शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

असंतुष्टांचा आवाज दाबण्यासाठी देशद्राेहाचा कायदा लावता येणार नाही, दिल्ली न्यायालयाचे खडे बाेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 00:36 IST

Delhi court : दिल्ली पाेलिसांनी देवीलाल बर्दक आणि स्वरूप राम यांना फेसबुकवर शेतकरी आंदाेलनादरम्यान खाेटा व्हिडिओ पाेस्ट करून अफवा पसरविण्याच्या आराेपांवरून अटक केली हाेती.

नवी दिल्ली : असंतुष्टांचा आवाज दाबण्यासाठी देशद्राेहाचा कायदा लावता येणार नाही, असे खडे बाेल सुनावून दिल्लीतील अतिरिक्त सत्र न्यायालयाने शेतकरी आंदाेलनादरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दाेघांना जामीन मंजूर केला.दिल्ली पाेलिसांनी देवीलाल बर्दक आणि स्वरूप राम यांना फेसबुकवर शेतकरी आंदाेलनादरम्यान खाेटा व्हिडिओ पाेस्ट करून अफवा पसरविण्याच्या आराेपांवरून अटक केली हाेती. त्यांच्यावर फसवणुकीसह देशद्राेहाचाही गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. मात्र, या प्रकरणात हे कलम लावणे हा अतिशय वादातील मुद्दा असल्याचे न्यायालयाने म्हटले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारच्या हाती देशद्राेहाची कलमे लागू करण्याचे शस्त्र आहे. मात्र, असंतुष्टांचा आवाज शांत करण्यासाठी ते लावता येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नाेंदविले. या प्रकरणात फसवणुकीचाही गुन्हा दाखल केल्यावरूनही न्यायालयाने पाेलिसांवर ताशेरे ओढले. अफवा पसरविण्याच्या आराेपांमध्येच तथ्य दिसत असून, हा जामीनपात्र गुन्हा असल्याचे सांगून न्यायालयाने दाेघांना ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. तसेच तपासाला सहकार्य करण्याचे निर्देशही दिले.

काय म्हटले न्यायालयाने?शांतता आणि कायदा सुव्यवस्थेला धाेका निर्माण हाेईल, अशा कुठल्याही कृत्याला कायदा परवानगी देत नाही. आराेपींनी शांततेचा भंग करणे, गाेंधळ निर्माण करणे किंवा हिंसाचाराला उत्तेजना देणाराे काेणतेही कृत्य केल्याचे दिसत नाही. त्यामुळे देशद्राेहाचे कलम लावणे याेग्य आहे, असे वाटत नाही. हा अतिशय गंभीर चर्चेचा विषय आहे, असे न्यायालयाने म्हटले. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनCourtन्यायालय