शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Shashi Tharoor: “२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधक एकत्र येतील”

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 14:01 IST

देशात सध्या स्वतंत्र आवाजाचा गळा घोटला जात असल्याचे शशी थरूर यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली: आगामी वर्षात देशभरात होत असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांसह २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी हळूहळू सर्व पक्ष तयारी करायला लागले असल्याचे सांगितले जात आहे. यातच सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येतील, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी केला आहे. 

आताच्या घडीला भाजपविरोधी पक्षांचे लोक वेगवेगळी विधाने करत आहेत, ते भाजपला हरवण्यासाठी एकत्र येतील. कारण, भाजपला हरवणे हेच सर्व पक्षांचे लक्ष्य आहे, असे शशी थरूर यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएच्या व्यतिरिक्त वेगळा पर्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असून, जे लढतील त्या सर्वांना सोबत घेतले जाईल, असे विधान ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यावेळी केले होते. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शशी थरूर यांनी सदर दावा केला आहे.

गेल्या सात वर्षांपासून सुशासन गायब  

'प्राइड, प्रेजुडिस एंड पंडित्री' या शशी थरुर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले, त्यावेळी ते बोलत होते. देशात गेल्या सात वर्षांपासून सुशासन गायब असून, सुशासनाची जागा ही घोषणा आणि प्रतिकात्मकतेच्या राजकारणाने घेतली आहे. तसेच देशात सध्या स्वतंत्र आवाजाचा गळा घोटला जात असल्याचा आरोप शशी थरुर यांनी यावेळी केला. राजकारणात एक आठवड्याचा कालावधीही खूप मोठा असतो. पुढील लोकसभा निवडणुकीला तर अजून अडीच वर्षांचा काळ बाकी आहे. त्यामुळे वेगवेगळ्या आवाजात बोलणारे लोक एकत्र येऊन भाजपचा पराभव करतील, असे शशी थरूर यांनी म्हटले आहे. केवळ भाजपचा पराभवच नाही, तर त्यांची धोरणे आणि राजकारण हेही ध्येय असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भेट घेतली होती. फॅसिस्टवादाच्या विरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. सध्याच्या सत्तेविरोधात पर्यायी व्यवस्था उभी राहणे अत्यावश्यक आहे. भाजप विरोधात जे लढतील त्या सर्वांना एकत्र घेणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.  

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा