शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

झारखंडमध्ये सात गावकऱ्यांची निर्घृण हत्या, पत्थलगडी आंदोलकांचे अमानुष कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 05:05 IST

झारखंडमधील पश्चिम सिंघभूम जिल्ह्यातील एका गावातल्या सात जणांची पत्थलगडी आंदोलकांच्या समर्थकांनी लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, तसेच कु-हाडीने वार करून मंगळवारी हत्या केली.

रांची : झारखंडमधील पश्चिम सिंघभूम जिल्ह्यातील एका गावातल्या सात जणांची पत्थलगडी आंदोलकांच्या समर्थकांनी लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, तसेच कु-हाडीने वार करून मंगळवारी हत्या केली. या सात जणांनी पत्थलगडी आंदोलनाला विरोध केल्यामुळेच त्यांना ठार मारण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.झारखंडचे पोलीस महानिरीक्षक साकेतकुमार सिंह म्हणाले, बुरुगुलिकेरा गावात घडलेल्या हत्याकांडाची माहिती मिळताच पोलीस मंगळवारी रात्री तिथे चौकशीसाठी गेले.आंदोलनाला विरोध करणाºया सात गावकऱ्यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यांचे मृतदेह हल्लेखोरांनी जंगलात टाकून दिले होते. मृतांमध्ये ग्रामपंचायतीचा एक सदस्यही आहे. जंगलात रात्रभर शोध घेतल्यानंतर सातही जणांचे मृतदेह हाती लागले आहेत.पत्थलगडी आंदोलनाला पाठिंबा देण्याबाबत बुरुगुलिकेरा गावामध्ये मंगळवारी एक बैठक झाली. त्यावेळी या आंदोलनाला काही जणांनी विरोध केल्यामुळे वाद निर्माण झाला. त्याचेच पर्यावसन या हत्याकांडात झाले, असे पश्चिम सिंघभूम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक इंद्रजित महाता म्हणाले.या हत्याकांडाबद्दल झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. कायदा हा सर्वांपेक्षा श्रेष्ठ असून हत्याकांड घडविणाºयांवर कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी म्हटलेआहे. (वृत्तसंस्था)काय आहे आंदोलन?ग्रामसभांना स्वायत्तता द्या, या मागणीसाठी झारखंडमधील आदिवासी समाजाकडून पत्थलगडी आंदोलन सुरू आहे. आदिवासीबहुल भागामध्ये सरकारी कायद्यांचा अंमल नको, अशी या आंदोलकांची मागणी असून, ते जंगल, नद्यांवरील सरकारचा हक्क मान्य करीत नाहीत.आंदोलनाचे प्रतीक म्हणून हे आदिवासी आपल्या गावाबाहेर शिलालेख किंवा फलक उभारतात. हे गाव स्वायत्त भूमी असून, येथे बाहेरच्या लोकांना येण्यास मनाई आहे, असे त्या फलकावर लिहिलेले असते. सरकारी अधिकारी, पोलिसांनाही या गावांत प्रवेश करण्यास पत्थलगडी आंदोलकांकडून मज्जाव केला जातो.१९ जून रोजी एका स्वयंसेवी संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांचे अपहरण करून त्यांच्यावर पत्थलगडी आंदोलकांनी सामूहिक बलात्कार केला होता. या प्रकरणामुळे देशभरात खळबळ माजली होती.भाजपचे माजी खासदार करिया मुंडा यांच्या तीन सुरक्षारक्षकांचे या आंदोलकांनी २६ जून रोजी अपहरण केले होते. नंतर त्यांची सुटका करण्यात आली. झारखंडमधील कुंती, गुमला, सिमदेहा, पश्चिम सिंघभूम या नक्षलवादग्रस्त चार जिल्ह्यांत पत्थलगडी आंदोलनाने जोर धरला आहे. 

टॅग्स :JharkhandझारखंडMurderखूनCrime Newsगुन्हेगारी