शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

"संयम राखा! भाजप कायम राहणार नाही; मोदी युग संपल्यानंतर त्यांचा निभाव लागणं अवघड"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 18:26 IST

काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्र्याचं विधान; जी-२३ नेत्यांवर साधला निशाणा

नवी दिल्ली: गेल्याच आठवड्यात पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. पाचपैकी चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं. ही चारही राज्यं राखण्यात भाजपला यश आलं आहे. तर काँग्रेसच्या ताब्यात असलेलं पंजाब आम आदमी पक्षाच्या हाती गेलं आहे. केंद्रामधील सत्ता गेल्यापासून झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष सातत्यानं अपयशी ठरत आहे. नेतृत्त्व बदलाची मागणी करत जी-२३ नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यावर काँग्रसचे नेते माजी केंद्रीय मंत्री विरप्पा मोईली यांनी भाष्य केलं आहे. 

भाजप आणि इतर पक्ष येत जात राहतील. पण केवळ काँग्रेस हा एकमेव असा पक्षा आहे जो कायम राहील, असं मोईली म्हणाले. पक्षाच्या नेत्यांनी आपला दृष्टीकोन बदलायला हवा, असा सल्लादेखील त्यांनी दिला. निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी आयुष्य, समाज आणि प्रत्येक गोष्टीबद्दलचा दृष्टीकोन बदलण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेस पक्ष कायम राहणार आहे. आपण अपेक्षा ठेवायला हव्यात. आपण विश्वास गमावता कामा नये, असं मोईलींनी म्हटलं.  

काँग्रेसमध्ये नाराज नेत्यांचा एक गट आहे. २३ नेत्यांचा हा गट जी-२३ नावानं ओळखला जातो. या नेत्यांची गुलाम नबी आझाद यांच्य्या घरी आज बैठक झाली. त्यानंतर मोईली यांचं विधान आलं आहे. जी-२३ गट पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना लक्ष्य करत आहे. त्यामुळे पक्ष कमजोर होत आहे. भाजप कायम राहणारा पक्ष नाही. मोदी युग संपल्यानंतर त्यांचा निभाव लागणं अवघड असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस