शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
5
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
6
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
7
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
8
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
9
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
10
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
11
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
12
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
13
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
14
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
15
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
16
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
17
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
18
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
19
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
20
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप

झारखंड: करमा विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना, सात मुलींचा बुडून मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2021 23:16 IST

Jharkhand News: झारखंडमधील लातेहार जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडला आहे. येथे करमा विसर्जनादरम्यान, तलावात बुडाल्याने सात मुलींचा मृत्यू झाला आहे.

रांची - झारखंडमधील लातेहार जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडला आहे. येथे करमा विसर्जनादरम्यान, तलावात बुडाल्याने सात मुलींचा मृत्यू झाला आहे. ही घटना बालूमाथ ठाणे क्षेत्रातील मननडीह गावात घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, या दुर्घटनेनंतर संपूर्ण गावात शोकाचे वातावरण आहे. (Seven girls drowned in Karma immersion accident in Jharkhand )

मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री गावामध्ये करमा पूजन झाल्यानंतर गावातील  लोक करमा विसर्जन करण्यासाठी तलावात गेले होते. त्यावेळी तलावात आंघोळ करत असताना सात मुली खोल पाण्यात गेल्या. तेव्हा तिथे असलेल्या महिलांनी आरडा ओरडा केला. तेव्हा तिथे असलेल्या लोकांनी तलावात उड्या घेत तीन मुलींना बाहेर काढले. मात्र त्यांचा आधीच मृत्यू झाला होता. तर त्यानंतर गावकरी चार मुलींना घेऊन रुग्णालयात गेले. तिथे डॉक्टरांनी या सर्वांना मृत घोषित केले.

या घटनेबाबत लातेहारचे उपायुक्त अबू इम्रान यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांच्यावतीने या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. लातेहारच्या डीसींनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार सात मृत मुलींमध्ये तीन बहिणींचा समावेश आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलींची नावे पुढील प्रमाणे आहेत. रेखा कुमारी, लक्ष्मी कुमारी, रीना कुमारी, मीना कुमारी, पिंकी कुमारी, सुषमा कुमारी आणि सुनिता कुमारी.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विट करून लिहिले की, लातेहार जिल्ह्यातील शेरेगाडा गावामध्ये करम डाली विसर्जनादरम्यान ७ मुलींचा मृत्यू झाल्याचे ऐकून मला धक्का बसला आहे. ईश्वराने दिवंगत मुलींच्या आत्म्याला शांती प्रदान करावी. या दु:खाचा आघात सहन करण्याची शक्ती ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना देवो. 

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेJharkhandझारखंडAccidentअपघात