शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

झारखंडमध्ये सात गावकऱ्यांची निर्घृण हत्या, पत्थलगडी आंदोलकांचे अमानुष कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 05:05 IST

झारखंडमधील पश्चिम सिंघभूम जिल्ह्यातील एका गावातल्या सात जणांची पत्थलगडी आंदोलकांच्या समर्थकांनी लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, तसेच कु-हाडीने वार करून मंगळवारी हत्या केली.

रांची : झारखंडमधील पश्चिम सिंघभूम जिल्ह्यातील एका गावातल्या सात जणांची पत्थलगडी आंदोलकांच्या समर्थकांनी लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, तसेच कु-हाडीने वार करून मंगळवारी हत्या केली. या सात जणांनी पत्थलगडी आंदोलनाला विरोध केल्यामुळेच त्यांना ठार मारण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.झारखंडचे पोलीस महानिरीक्षक साकेतकुमार सिंह म्हणाले, बुरुगुलिकेरा गावात घडलेल्या हत्याकांडाची माहिती मिळताच पोलीस मंगळवारी रात्री तिथे चौकशीसाठी गेले.आंदोलनाला विरोध करणाºया सात गावकऱ्यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यांचे मृतदेह हल्लेखोरांनी जंगलात टाकून दिले होते. मृतांमध्ये ग्रामपंचायतीचा एक सदस्यही आहे. जंगलात रात्रभर शोध घेतल्यानंतर सातही जणांचे मृतदेह हाती लागले आहेत.पत्थलगडी आंदोलनाला पाठिंबा देण्याबाबत बुरुगुलिकेरा गावामध्ये मंगळवारी एक बैठक झाली. त्यावेळी या आंदोलनाला काही जणांनी विरोध केल्यामुळे वाद निर्माण झाला. त्याचेच पर्यावसन या हत्याकांडात झाले, असे पश्चिम सिंघभूम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक इंद्रजित महाता म्हणाले.या हत्याकांडाबद्दल झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. कायदा हा सर्वांपेक्षा श्रेष्ठ असून हत्याकांड घडविणाºयांवर कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी म्हटलेआहे. (वृत्तसंस्था)काय आहे आंदोलन?ग्रामसभांना स्वायत्तता द्या, या मागणीसाठी झारखंडमधील आदिवासी समाजाकडून पत्थलगडी आंदोलन सुरू आहे. आदिवासीबहुल भागामध्ये सरकारी कायद्यांचा अंमल नको, अशी या आंदोलकांची मागणी असून, ते जंगल, नद्यांवरील सरकारचा हक्क मान्य करीत नाहीत.आंदोलनाचे प्रतीक म्हणून हे आदिवासी आपल्या गावाबाहेर शिलालेख किंवा फलक उभारतात. हे गाव स्वायत्त भूमी असून, येथे बाहेरच्या लोकांना येण्यास मनाई आहे, असे त्या फलकावर लिहिलेले असते. सरकारी अधिकारी, पोलिसांनाही या गावांत प्रवेश करण्यास पत्थलगडी आंदोलकांकडून मज्जाव केला जातो.१९ जून रोजी एका स्वयंसेवी संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांचे अपहरण करून त्यांच्यावर पत्थलगडी आंदोलकांनी सामूहिक बलात्कार केला होता. या प्रकरणामुळे देशभरात खळबळ माजली होती.भाजपचे माजी खासदार करिया मुंडा यांच्या तीन सुरक्षारक्षकांचे या आंदोलकांनी २६ जून रोजी अपहरण केले होते. नंतर त्यांची सुटका करण्यात आली. झारखंडमधील कुंती, गुमला, सिमदेहा, पश्चिम सिंघभूम या नक्षलवादग्रस्त चार जिल्ह्यांत पत्थलगडी आंदोलनाने जोर धरला आहे. 

टॅग्स :JharkhandझारखंडMurderखूनCrime Newsगुन्हेगारी