शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

झारखंड: करमा विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना, सात मुलींचा बुडून मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2021 23:16 IST

Jharkhand News: झारखंडमधील लातेहार जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडला आहे. येथे करमा विसर्जनादरम्यान, तलावात बुडाल्याने सात मुलींचा मृत्यू झाला आहे.

रांची - झारखंडमधील लातेहार जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडला आहे. येथे करमा विसर्जनादरम्यान, तलावात बुडाल्याने सात मुलींचा मृत्यू झाला आहे. ही घटना बालूमाथ ठाणे क्षेत्रातील मननडीह गावात घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, या दुर्घटनेनंतर संपूर्ण गावात शोकाचे वातावरण आहे. (Seven girls drowned in Karma immersion accident in Jharkhand )

मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री गावामध्ये करमा पूजन झाल्यानंतर गावातील  लोक करमा विसर्जन करण्यासाठी तलावात गेले होते. त्यावेळी तलावात आंघोळ करत असताना सात मुली खोल पाण्यात गेल्या. तेव्हा तिथे असलेल्या महिलांनी आरडा ओरडा केला. तेव्हा तिथे असलेल्या लोकांनी तलावात उड्या घेत तीन मुलींना बाहेर काढले. मात्र त्यांचा आधीच मृत्यू झाला होता. तर त्यानंतर गावकरी चार मुलींना घेऊन रुग्णालयात गेले. तिथे डॉक्टरांनी या सर्वांना मृत घोषित केले.

या घटनेबाबत लातेहारचे उपायुक्त अबू इम्रान यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांच्यावतीने या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. लातेहारच्या डीसींनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार सात मृत मुलींमध्ये तीन बहिणींचा समावेश आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलींची नावे पुढील प्रमाणे आहेत. रेखा कुमारी, लक्ष्मी कुमारी, रीना कुमारी, मीना कुमारी, पिंकी कुमारी, सुषमा कुमारी आणि सुनिता कुमारी.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विट करून लिहिले की, लातेहार जिल्ह्यातील शेरेगाडा गावामध्ये करम डाली विसर्जनादरम्यान ७ मुलींचा मृत्यू झाल्याचे ऐकून मला धक्का बसला आहे. ईश्वराने दिवंगत मुलींच्या आत्म्याला शांती प्रदान करावी. या दु:खाचा आघात सहन करण्याची शक्ती ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना देवो. 

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेJharkhandझारखंडAccidentअपघात