शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

आंदोलक शेतकऱ्यांशी आज चर्चेची सातवी फेरी; कृषी कायद्यांच्या तोडग्याकडे सर्वांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 06:54 IST

४० शेतकरी संघटनांच्या प्रमुखांना चर्चेसाठी केले निमंत्रित

- विकास झाडेनवी दिल्ली : शेतीविषयक कायदे रद्द करण्याच्या मागणीचा आग्रह धरणाऱ्या शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी आज, बुधवारी केंद्रीय मंत्रिगटाची सातव्यांदा बैठक होणार आहे. या बैठकीत कृषी कायद्यांविषयी काय तोडगा निघतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मंगळवारी आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली.

कृषी मंत्रालयाचे सचिव संजय अग्रवाल यांनी ४० शेतकरी संघटनांच्या प्रमुखांना पत्र लिहून ३० डिसेंबरच्या बैठकीसाठी बोलावले आहे. या सर्व शेतकरी संघटना संयुक्त किसान मोर्चाच्या फलकाखाली सरकारशी चर्चा करीत आहेत. सरकारने कायदे मागे घेतले तर आम्ही लगेच दिल्लीच्या सर्व सीमा मोकळ्या करून देऊ, असे आश्वासन शेतकरी नेत्यांनी दिले आहे. 

शरद पवार यांनी घेतला आढावा

राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शंकर दरेकर आणि संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक संदीप गिड्डे पाटील यांनी मंगळवारी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची ६, जनपथ येथील निवासस्थानी भेट घेतली. महिनाभरातील शेतकऱ्यांचे आंदोलन व सरकारसोबत झालेल्या बैठकांचा पवार यांनी आढावा घेतला. बुधवारी बैठक झाल्यानंतर पवार अन्य नेत्यांशी बोलून संयुक्त पुरोगामी आघाडीची ‘यूपीए’ आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. महाराष्ट्रातून जवळपास १ हजार शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय कशी आहे याबाबतही पवारांनी आस्थेने विचारपूस केली.

केरळमधील शेतकऱ्यांनी पाठविले १६ टन अननस

कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे सुरू असलेल्या आंदोलनाला महिना उलटून गेला आहे. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळू लागला आहे. आता केरळमधील अननस उत्पादक शेतकऱ्यांनी या आंदोलनकर्त्यांसाठी मोफत अननस पाठविले आहे. 

''पायनापल सिटी'' म्हणून मधुर अननसासाठी प्रसिद्ध असलेल्या एर्नाकुलम जिल्ह्यातील वाझाकुलम या ठिकाणाहून गुरुवारी रात्री १६ टन अननसाचे ट्रक दिल्लीला पाठविण्यात आले. केरळचे कृषिमंत्री व्ही.एस. सुनील कुमार यांच्या हस्ते हे ट्रक आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसाठी रवाना करण्यात आले.  दिल्लीतील केरळचे खासदार हे अननस आंदोलनस्थळी वाटणार आहेत. केरळच्या शेतकऱ्यांच्या या उपक्रमाचे सोशल मीडियावरही कौतुक होत आहे. सिंघू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केरळच्या शेतकरी बांधवांनी पाठविलेली ही भेट मोहक आणि मधुर ठरावी, अशा भावना सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत.  

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपBJPभाजपाSharad Pawarशरद पवार