शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : खामोश! कुछ तो गडबड है; काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांचा निकालावर संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 12:29 IST

भाजपामधून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या अनेक नेत्यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यामध्ये भाजपाचे माजी खासदार आणि काँग्रेसचे बिहारमधील उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देभाजपामधून काँग्रेसमध्ये दाखल झालेले अनेक नेत्यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले आहे. निवडणुकीचे निकाल पाहिल्यावर यावेळी काहीतरी गेम खेळला गेला असल्याचा संशय शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केला आहे.केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना 604956 मतं मिळाली तर शत्रुघ्न सिन्हा यांना  321840 मतं मिळाली आहेत. 

बिहार - भारतातील मतदारांनी देशाची सत्ता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हाती सोपविण्याचा ऐतिहासिक कौल गुरुवारी (23 मे) दिला. मोदींच्या झंझावातात, काँग्रेसचे अनेक दिग्गज नेत्यांना पराभव पत्करावा लागला आहे. भाजपामधूनकाँग्रेसमध्ये दाखल झालेल्या अनेक नेत्यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यामध्ये भाजपाचे माजी खासदार आणि काँग्रेसचे बिहारमधील उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांचा समावेश आहे. निवडणुकीचे निकाल पाहिल्यावर यावेळी काहीतरी गेम खेळला गेला असल्याचा संशय शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केला आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना 604956 मतं मिळाली तर शत्रुघ्न सिन्हा यांना  321840 मतं मिळाली आहेत. 

शत्रुघ्न सिन्हा यांनी पराभवानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना 'या निवडणुकीत काहीतरी मोठा गेम खेळला गेला आहे. विशेषत: उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश या राज्यांचे निकाल पाहता येथे मोठ्या प्रमाणात नक्कीच काहीतरी गेम झाला आहे. अर्थात हे सर्व बोलण्याची ही योग्य वेळ नाही.' असं म्हटलं आहे. तसेच त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपाचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे. 'नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोघांचे मी अभिनंदन करतो. हे दोघेही उत्तम रणनीतीकार आहेत. माझे जुने मित्र रविशंकर प्रसाद यांना देखील शुभेच्छा देतो. पाटणा आता 'स्मार्ट सिटी' बनेल अशी आशा करतो,' असं म्हणत शत्रुघ्न यांनी त्यांना मतं देणाऱ्या मतदारांचे देखील आभार मानले आहेत. 

पाटणासाहिब मतदारसंघातून पराभूत झालेले सिन्हा यांनी आपली खंत माध्यमांसमोर बोलून दाखवली. सत्याशी आणि तत्वांशी तडजोड न करण्याची मोठी किंमत मोजावी लागल्याचे सिन्हा यांनी म्हटले. तसेच लालकृष्ण अडवाणी यांचा निकटवर्तीय असण्याचा आपल्याला फटका बसला. माझं तत्वांशी एकनिष्ठ राहणे त्यांना पसंत नव्हते. भाजपामधील लोकशाहीचे रुपांतर हुकूमशाहीत झाले आहे. त्याचे अनेक उदाहरणे आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्याय व्यवस्था धोक्यात असल्याचे सांगतात. संविधानावर सतत हल्ले करण्यात येत आहेत, असल्याने आपण भाजपापासून दुरावल्याचे सिन्हा यांनी म्हटले. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 

कोणत्याही एका व्यक्तीपेक्षा पक्ष मोठाच असतो आणि पक्ष हा देशापेक्षा मोठा असतो, यावर माझा विश्वास आहे. माझं सत्यासोबत असणे मोदी ऍन्ड कंपनीला खटकत होते. त्यांनी मला अनेकदा निमूटपणे सर्वकाही पाहण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यावर दडपण आणल्याचे सिन्हा यांनी नमूद केले.दरम्यान ममता बॅनर्जी, अखिलेश यादव आणि लालू प्रसाद यादव यांनी आपल्याला त्यांच्या पक्षात येण्यासाठी विनंती केली होती. परंतु आपण काँग्रेसमध्ये सामील झालो. त्याचे दोन कारणं होती. एक म्हणजे, राहुल गांधी उद्याचा चेहरा आहेत. त्यातच पक्षाच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी तीन राज्यात काँग्रेसला विजय मिळवून दिला. राहुल यांनी सिद्ध केलं की, कोण पप्पू आणि कोण फेकू, असा टोलाही सिन्हा यांनी यावेळी लगावला.

 

टॅग्स :Shatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाBJPभाजपाcongressकाँग्रेसBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक निकाल 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९