शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

आसाम नागरिकत्वाचे ‘कलम ६-अ’ वैधच; १९७१ पर्यंत आलेल्यांना नागरिकत्व - सर्वोच्च न्यायालय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 09:28 IST

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला. या प्रश्नावर ‘आसाम करार’ हाच खरा राजकीय तोडगा असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. ४-१ अशा बहुमताने हा निकाल देण्यात आला.

नवी दिल्ली : आसाममधील अवैध नागरिकांच्या संवेदनशील मुद्द्यावर तोडगा म्हणून करण्यात आलेली नागरिकत्व कायद्यातील दुरुस्ती सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवली आहे. यानुसार, या कायद्यात जोडण्यात आलेले कलम ६-अ वैध ठरले असून, या माध्यमातून १ जानेवारी १९६६ ते २५ मार्च १९७१ या काळात आसाममध्ये आलेल्या प्रवासी नागरिकांना भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात येणार आहे. 

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला. या प्रश्नावर ‘आसाम करार’ हाच खरा राजकीय तोडगा असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. ४-१ अशा बहुमताने हा निकाल देण्यात आला.राजीव गांधी-महंत यांच्यात झाला होता करारतत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि ऑल आसाम स्टुडंटस् युनियनचे नेते प्रफुल्लकुमार महंत यांच्यात हा करार झाला होता. या करारानुसार नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती करण्यात आली होती.

हिंसक आंदोलनाचा असा आहे इतिहासnआसाममध्ये बांगलादेशातून अवैधरीत्या आलेल्या नागरिकांमुळे स्थानिकांचे हक्क हिरावले जात असल्याच्या भावनेतून आसाममध्ये एएएसयू, अखिल भारतीय आसाम गण परिषद आणि इतर सहकारी संघटनांनी आंदोलन छेडले होते. n१९७९ मध्ये सुरू झालेल्या या आंदोलनाने नंतर हिंसक रूप घेतले. १९८५ मध्ये करारानंतर गण परिषदेचे प्रफुल्लकुमार महंत यांनी दोन वेळा विधानसभा निवडणूक जिंकून मुख्यमंत्रिपद भूषवले.

काय आहे नागरिकत्व कायदा कलम ६-अ?१९७९ मध्ये आसाममधून अवैध प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी आसाम स्टुडंट युनियनने आंदाेलन सुरू केले. १९८५ मध्ये यावर करार झाला. त्यानुसार भारतीय नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती करून कलम ६-अ जोडण्यात आले. यात १ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७१ दरम्यान आसाममध्ये आलेल्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व मागण्याचा अधिकार देण्यात आला. यासाठी किमान १० वर्षे राज्यात वास्तव्य केल्यानंतर नोंदणी करण्याची अट होती. १९७१ नंतर आलेल्यांची ओळख पटवून त्यांना कायदेशीररीत्या परत पाठवले जाईल.

काँग्रेसचे उपनेते गोगोईंकडून स्वागतलोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी या निकालाचे स्वागत करून स्व. राजीव गांधी यांच्या प्रयत्नांतून राज्यांत शांतता प्रस्थापित झाल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे त्या काळात भाजप आंदोलनकर्त्यांना ‘देशद्रोही’ संबोधित होता, अशी टीका त्यांनी केली. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयAssamआसाम