शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

निधड्या छातीच्या मनदीप सिंग यांनी 'अशी' दिली चिनी सैन्याला टक्कर; भावानं सांगितली त्यांच्या शौर्याची कहाणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 16:23 IST

मनदीप सिंग ज्या पोस्टवर शहीद झाले. त्याच पोस्टवरून त्यांचे भाऊ निर्मल सिंग गेल्या 30 एप्रिलला लष्करातून सेवानिवृत्त झाले होते.

ठळक मुद्दे15 दिवसांपूर्वी आपली सुट्टी संपवून मनदीप सिंग हे पुन्हा लष्कराच्या सेवेत रूजू झाले होते. शहीद होण्यापूर्वी होण्यापूर्वी मनदीप सिंग हे शत्रू सैन्याशी मोठ्या धैर्याने लढत होते, असे त्यांच्या टीममधील एका जवानाने सांगितले.

पटियाला : लडाखच्या गलवान खोऱ्यात वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) गेल्या सोमवारी भारत-चीन सैन्यांमध्ये हिंसक चकमक झाली. या चकमकीत पंजाबच्या पटियाला जिल्ह्यातील रहिवासी असलेले जवान मनदीप सिंग शहीद झाले. 15 दिवसांपूर्वी आपली सुट्टी संपवून मनदीप सिंग हे पुन्हा लष्कराच्या सेवेत रूजू झाले होते. शहीद होण्यापूर्वी होण्यापूर्वी मनदीप सिंग हे शत्रू सैन्याशी मोठ्या धैर्याने लढत होते, असे त्यांच्या टीममधील एका जवानाने सांगितले. हा जवान या चकमकीदरम्यान गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मनदीप सिंग ज्या पोस्टवर शहीद झाले. त्याच पोस्टवरून त्यांचे भाऊ निर्मल सिंग गेल्या 30 एप्रिलला लष्करातून सेवानिवृत्त झाले होते. निर्मल सिंग यांनी भावूक होत आपल्या भावाच्या धैर्याची कहाणी सांगितली. ते म्हणाले की, "मनदीप आपल्या टीमचा लीडर होता. ज्यावेळी चीनकडून हल्ला करण्यात आला, त्यावेळी तो धैर्याने आणि आत्मविश्वासाने पुढे गेला. त्याने दोन चीनचे सैनिक पकडले होते. मात्र, त्याचवेळी चीनच्या तिसऱ्या जवानाने मनदीपवर हल्ला केला. ज्यामुळे तो शहीद झाला."

मनदीपच्या टीममधील एक जवान गंभीर जखमी झाला आहे. तो रुग्णालयात दाखल आहे. त्याने फक्त मनदीपच्या धाडसाबद्दल सांगितल्याचे निर्मल सिंग म्हणाले. तसेच, त्यांनी सांगितले की, "मनदीप शस्त्रू सैन्यावर तुटून पडत होता. त्याने कोणावरही हल्ला केला, तर तो पुन्हा उठला नाही." यावेळी मनदीप सिंग यांच्या शौर्याची कहाणी सांगताना निर्मल सिंग भावूक झाले होते. ते म्हणाले, "बुधवारी सकाळी फोन आला आणि मनदीप जखमी झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर दुपारी पुन्हा फोन आला आणि सांगण्यात आले की, चिनी सैन्याशी लढताना मनदीप शहीद झाले."

दरम्यान, भारत आणि चीनमध्ये सोमवारी झालेल्या हिंसक धुमश्चक्रीमध्ये चीनचे 43 हून सैनिक मारले गेले आहेत. तर भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. चीनच्या सैनिकांनी भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो त्यांच्याच अंगलट आला आहे. या घटनेनंतर सीमेवरील तणाव वाढला असून चीनविरोधात संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे आता लडाख सीमेजवळच नाही तर संपूर्ण सीमेवर जवान सतर्क आहेत. 

आणखी बातम्या...

देमचोक, पेंगाँग भागातील गावे खाली करण्याचे लष्काराचे आदेश, सूत्रांची माहिती

भारताची चीनला घेरण्याची तयारी, सीमेवर जवान सतर्क, रस्ता बांधणीला वेग

कॉल आला अन् सांगितले, "तुम्ही अमनचे वडील आहात? तुमचा मुलगा देशासाठी शहीद झाला"

India China FaceOff : भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनला सुनावले, म्हणाले...

India Chine Faceoff : जवानांचे बलिदान देश कधीच विसरणार नाही - राजनाथ सिंह

दहा महिन्यांपूर्वी परिधान केली होती लष्कराची वर्दी, आता येणार तिरंग्यात लपेटलेले पार्थिव

टॅग्स :ladakhलडाखchinaचीनIndiaभारत