शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

निधड्या छातीच्या मनदीप सिंग यांनी 'अशी' दिली चिनी सैन्याला टक्कर; भावानं सांगितली त्यांच्या शौर्याची कहाणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 16:23 IST

मनदीप सिंग ज्या पोस्टवर शहीद झाले. त्याच पोस्टवरून त्यांचे भाऊ निर्मल सिंग गेल्या 30 एप्रिलला लष्करातून सेवानिवृत्त झाले होते.

ठळक मुद्दे15 दिवसांपूर्वी आपली सुट्टी संपवून मनदीप सिंग हे पुन्हा लष्कराच्या सेवेत रूजू झाले होते. शहीद होण्यापूर्वी होण्यापूर्वी मनदीप सिंग हे शत्रू सैन्याशी मोठ्या धैर्याने लढत होते, असे त्यांच्या टीममधील एका जवानाने सांगितले.

पटियाला : लडाखच्या गलवान खोऱ्यात वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) गेल्या सोमवारी भारत-चीन सैन्यांमध्ये हिंसक चकमक झाली. या चकमकीत पंजाबच्या पटियाला जिल्ह्यातील रहिवासी असलेले जवान मनदीप सिंग शहीद झाले. 15 दिवसांपूर्वी आपली सुट्टी संपवून मनदीप सिंग हे पुन्हा लष्कराच्या सेवेत रूजू झाले होते. शहीद होण्यापूर्वी होण्यापूर्वी मनदीप सिंग हे शत्रू सैन्याशी मोठ्या धैर्याने लढत होते, असे त्यांच्या टीममधील एका जवानाने सांगितले. हा जवान या चकमकीदरम्यान गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मनदीप सिंग ज्या पोस्टवर शहीद झाले. त्याच पोस्टवरून त्यांचे भाऊ निर्मल सिंग गेल्या 30 एप्रिलला लष्करातून सेवानिवृत्त झाले होते. निर्मल सिंग यांनी भावूक होत आपल्या भावाच्या धैर्याची कहाणी सांगितली. ते म्हणाले की, "मनदीप आपल्या टीमचा लीडर होता. ज्यावेळी चीनकडून हल्ला करण्यात आला, त्यावेळी तो धैर्याने आणि आत्मविश्वासाने पुढे गेला. त्याने दोन चीनचे सैनिक पकडले होते. मात्र, त्याचवेळी चीनच्या तिसऱ्या जवानाने मनदीपवर हल्ला केला. ज्यामुळे तो शहीद झाला."

मनदीपच्या टीममधील एक जवान गंभीर जखमी झाला आहे. तो रुग्णालयात दाखल आहे. त्याने फक्त मनदीपच्या धाडसाबद्दल सांगितल्याचे निर्मल सिंग म्हणाले. तसेच, त्यांनी सांगितले की, "मनदीप शस्त्रू सैन्यावर तुटून पडत होता. त्याने कोणावरही हल्ला केला, तर तो पुन्हा उठला नाही." यावेळी मनदीप सिंग यांच्या शौर्याची कहाणी सांगताना निर्मल सिंग भावूक झाले होते. ते म्हणाले, "बुधवारी सकाळी फोन आला आणि मनदीप जखमी झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर दुपारी पुन्हा फोन आला आणि सांगण्यात आले की, चिनी सैन्याशी लढताना मनदीप शहीद झाले."

दरम्यान, भारत आणि चीनमध्ये सोमवारी झालेल्या हिंसक धुमश्चक्रीमध्ये चीनचे 43 हून सैनिक मारले गेले आहेत. तर भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. चीनच्या सैनिकांनी भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो त्यांच्याच अंगलट आला आहे. या घटनेनंतर सीमेवरील तणाव वाढला असून चीनविरोधात संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे आता लडाख सीमेजवळच नाही तर संपूर्ण सीमेवर जवान सतर्क आहेत. 

आणखी बातम्या...

देमचोक, पेंगाँग भागातील गावे खाली करण्याचे लष्काराचे आदेश, सूत्रांची माहिती

भारताची चीनला घेरण्याची तयारी, सीमेवर जवान सतर्क, रस्ता बांधणीला वेग

कॉल आला अन् सांगितले, "तुम्ही अमनचे वडील आहात? तुमचा मुलगा देशासाठी शहीद झाला"

India China FaceOff : भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनला सुनावले, म्हणाले...

India Chine Faceoff : जवानांचे बलिदान देश कधीच विसरणार नाही - राजनाथ सिंह

दहा महिन्यांपूर्वी परिधान केली होती लष्कराची वर्दी, आता येणार तिरंग्यात लपेटलेले पार्थिव

टॅग्स :ladakhलडाखchinaचीनIndiaभारत