शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

आसाम नागरिकत्वाचे ‘कलम ६-अ’ वैधच; १९७१ पर्यंत आलेल्यांना नागरिकत्व - सर्वोच्च न्यायालय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 09:28 IST

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला. या प्रश्नावर ‘आसाम करार’ हाच खरा राजकीय तोडगा असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. ४-१ अशा बहुमताने हा निकाल देण्यात आला.

नवी दिल्ली : आसाममधील अवैध नागरिकांच्या संवेदनशील मुद्द्यावर तोडगा म्हणून करण्यात आलेली नागरिकत्व कायद्यातील दुरुस्ती सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवली आहे. यानुसार, या कायद्यात जोडण्यात आलेले कलम ६-अ वैध ठरले असून, या माध्यमातून १ जानेवारी १९६६ ते २५ मार्च १९७१ या काळात आसाममध्ये आलेल्या प्रवासी नागरिकांना भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात येणार आहे. 

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला. या प्रश्नावर ‘आसाम करार’ हाच खरा राजकीय तोडगा असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. ४-१ अशा बहुमताने हा निकाल देण्यात आला.राजीव गांधी-महंत यांच्यात झाला होता करारतत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि ऑल आसाम स्टुडंटस् युनियनचे नेते प्रफुल्लकुमार महंत यांच्यात हा करार झाला होता. या करारानुसार नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती करण्यात आली होती.

हिंसक आंदोलनाचा असा आहे इतिहासnआसाममध्ये बांगलादेशातून अवैधरीत्या आलेल्या नागरिकांमुळे स्थानिकांचे हक्क हिरावले जात असल्याच्या भावनेतून आसाममध्ये एएएसयू, अखिल भारतीय आसाम गण परिषद आणि इतर सहकारी संघटनांनी आंदोलन छेडले होते. n१९७९ मध्ये सुरू झालेल्या या आंदोलनाने नंतर हिंसक रूप घेतले. १९८५ मध्ये करारानंतर गण परिषदेचे प्रफुल्लकुमार महंत यांनी दोन वेळा विधानसभा निवडणूक जिंकून मुख्यमंत्रिपद भूषवले.

काय आहे नागरिकत्व कायदा कलम ६-अ?१९७९ मध्ये आसाममधून अवैध प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी आसाम स्टुडंट युनियनने आंदाेलन सुरू केले. १९८५ मध्ये यावर करार झाला. त्यानुसार भारतीय नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती करून कलम ६-अ जोडण्यात आले. यात १ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७१ दरम्यान आसाममध्ये आलेल्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व मागण्याचा अधिकार देण्यात आला. यासाठी किमान १० वर्षे राज्यात वास्तव्य केल्यानंतर नोंदणी करण्याची अट होती. १९७१ नंतर आलेल्यांची ओळख पटवून त्यांना कायदेशीररीत्या परत पाठवले जाईल.

काँग्रेसचे उपनेते गोगोईंकडून स्वागतलोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी या निकालाचे स्वागत करून स्व. राजीव गांधी यांच्या प्रयत्नांतून राज्यांत शांतता प्रस्थापित झाल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे त्या काळात भाजप आंदोलनकर्त्यांना ‘देशद्रोही’ संबोधित होता, अशी टीका त्यांनी केली. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयAssamआसाम