शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

"संयम राखा! भाजप कायम राहणार नाही; मोदी युग संपल्यानंतर त्यांचा निभाव लागणं अवघड"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 18:26 IST

काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्र्याचं विधान; जी-२३ नेत्यांवर साधला निशाणा

नवी दिल्ली: गेल्याच आठवड्यात पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. पाचपैकी चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं. ही चारही राज्यं राखण्यात भाजपला यश आलं आहे. तर काँग्रेसच्या ताब्यात असलेलं पंजाब आम आदमी पक्षाच्या हाती गेलं आहे. केंद्रामधील सत्ता गेल्यापासून झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष सातत्यानं अपयशी ठरत आहे. नेतृत्त्व बदलाची मागणी करत जी-२३ नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यावर काँग्रसचे नेते माजी केंद्रीय मंत्री विरप्पा मोईली यांनी भाष्य केलं आहे. 

भाजप आणि इतर पक्ष येत जात राहतील. पण केवळ काँग्रेस हा एकमेव असा पक्षा आहे जो कायम राहील, असं मोईली म्हणाले. पक्षाच्या नेत्यांनी आपला दृष्टीकोन बदलायला हवा, असा सल्लादेखील त्यांनी दिला. निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी आयुष्य, समाज आणि प्रत्येक गोष्टीबद्दलचा दृष्टीकोन बदलण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेस पक्ष कायम राहणार आहे. आपण अपेक्षा ठेवायला हव्यात. आपण विश्वास गमावता कामा नये, असं मोईलींनी म्हटलं.  

काँग्रेसमध्ये नाराज नेत्यांचा एक गट आहे. २३ नेत्यांचा हा गट जी-२३ नावानं ओळखला जातो. या नेत्यांची गुलाम नबी आझाद यांच्य्या घरी आज बैठक झाली. त्यानंतर मोईली यांचं विधान आलं आहे. जी-२३ गट पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना लक्ष्य करत आहे. त्यामुळे पक्ष कमजोर होत आहे. भाजप कायम राहणारा पक्ष नाही. मोदी युग संपल्यानंतर त्यांचा निभाव लागणं अवघड असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस