शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

"तज्ज्ञांना सेवेत आणण्याचा हाच अनिवार्य मार्ग’’, लेटरल एंट्रीला शशी थरूर यांचा पाठिंबा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 13:48 IST

Congress MP Shashi Tharoor's Support Lateral Entry: काँग्रेसकडून लेटरल एंट्रीला विरोध केला जात असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी मात्र लेटरल एंट्रीला पाठिंबा दिला आहे. लेटरल एंट्री हाच सरकारी व्यवस्थेमध्ये तज्ज्ञांना समाविष्ट करण्याचा अनिवार्य मार्ग आहे, असं मत शशी थरूर यांनी मांडलं आहे. 

परीक्षा न देता आएएस अधिकारी तयार करणारी व्यवस्था म्हणजेच लेटरल एंट्री प्रोसेस सध्या देशाच्या राजकारणात चर्चेत आहे. मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी लेटरल एंट्रीमधून होत असलेल्या ४५ नियुक्त्यांना विरोध केला आहे. एवढंच नाही तर केंद्रातील सत्ताधारी एनडीएमधील काही घटक पक्षांनीही याला विरोध केला आहे. तर लेटरल एंट्रीची सुरुवात ही यूपीए सरकारच्या काळातच झाली होती, असा दावा केंद्र सकराकरडून करण्यात आला आहे. आता लेटरल एंट्रीबाबत सर्वपक्षीय नेते वेगवेगळ्या भूमिका मांडत आहेत. यादरम्यान, काँग्रेसकडून लेटरल एंट्रीला विरोध केला जात असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी मात्र लेटरल एंट्रीला पाठिंबा दिला आहे. लेटरल एंट्री हाच सरकारी व्यवस्थेमध्ये तज्ज्ञांना समाविष्ट करण्याचा अनिवार्य मार्ग आहे, असं मत शशी थरूर यांनी मांडलं आहे. 

शशी थरूर यांनी सोशल मीडिया साईट एक्सवरील त्यांच्या लिहिलं की, लेटरल एंट्री ही सरकारसाठी कुठल्याही खास क्षेत्रामध्ये प्राविण्य असलेले तज्ज्ञ मिळवण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे ज्या क्षेत्रातील तज्ज्ञ आपल्याकडे नाहीत,  त्या क्षेत्रामधील कामकाजासाठी मदत मिळते. मात्र ही बाब काही काळासाठी योग्य ठरेल. दीर्घकालीन विचार केल्यास सध्याच्या नियमांनुसार भरती करण्यात आलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना सरकारने प्रशिक्षित करणं आवश्यक आहे.

दरम्यान, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अर्थात यूपीएससीच्या अधिसूचनेवर केवळ विरोधकच नाही तर सत्ताधारी एनडीएतील पक्षांतूनही विरोध होताना दिसत आहे. एनडीएतील नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त) आणि चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने (रामविलास पासवान)ही या निर्णयाचा विरोध केला आहे. यांच्या मते, कुठल्याही सरकारी भरतीमध्ये आरक्षणाशीची तरतूद असणे आवश्यक आहे.  

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरupscकेंद्रीय लोकसेवा आयोगCentral Governmentकेंद्र सरकारcongressकाँग्रेस