकार दिला आणि आता मला मोदींशी लग्न करायचे आहे. जयपूरमध्ये माझ्या मालकीची खूप जमीन आहे. त्यातील काही भाग विकून मोदींसाठी भेटवस्तू घेण्याची माझी इच्छा आहे. असेही तिने सांगितले. 

जयपूरमध्ये वीस एकर जमीनजयपूर मधील रखोडा गावात राहणाऱ्या शांती शर्मा यांच्याकडे मोठा जमिन जुमला आहे. त्यांच्या नावावर तब्बल वीस एकर जमिन, दोन घरं आहेत मात्र ते सगळं सोडून त्या मोदींशी लग्न करण्यासाठी  उघड्यावर येऊन राहत आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJantar Mantarजंतर मंतर