शहरं
Join us  
Trending Stories
1
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; 11 मतदारसंघ, तापमान कमी होणार
3
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
4
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
5
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
6
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
7
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
8
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
9
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
10
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
11
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
12
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
13
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
14
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
15
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
16
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
17
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
18
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
19
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
20
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 

पराभवानंतर अशोक गहलोतांचा पाय आणखी खोलात? OSDनेच केला खळबळजनक गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2023 4:30 PM

आपल्या नेतृत्वाला पर्यायच निर्माण होऊ नये, असा प्रयत्न सातत्याने मुख्यमंत्री गहलोत यांनी केल्याचा आरोप त्यांचेच विशेष कार्य अधिकारी राहिलेल्या लोकेश शर्मा यांनी केला आहे.

जयपूर : विधानसभा निवडणुकीत राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये तर सरकार असतानाही काँग्रेसला सत्ता वाचवण्यात अपयश आल्याने स्थानिक नेतृत्वावर टीकेचा भडीमार होत आहे. राजस्थानच्या राजकारणात जादूगर अशी ओळख असलेल्या अशोक गहलोत यांच्या नेतृत्वातील पराभव काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. अशातच आता अशोक गहलोत हे मुख्यमंत्री असताना त्यांचे विशेष कार्य अधिकारी असलेल्या लोकेश शर्मा यांनी अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत. काँग्रेसच्या सत्ताकाळात पक्षाचे नेते सचिन पायलट यांच्या हालचालींवर बारिक नजर ठेवली जात होती आणि त्यांचा फोनही टॅप केला जात होता, असा दावा शर्मा यांनी केला आहे.

राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. काँग्रेसच्या पराजयाची जी काही कारणे होती त्यामध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि काँग्रेसचे मातब्बर नेते सचिन पायलट यांच्यातील मतभेद, हेदेखील एक प्रमुख कारण होते. २०१८ मध्ये सरकार स्थापन झाल्यापासूनच दोन्ही नेत्यांमध्ये सतत खटके उडत होते. पायलट यांनी मुख्यमंत्री गहलोत यांच्याविरोधात आपल्या समर्थक आमदारांसह बंडही केलं होतं. मात्र कसलेले राजकारणी असलेल्या गहलोत यांनी नंतर हे बंड मोडून काढण्यात यश मिळवलं. तसंच अनेकदा शेलक्या शब्दांत सचिन पायलट यांच्यावर तोफ डागली. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पायलट हे प्रचारादरम्यान काहीसे अलिप्त असल्याचं बघायला मिळालं. मात्र आपल्याला पर्यायच निर्माण होऊ नये, असा प्रयत्न सातत्याने मुख्यमंत्री गहलोत यांनी केल्याचा आरोप त्यांचेच विशेष कार्य अधिकारी लोकेश शर्मा यांनी केला आहे.

लोकेश शर्मा यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत; गहलोत यांच्यावर कोणकोणते आरोप केले?

काँग्रेसच्या पराभवानंतर लोकेश शर्मा यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, "जो निवडणूक निकाल आला, त्यामुळे मी निराश नक्कीच आहे, मात्र मला या निकालाचं आश्चर्य अजिबात वाटलं नाही. काँग्रेस पक्ष पुन्हा सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करत होता, पण अशोक गहलोत हे मात्र कोणताही बदल करण्याच्या मनस्थितीत नव्हते. हा काँग्रेस नव्हे तर केवळ गहलोत यांचा पराभव आहे. गहलोत यांच्याकडून पक्षनेतृत्वाची फसवणूक, त्यांना योग्य फीडबॅक न देणे, पर्याय म्हणून कोणालाही तयार न होऊ देणं, अपरिपक्व आणि फक्त स्वत:च्या फायद्यासाठी जवळ असलेल्या लोकांचं ऐकून चुकीचे निर्णय घेणं, पराभूत होण्याची शक्यता असणाऱ्या उमेदवारांनाच तिकिटं दिली जात होती," असा हल्लाबोल शर्मा यांनी केला आहे.

"मी स्वत:ही गावखेड्यात जाऊन लोकांशी संवाद साधत काही महिन्यांपूर्वी एक रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना दिला होता. मात्र त्यावर त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. पक्षसंघटनेत कसलाही बदल केला नाही," असा दावाही लोकेश शर्मा यांनी केला आहे. 

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकSachin Pilotसचिन पायलटcongressकाँग्रेस