शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

"खूप कमी जेवण, १५ दिवस दात घासले नाही..."; अमेरिकेतून बाहेर काढलेल्या भारतीयांसोबत धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 20:32 IST

अमेरिकेतून भारतात आलेल्या ११६ भारतीयांना पुन्हा एकदा यातना सहन कराव्या लागल्याची माहिती समोर आली आहे.

US Deports 116 Indian: अमेरिकेतून ११६ भारतीयांना घेऊन आलेले विमान शनिवारी रात्री उशिरा अमृतसरला पोहोचले. डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्यांदा ११६ भारतीयांना हद्दपार करण्यात आलं. याआधी अमेरिकेचे लष्करी विमान भारतातील विविध राज्यांतील १०४ बेकायदेशीर स्थलांतरितांना घेऊन अमृतसरला पोहोचले होते. त्यावेळी आलेल्या भारतीयांच्या हाता पायात बेड्या घालण्यात आल्या होत्या. यावरुन जोरदार टीका देखील झाली होती. मात्र पुन्हा एकदा असाच प्रकार घडल्याची माहिती काही प्रवाशांनी दिली आहे.

अमेरिकेने भारतीय बेकायदेशीर स्थलांतरितांच्या आणखी एका तुकडीला हद्दपार केले आहे. संपूर्ण प्रवासादरम्यान त्यांच्या हातांना हातकड्या लावण्यात आल्याचे हद्दपार केलेल्या लोकांनी सांगितले. त्यांचे पायदेखील साखळदंडांनी बांधलेले होते. काही प्रवाशांनी यावर तीव्र आक्षेप व्यक्त घेतला तर काहींनी आपल्या सुरक्षेसाठी हे असल्याचे सांगितले. गेल्या वेळी जेव्हा अमेरिकेने १०४ भारतीयांना हद्दपार केले होते, तेव्हाही अशाच प्रकारची अमानुष वागणूक देण्यात आल्याचे म्हटलं होतं. यावरुन डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका झाली. तसेच हे प्रकरण संसदेपर्यंत पोहोचल्यानंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना राज्यसभेत उत्तर द्यावे लागले.

प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे सी-१७ हे लष्करी विमान ९० मिनिटे उशीराने अमृतसरला पोहोचले. ५ फेब्रुवारीला हद्दपार झालेल्या लोकांप्रमाणे आम्हालाही हातकड्या आणि बेड्या घातल्या गेल्या. ६६ तासांचा हा प्रवास नरकासारखा होता. पण हे आमच्या सुरक्षिततेसाठी होते. कारण इतरांच्या मानसिक स्थितीचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही आणि त्यामुळे काहीही होऊ शकते. अमेरिका आपले नियम पाळत होती, असं एका भारतीयाने सांगितले.

दुसरीकडे, विमानतळावर तैनात असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हद्दपार झालेल्यांमध्ये ५ महिलांचा समावेश होता. गेल्या वेळेप्रमाणे या वेळीही मुलांना बेड्या घातल्या नव्हत्या. या लोकांना खूप कमी जेवण देण्यात आले होते. त्यांनी १५ दिवस अंघोळ केली नव्हती आणि दात घासले नव्हते.

दरम्यान, अमृतसरला पोहोचल्यानंतर या लोकांचे इमिग्रेशन आणि पार्श्वभूमी तपासण्यात आली. यानंतर १६ फेब्रुवारीला सकाळी त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. हरियाणा आणि पंजाब सरकारने आपापल्या राज्यातील लोकांना घरी पाठवण्यासाठी विमानतळावर विशेष व्यवस्था केली होती.

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारत