शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
5
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
6
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
7
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
8
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
9
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
10
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
11
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
12
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
13
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
14
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
15
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
17
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
18
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
19
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...

शरद पवारांनी सांगितलं मोदींचं नेमकं काय चुकलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 12:24 IST

राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदींना त्यांची मोठी चूक दाखवून दिली आहे.  

ठळक मुद्देसाडेचार वर्षांपूर्वी विकासाबद्दल बोलणारे आता फक्त गांधी कुटुंबावर हल्ला का करताहेत?आता तुम्हाला बघून घेऊ, अशी धमकी घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने देणं अशोभनीय आहे.काँग्रेसचं नेतृत्व जनतेनं स्वीकारलंय, आता सपा-बसपानंही त्यांना साथ द्यावी.

मुंबईः राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपाला सत्ता का गमवावी लागली, याचं चिंतन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा करतील तेव्हा करतील; परंतु राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदींना त्यांची मोठी चूक दाखवून दिली आहे.  

जनता कुणाचीही मग्रुरी सहन करत नाही, निकालानंतर शरद पवारांचा मोदींना टोला

'एका कुटुंबाने काही केलं नाही, असं म्हणत नरेंद्र मोदी सातत्याने गांधी कुटुंबावर टीका करत राहिले. परंतु, आजच्या तरुण मतदारांनी पंडित नेहरू, इंदिरा गांधी किंवा अगदी राजीव गांधींनाही पाहिलेलं नाही. त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना पाहिलंय. हे दोघंही सत्तेच्या खुर्चीवर नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ला करणं जनतेला रुचलं नाही. उलट, साडेचार वर्षांपूर्वी विकासाबद्दल बोलणारे आता फक्त गांधी कुटुंबावर हल्ला का करताहेत, याबद्दल त्यांना आश्चर्यच वाटलं आणि ही टीकाच भाजपाला भोवली', असं मत शरद पवार यांनी मांडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापरलेल्या भाषेवरही त्यांनी टिप्पणी केली. आता तुम्हाला बघून घेऊ, अशी धमकी घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने देणं अशोभनीय असल्याची चपराक त्यांनी लगावली. 

शेतकरी, आदिवासी आणि ग्रामीण भागासोबतच शहरी भागांतही मतदारांनी भाजपाला नाकारलं आहे. याचाच अर्थ जो वर्ग विकासाच्या मुद्द्यावर भाजपासोबत गेला होता, तोही मोदी सरकारवर नाराज आहे, याकडे शरद पवारांनी लक्ष वेधलं. सीबीआय, रिझर्व्ह बँक यासारख्या स्वायत्त संस्थांवर केलेला हल्ला, निवडणुकीतील पैशाचा वापर हे मुद्देही निर्णायक ठरल्याचं पवार म्हणाले. 

काँग्रेसला साथ द्या!

पाच राज्यांमधील निवडणूक निकाल पाहता काँग्रेसचं नेतृत्व जनतेनं स्वीकारल्याचं स्पष्ट होतंय. त्यामुळे आता समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीनेही विरोधी आघाडीत सहभागी व्हावं, काँग्रेसला साथ द्यावी, असं आवाहन पवारांनी केलं. 

दरम्यान, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये बहुमतापासून अवघ्या दोन जागा दूर असलेल्या काँग्रेसला बहुजन समाज पार्टीने पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झालाय. शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे. आता काँग्रेस कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घालणार, याबद्दल उत्सुकता आहे.  

टॅग्स :Assembly Election 2018 Resultsविधानसभा निवडणूक 2018 निकालMadhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकChhattisgarh Assembly Election 2018छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदी