शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

शरद पवारांनी सांगितलं मोदींचं नेमकं काय चुकलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 12:24 IST

राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदींना त्यांची मोठी चूक दाखवून दिली आहे.  

ठळक मुद्देसाडेचार वर्षांपूर्वी विकासाबद्दल बोलणारे आता फक्त गांधी कुटुंबावर हल्ला का करताहेत?आता तुम्हाला बघून घेऊ, अशी धमकी घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने देणं अशोभनीय आहे.काँग्रेसचं नेतृत्व जनतेनं स्वीकारलंय, आता सपा-बसपानंही त्यांना साथ द्यावी.

मुंबईः राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपाला सत्ता का गमवावी लागली, याचं चिंतन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा करतील तेव्हा करतील; परंतु राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदींना त्यांची मोठी चूक दाखवून दिली आहे.  

जनता कुणाचीही मग्रुरी सहन करत नाही, निकालानंतर शरद पवारांचा मोदींना टोला

'एका कुटुंबाने काही केलं नाही, असं म्हणत नरेंद्र मोदी सातत्याने गांधी कुटुंबावर टीका करत राहिले. परंतु, आजच्या तरुण मतदारांनी पंडित नेहरू, इंदिरा गांधी किंवा अगदी राजीव गांधींनाही पाहिलेलं नाही. त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना पाहिलंय. हे दोघंही सत्तेच्या खुर्चीवर नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ला करणं जनतेला रुचलं नाही. उलट, साडेचार वर्षांपूर्वी विकासाबद्दल बोलणारे आता फक्त गांधी कुटुंबावर हल्ला का करताहेत, याबद्दल त्यांना आश्चर्यच वाटलं आणि ही टीकाच भाजपाला भोवली', असं मत शरद पवार यांनी मांडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापरलेल्या भाषेवरही त्यांनी टिप्पणी केली. आता तुम्हाला बघून घेऊ, अशी धमकी घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने देणं अशोभनीय असल्याची चपराक त्यांनी लगावली. 

शेतकरी, आदिवासी आणि ग्रामीण भागासोबतच शहरी भागांतही मतदारांनी भाजपाला नाकारलं आहे. याचाच अर्थ जो वर्ग विकासाच्या मुद्द्यावर भाजपासोबत गेला होता, तोही मोदी सरकारवर नाराज आहे, याकडे शरद पवारांनी लक्ष वेधलं. सीबीआय, रिझर्व्ह बँक यासारख्या स्वायत्त संस्थांवर केलेला हल्ला, निवडणुकीतील पैशाचा वापर हे मुद्देही निर्णायक ठरल्याचं पवार म्हणाले. 

काँग्रेसला साथ द्या!

पाच राज्यांमधील निवडणूक निकाल पाहता काँग्रेसचं नेतृत्व जनतेनं स्वीकारल्याचं स्पष्ट होतंय. त्यामुळे आता समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीनेही विरोधी आघाडीत सहभागी व्हावं, काँग्रेसला साथ द्यावी, असं आवाहन पवारांनी केलं. 

दरम्यान, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये बहुमतापासून अवघ्या दोन जागा दूर असलेल्या काँग्रेसला बहुजन समाज पार्टीने पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झालाय. शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे. आता काँग्रेस कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घालणार, याबद्दल उत्सुकता आहे.  

टॅग्स :Assembly Election 2018 Resultsविधानसभा निवडणूक 2018 निकालMadhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकChhattisgarh Assembly Election 2018छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदी