शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

Shashi Tharoor: “२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधक एकत्र येतील”

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 14:01 IST

देशात सध्या स्वतंत्र आवाजाचा गळा घोटला जात असल्याचे शशी थरूर यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली: आगामी वर्षात देशभरात होत असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांसह २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी हळूहळू सर्व पक्ष तयारी करायला लागले असल्याचे सांगितले जात आहे. यातच सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येतील, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी केला आहे. 

आताच्या घडीला भाजपविरोधी पक्षांचे लोक वेगवेगळी विधाने करत आहेत, ते भाजपला हरवण्यासाठी एकत्र येतील. कारण, भाजपला हरवणे हेच सर्व पक्षांचे लक्ष्य आहे, असे शशी थरूर यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएच्या व्यतिरिक्त वेगळा पर्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असून, जे लढतील त्या सर्वांना सोबत घेतले जाईल, असे विधान ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यावेळी केले होते. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शशी थरूर यांनी सदर दावा केला आहे.

गेल्या सात वर्षांपासून सुशासन गायब  

'प्राइड, प्रेजुडिस एंड पंडित्री' या शशी थरुर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले, त्यावेळी ते बोलत होते. देशात गेल्या सात वर्षांपासून सुशासन गायब असून, सुशासनाची जागा ही घोषणा आणि प्रतिकात्मकतेच्या राजकारणाने घेतली आहे. तसेच देशात सध्या स्वतंत्र आवाजाचा गळा घोटला जात असल्याचा आरोप शशी थरुर यांनी यावेळी केला. राजकारणात एक आठवड्याचा कालावधीही खूप मोठा असतो. पुढील लोकसभा निवडणुकीला तर अजून अडीच वर्षांचा काळ बाकी आहे. त्यामुळे वेगवेगळ्या आवाजात बोलणारे लोक एकत्र येऊन भाजपचा पराभव करतील, असे शशी थरूर यांनी म्हटले आहे. केवळ भाजपचा पराभवच नाही, तर त्यांची धोरणे आणि राजकारण हेही ध्येय असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भेट घेतली होती. फॅसिस्टवादाच्या विरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. सध्याच्या सत्तेविरोधात पर्यायी व्यवस्था उभी राहणे अत्यावश्यक आहे. भाजप विरोधात जे लढतील त्या सर्वांना एकत्र घेणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.  

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा