शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

त्यांचे मोबाइल २४ तासांसाठी जप्त करा, ड्रायव्हरांना ठोठवा पाच हजार रुपये दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 03:00 IST

उत्तराखंडमध्ये कार चालविताना मोबाइलवर बोलत असल्याचे आढळल्यास तुम्हाला केवळ दंडच केला जाणार नाही, तर तुमचा मोबाइलही किमान एका दिवसासाठी जप्त करण्यात येणार आहे.

नैनिताल - उत्तराखंडमध्ये कार चालविताना मोबाइलवर बोलत असल्याचे आढळल्यास तुम्हाला केवळ दंडच केला जाणार नाही, तर तुमचा मोबाइलही किमान एका दिवसासाठी जप्त करण्यात येणार आहे. तसे आदेशच नैनिताल उच्च न्यायालयाने शुक्रवारी उत्तराखंड पोलिसांना दिले आहेत.देशाच्या सर्व भागांत वाहन चालवत असताना मोबाइलवर बोलण्याचे त्यामुळे काही वेळा अपघात होतात, तर काही वेळा अपघात होता-होता टळतात. त्यामुळे वाहन चालवताना मोबाइलवर बोलण्यास बंदी असली, तरी त्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याच्या बाबीकडे बोट ठेवून नैनिताल उच्च न्यायालयाने अशा चालकांना दंडही ठोठावा आणि त्यांच्या हातातील मोबाइल काढून घेऊ न, त्यांना तो २४ तासांनंतरच परत करा, असे पोलिसांना सांगितले आहे.उत्तराखंडचा बराच भाग डोंगराळ असून, त्यामुळे तिथे अपघात होण्याचे प्रमाण एरवीही अधिक आहे. त्यातच मोबाइलवर बोलण्याच्या नादात चालकांकडून अपघात होत असल्याचे लक्षात आल्याने न्या. राजीव शर्मा यांनी हे आदेश दिले. वाहन चालविताना मोबाइलवर बोलणारे अनेक जण दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालतात. या प्रकारांना आळा घालण्यासाठी मोबाइलच २४ तासांसाठी जप्त करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. परिवहन विभाग व वाहतूक पोलीस यांच्यावर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे.गेल्याच महिन्यात उच्च न्यायालयाने मोबइलवर बोलणाºयांना किमान ५ हजार रुपये दंड ठोठावण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर काल मोबाइल जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. (वृत्तसंस्था) 

टॅग्स :MobileमोबाइलCourtन्यायालय