शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

पाकिस्तानकडून जैश ए मोहम्मदच्या मदरशांना लष्करी सुरक्षा, मदरशातील मुलाने सांगितली 'अनटोल्ड स्टोरी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 10:27 IST

भारतीय हवाई दलानं नियंत्रण रेषा ओलांडून जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले,

नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक केला. त्यानंतर, या एअर स्ट्राईकवरुन देशात चांगलंच राजकारण सुरू झालं. तर अनेकांनी या एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले किंवा, एअर स्ट्राईक झाला की नाही, असेही प्रश्न उपस्थित केले. मात्र, भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर काही तासांतच बालकोट येथील जैश ए मोहम्मदच्या मदरशांतून तेथील मुलांना पाकिस्तानी लष्कराने सुरक्षित स्थळी हलवल्याची माहिती समोर आली आहे. 

भारतीय हवाई दलानं नियंत्रण रेषा ओलांडून जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले, त्यावेळी त्या भागात 300 मोबाईल अ‍ॅक्टिव्ह होते, अशी आकडेवारी समोर आली होती. विशेष म्हणजे हे फोन अ‍ॅक्टिव्ह असल्याची माहिती भारतीय गुप्तचर विभागाच्या तांत्रिक विभागाला मिळाली होती. एअर स्ट्राइकमध्ये नेमके किती दहशतवादी मारले गेले, याची चर्चा सुरू असताना ही आकडेवारी पुढे आली. त्यानंतर, आता भारतीय वायू सेनेनं लक्ष्य केलेल्या तळांवर असलेल्या मदरशातील मुलांना हल्ल्यानंतर काही तासांतच सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. बालाकोट येथील तलिम-उल-कुराण या जैश ए मोहम्मदच्या मदरशांतील काही मुलांना लगेचच सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. त्यानंतर, काही दिवसांनी त्यांना त्यांच्या घरी ठेवण्यात आल्याची माहिती, या मुलांच्या नातेवाईंकांनी दिली आहे. 

भारतीय वायू सेनेने 26 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवादी तळांवर हल्ला केला. भारतीय वायू सेनेनं हा हल्ल्या करण्यापूर्वीच एक आठवडाअगोदर या मदरशांना पाकिस्तानी सैन्यानं सुरक्षा दिली होती, असे येथील लहान मुलाने सांगितले. त्यामुळे पुलवामा हल्ल्यानंतर लगेचच पाकिस्तानकडून या मदरशांना संरक्षण पुरविण्यात आल्याचे आता उघड झाले आहे. 26 फेब्रवारी रोजी मध्यरात्री मोठा आवाज झाला. या आवाजाने आम्ही झोपेतून जागे झालो. हा हल्ला आमच्या मदरशापासून जवळच झाला होता. त्यानंतर, सकाळीच पाकिस्तानी सैन्याने आम्हाला एकत्र घेऊन एका सुरक्षित स्थळी नेले आणि काही दिवसांनी आमच्या घरी नेऊन साडले, असेही या चिमुकल्याच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.   

टॅग्स :Jaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदPakistanपाकिस्तानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकStudentविद्यार्थी