शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

झारखंड: करमा विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना, सात मुलींचा बुडून मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2021 23:16 IST

Jharkhand News: झारखंडमधील लातेहार जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडला आहे. येथे करमा विसर्जनादरम्यान, तलावात बुडाल्याने सात मुलींचा मृत्यू झाला आहे.

रांची - झारखंडमधील लातेहार जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडला आहे. येथे करमा विसर्जनादरम्यान, तलावात बुडाल्याने सात मुलींचा मृत्यू झाला आहे. ही घटना बालूमाथ ठाणे क्षेत्रातील मननडीह गावात घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, या दुर्घटनेनंतर संपूर्ण गावात शोकाचे वातावरण आहे. (Seven girls drowned in Karma immersion accident in Jharkhand )

मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री गावामध्ये करमा पूजन झाल्यानंतर गावातील  लोक करमा विसर्जन करण्यासाठी तलावात गेले होते. त्यावेळी तलावात आंघोळ करत असताना सात मुली खोल पाण्यात गेल्या. तेव्हा तिथे असलेल्या महिलांनी आरडा ओरडा केला. तेव्हा तिथे असलेल्या लोकांनी तलावात उड्या घेत तीन मुलींना बाहेर काढले. मात्र त्यांचा आधीच मृत्यू झाला होता. तर त्यानंतर गावकरी चार मुलींना घेऊन रुग्णालयात गेले. तिथे डॉक्टरांनी या सर्वांना मृत घोषित केले.

या घटनेबाबत लातेहारचे उपायुक्त अबू इम्रान यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांच्यावतीने या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. लातेहारच्या डीसींनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार सात मृत मुलींमध्ये तीन बहिणींचा समावेश आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलींची नावे पुढील प्रमाणे आहेत. रेखा कुमारी, लक्ष्मी कुमारी, रीना कुमारी, मीना कुमारी, पिंकी कुमारी, सुषमा कुमारी आणि सुनिता कुमारी.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विट करून लिहिले की, लातेहार जिल्ह्यातील शेरेगाडा गावामध्ये करम डाली विसर्जनादरम्यान ७ मुलींचा मृत्यू झाल्याचे ऐकून मला धक्का बसला आहे. ईश्वराने दिवंगत मुलींच्या आत्म्याला शांती प्रदान करावी. या दु:खाचा आघात सहन करण्याची शक्ती ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना देवो. 

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेJharkhandझारखंडAccidentअपघात