शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

“पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी भाजपशी हातमिळवणी केलीय”; ४५ वर्षे काँग्रेसमध्ये असणाऱ्या नेत्याचा रामराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 15:56 IST

या ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने सोनिया गांधी यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली असून, लगेचच तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

दिसपूर: अलीकडे झालेल्या ५ राज्यांतील निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झालेला पाहायला मिळाला. यानंतर पक्षात चर्चेच्या लागोपाठ फेऱ्या झाल्या. काँग्रेसला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासंदर्भात खूप मंथन झाले. यातच काँग्रेसला पुन्हा एक धक्का बसला आहे. तब्बल ४५ वर्ष काँग्रेसमध्ये कार्यरत असलेल्या ज्येष्ठ नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्षाला रामराम करताना या नेत्याने पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना एक पत्र लिहिले असून, पक्षातील ज्येष्ठ नेते भाजपशी हातमिळवणी केल्याचा मोठा आरोप केला आहे. 

काँग्रेसचे आसाममधील ज्येष्ठ नेते रिपन बोरा यांनी पक्षाच्या सर्व पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर काही तासांतच बोरा यांनी अभिजित बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९७६ पासून अर्थात गेल्या ४५ वर्षांपासून पक्षासोबत असलेल्या रिपन बोरा यांनी पक्षातील अव्यवस्थेचे कारण पुढे करत राजीनामा दिला आहे.

सोनिया गांधी यांना पत्र लिहित व्यक्त केली नाराजी

भाजपतर्फे सामाजिक शांततेचा भंग करणाऱ्या भूमिका मांडल्या जात आहेत. त्यासाठी लढा देण्याऐवजी आणि एकत्रपणे भाजपला रोखण्याऐवजी या सर्वांत जुन्या पक्षातील लोक स्वार्थासाठी एकमेकांसोबतच भांडत आहेत. यामुळे भाजपला प्रत्येक क्षेत्रात आघाडी घेण्याची संधी मिळाली आहे. शिवाय, यामुळे लाखो काँग्रेस कार्यकर्त्यांचं देखील मनोधैर्य खच्ची होत आहे, असे बोरा यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. मला हे सांगताना फार दु:ख होत आहे की, भाजपविरोधात लढण्याऐवजी आसाममध्ये पक्षाच्या सर्वात ज्येष्ठ नेत्यांनी भाजपासोबत हातमिळवणी केली आहे, असा दावाही बोरा यांनी केला आहे. 

दरम्यान, ५ राज्यांतील निवडणुकांमध्येही काँग्रेसची वाताहात झालेली पाहायला मिळाली. पंजाबमध्ये मुख्यमंत्री पदावर असलेले कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद समोर आला आणि परिणामतः पंजाब राज्य काँग्रेसच्या हातून केले.  

टॅग्स :congressकाँग्रेसAssamआसामSonia Gandhiसोनिया गांधी